शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

Maharashtra: वय पूर्ण होण्याआधीच मतदार नोंदणी, राज्यात ६० हजार जणांनी केला अर्ज

By नितीन चौधरी | Updated: October 4, 2023 16:39 IST

राज्यात अशी सर्वाधिक मतदार नोंदणी करण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे...

पुणे : राज्यात ५ जानेवारी २०२४ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीपूर्वी वयाची १८ वर्षे पूर्ण न झालेल्या युवकांना आता आगाऊ मतदार नोंदणीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशा ६० हजार ७४८ जणांचे एक जानेवारीनंतर वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांचे नाव मतदार यादीत समाविष्ट केले जाणार आहे. राज्यात अशी सर्वाधिक मतदार नोंदणी करण्यात ठाणे जिल्हा आघाडीवर असून नागपूर जिल्हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पुण्याचा क्रमांक आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राज्यात मतदार पडताळणीची मोहीम सुरू आहे. यात नवमतदारांच्या नोंदणीसह दुबार व मृत मतदारांची नावे वगळणे, तसेच नाव, पत्ता किंवा फोटोमधील बदल यावर कार्यवाही करण्यात येत आहे. यंदा प्रथमच पुढील वर्षी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवकांना आतापासूनच आगाऊ मतदार नोंदणी करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यांनी आताच आगाऊ नोंदणी केल्यास पुढील वर्षातील चार त्रैमासिकांत त्यांच्या जन्मतारखेनुसार १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. यानुसार राज्यात आतापर्यंत ६० हजार ७४८ जणांनी आगाऊ मतदार नोंदणी केली आहे. सर्वाधिक ६ हजार ३७८ जणांनी ठाणे जिल्ह्यातून नोंदणी केली आहे. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये ४ हजार ४११ तर त्या खालोखाल पुणे जिल्ह्यामध्ये ४ हजार ३६१ जणांनी अशी आगाऊ मतदार नोंदणी केली आहे. सर्वात कमी २७७ जणांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आगाऊ मतदार नोंदणी केली आहे.

जुलै ते सप्टेंबर या त्रैमासिकातील मतदार कार्यवाहीत १८ सप्टेंबरपर्यंत राज्यात ९ लाख ८१ हजार ४६३ मतदारांची वाढ नोंदविण्यात आली. तर दुबार व मृत मतदारांची ४ लाख ६१ हजार ८१४ नावे वगळण्यात आली. त्यामुळे मतदार यादीत एकूण वाढ ५ लाख १९ हजार ६४९ इतकी झाली आहे. यात २ लाख ४० हजार ११९ पुरुष तर २ लाख १९ हजार २९७ महिला व १७३ तृतीयपंथीयांचा समावेश आहे. तर याच काळात ५ लाख ५० हजार ७४ दिव्यांग मतदारांची भर पडली आहे. तसेच ५ हजार ४२५ अनिवासी भारतीयांनी देखील मतदार नोंदणी केली आहे.

अशी आहे आगाऊ मतदार नोंदणी-

नंदुरबार ६५३, धुळे १४४७, जळगाव २४९५, बुलढाणा ११०८, अकोला ८७०, वाशिम ४३३, अमरावती ८६५, वर्धा १२६३, नागपूर ४४११, भंडारा ११२०, गडचिरोली ३६६, चंद्रपूर ८७५, यवतमाळ ११३८, नांदेड २३३८, हिंगोली ९९९, परभणी १४८५, जालना १०९७, छत्रपती संभाजीनगर १७१९, नाशिक १९७५, ठाणे ६३७८, मुंबई उपनगर १४८८, मुंबई शहर ३५५, रायगड १०२१, पुणे ४३६१, नगर २५११, बीड ११९३, लातूर २८३६, धाराशीव ३८७६, सोलापूर २३१३ सातारा ११८८, रत्नागिरी ६२९, सिंधुदुर्ग २७७, कोल्हापूर २०१८, सांगली १५१३, पालघर ५३२ एकूण ६०७४८

राज्यात २७ ऑक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर केली जाणार आहे त्यानंतर २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत पुन्हा मतदार नोंदणी केली जाणार आहे व त्याची अंतिम मतदार नोंदणी मतदार यादी ५ जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. आगाऊ मतदार नोंदणीचा पर्याय खुला केल्याने राज्यातून त्याचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

- श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रVotingमतदान