शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

दुरावलेले ६० बिबट्यांचे बछडे विसावले आईच्या कुशीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 01:46 IST

बिबट्या निवारा केंद्रातील रेस्क्यूू पथकाची कामगिरी; २००९ ते २०१९ काळात वन्यप्राण्यांना दिले जीवदान

- अशोक खरातखोडद : जुन्नर तालुका हा बिबट्याप्रवण क्षेत्र आहे. तालुक्यात उसाचे क्षेत्र असल्याने बिबट्याचा अधिवास मोठा आहे. यामुळे तालुक्यात बिबट्या आणि मानव संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. ऊसतोडणीदरम्यान अनेक बछडे आईपासून दुरावतात. या दुरावलेल्या बछड्यांना पुन्हा त्यांची आई परत मिळवून देण्यासाठी माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्राचे रेस्क्यू पथक मदत करत आहे. आतापर्यंत या पथकाच्या कामगिरीमुळे जवळपास ६० हून अधिक बछड्यांना त्यांची आई मिळाली आहे. तर अनेक बिबट्यांना तातडीने उपचार देऊन पुन्हा निसर्गाचा अधिवास मिळवून दिला आहे.माणिकडोह येथील बिबट्या निवारा केंद्रातील डॉ. अजय देशमुख यांनी आजपर्यंत अनेक जखमी वन्यजीवांवर उपचार करून त्यांना जीवदान दिले आहे. माकड, वानर, कोल्हा, तरस, सांबर यांसारख्या अनेक प्राण्यांचे जीव वाचविले आहेत. याशिवाय अनेक पक्ष्यांचेदेखील जीव वाचविले आहेत. यात प्रामुख्याने बिबट्याचा समावेश उल्लेखनीय आहे. आजपर्यंत या डॉक्टरांनी सुमारे ४२५ बिबट्यांना आणि उपचार करून निसर्गात मुक्त केले आहे तर आईपासून दुरावलेल्या ६० बछड्यांना पुन्हा आईच्या हवाली केले आहे. डॉ. देशमुख माणिकडोह येथे रुजू झाले तेव्हा बिबट म्हणजे त्यांच्यासमोर एक मोठं आव्हान होतं. बिबट व्यवस्थापन शिकायचे, त्यांची देखभाल व औषधोपचार करायचे, त्यांच्या सवयी, कोणते औषध द्यायचे व कोणते नाही हे जाणून घायचे, तसेच सर्वांत आव्हानात्मक काम म्हणजे आपत्कालीन परिस्थितीत बिबट्याला बेशुद्ध करायचे म्हणजे, बिबट्या बघून त्याचे वजन किती किलो असेल याचा अंदाज लावून त्याला बेशुद्ध करण्याचे औषध भरणे व मारणे ही सर्वांत मोठी अवघड व जिकिरीची बाब होती. आपत्कालीन परिस्थितीत अडकलेले बिबटे म्हणजे विहिरीत अडकलेले, घरात अडकलेले, फाश्यात अडकलेले बिबटे अशा सुमारे १५० पेक्षा अधिक बिबट्यांना सुखरूप बाहेर काढून पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडले आहे.बिबट्या हा प्राणी अत्यंत चतुर, हुशार, संवेदनशील व चाणाक्ष आणि तितकाच भित्रा म्हणूनदेखील ओळखला जातो. तरीही तो आपल्यासोबत राहतोय. मानव-बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी गावोगावी जाऊन जनजागृती मोठ्या प्रमाणात केली. विविध ठिकाणी ७५ लोकांची गावपातळीवर टीम तयार केली असून, या टीमला वेळोवेळी प्रशिक्षण दिले व सुसज्ज केले आहे. शाळा, कॉलेज, गावकरी, सरपंच अशा वेगवेगळ्या स्तरावर बिबट- मानव संघर्ष कमी करून सहजीवन घडविण्याचा प्रयत्न डॉ. देशमुख करत आहेत.नाशिकवरून ६ महिन्यांची बिबट्याची मादी माणिकडोह येथे आणली गेली होती. या मादीचा अपघात होऊन चारही पायांची ताकद गेली होती. अर्धांगवायूसारखा हा प्रकार होता. तिचा एक्स- रे केल्यानंतर लक्षात आले, की तिच्या पायाचे कोणतेही हाड तुटलेले नव्हते. डॉ. देशमुख आणि त्यांच्या टीमने तिला फिजिओथेरपी व मसाज थेरपी करून त्या मादीला एका महिन्यात पायांवर उभी केली. विशेष म्हणजे ती मादी आता पूर्वीसारखी पळूदेखील लागली आहे.शेतात ऊसतोडणीच्या वेळी बिबट्याची सापडलेली पिल्ले एखाद्या प्राणिसंग्रहालय किंवा रेस्क्यू सेंटरला दिली जायची. त्यात मला एक कल्पना सुचली, जर ही पिल्लं ज्या ठिकाणी सापडली त्याच ठिकाणी पुन्हा ठेवली तर...? आणि अगदी तसेच केले व आम्ही त्यात यशस्वीदेखील झालो. त्या पिल्लांची आई तिकडे आली व ती पिल्लं घेऊन गेली. तेव्हापासून आम्ही नेहमीच असे करू लागलो. असे झाले नसते तर आज त्या पिल्लांचं जग हे पिंजरा म्हणूनच बंदिस्त राहिले असते.- डॉ. अजय देशमुख,बिबट्या निवारा केंद्र

टॅग्स :leopardबिबट्या