शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जिल्ह्यात ६२.५० टक्के मतदान

By admin | Updated: October 16, 2014 06:19 IST

सर्वच मतदारसंघात चौरंगी- पंचरंगी लढती रंगल्याने झालेल्या चुरशीच्या वातावरणाचे प्रतिबिंब मतदानात पडून पुणे जिल्ह्यात विक्रमी ६२.५० टक्के मतदान झाले.

पुणे : सर्वच मतदारसंघात चौरंगी- पंचरंगी लढती रंगल्याने झालेल्या चुरशीच्या वातावरणाचे प्रतिबिंब मतदानात पडून पुणे जिल्ह्यात विक्रमी ६२.५० टक्के मतदान झाले. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपेक्षाही मतदानाची टक्केवारी वाढली आहे. वाढलेले मतदान कोणाच्या पथ्यावर पडणार आणि कोणाला फटका बसणार याच्या चर्चा रंगल्या आहेत. चुरशीच्य लढती असणाऱ्या ठिकाणी नागरिकांनी रांगा लावून मतदान केले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत ५५.५० टक्के मतदान झाले होते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ५७़४४ टक्के मतदान झाले होते़ यंदाच्या वेळी चुरस वाढल्याने या दोन्ही निवडणुकांपेक्षा मतदान वाढले. ग्रामीण भागात शहरी भागाच्या तुलनेत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. शहरातही सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी केल्याने येथीलही मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे़ सायंकाळी ६ वाजता मतदान संपण्याच्यावेळी अनेक मतदान केंद्रावर रात्री उशीरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरु होती़ सायंकाळी पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात ५५़५८ टक्के मतदान झाले होते़ २००९ मधील विधानसभा निवडुकीत पुणे जिल्ह्यात ५५़ ४४ टक्के मतदान झाले होते़ जिल्ह्यात इंदापूरमध्ये सर्वाधिक ७७़३६ टक्के तर पुणे कॅन्टोंमेंटमध्ये सर्वात कमी ४२ टक्के मतदान झाले आहे़ त्याखालोखाल बारामती ७१़३७ टक्के, भोर ७१़३७, जुन्नर ७१़३६, खेड आळंदी ७१, दौंड ७०़९८, पुरंदर ७०़५८, आंबेगाव ६७़८९, शिरुर ६५़८४ टक्के मतदान झाले आहे़ पुणे शहरातील आठ मतदारसंघात सर्वाधिक कसबा पेठमध्ये ५९़८८ टक्के मतदान झाले़ कोथरूड ५७़७, खडकवासला ५३़१४, पर्वती ५४़८, हडपसर ५२़०८, शिवाजीनगर ५१़०२, वडगाव शेरी ५०़४, कॅन्टोंमेंट ४६़५७ टक्के झाले़ पुणे जिल्ह्यातील अनेक मतदार संघात सकाळपासून वेगाने मतदानाला सुरुवात झाली़ अनेक मतदारसंघात विशेषत: जुन्नर, भोर, इंदापूर, बारामती, पुरंदर येथे पहिल्या दोन तासात २५ टक्क्यांपर्यंत मतदान झाले होते़ कोथरूड मतदार संघात चार ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना घडल्या़ तेथील मतदान काही वेळ बंद पडले होते़ ही मशीने तातडीने बदलण्यात आली़ जवळपास सर्वच मतदारसंघात जबरदस्त चुरस असली तरी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर घेतलेली काळजी आणि मोठा पोलीस बंदोबस्त यामुळे किरकोळ अपवाद वगळता शहर व जिल्ह्यात शांततेने मतदान पार पडले़ शहरी भागात सकाळी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडल्याचे दृश्य लोकसभा निवडणुकीच्यावेळी दिसून आले होते़ हे प्रमाण यंदा कमी होते़ अनेक ठिकाणी सकाळच्या सत्रात मतदारांची संख्या तुरळक दिसून येत होती़ शहरी भागात मतदारांना रिक्षातून आणण्याचे प्रमाण अधिक होते़ काही ठिकाणी यावरुन तक्रारी करण्यात आल्या़ दुपारनंतर मतदारांना बाहेर काढण्यासाठी सर्वच पक्षाचे कार्यकर्ते प्रयत्न करताना दिसत होते़ दुपारनंतर विशेषत: झोपडपट्टी परिसरातील मतदान मोठ्या प्रमाणावर बाहेर पडल्याचे दिसून येत होते़