शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पुणे जिल्ह्यातील ६ कारखान्यांची धुराडी झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:43 IST

जिल्ह्यातील १६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी ६ लाख मे.टन उसाचे गाळप करून, १ कोटी १९ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर  - जिल्ह्यातील १६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी ६ लाख मे.टन उसाचे गाळप करून, १ कोटी १९ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर, ११.९५चा सरासरी साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने साखर उताऱ्यात बाजी मारली आहे.यावर्षी जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांपेक्षा ऊसगाळपात खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र होते. मात्र, उसाचे जादा टनेज बसू लागल्याने कारखान्यांनी ऊसगाळपास विलंब होत आहे. त्यातच राज्यातील साखर कारखाने १ नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने आणि कारखान्यांनी गेटकेन उसावर जादा भर दिल्याने सभासदांचे ऊस अजून शेतातच उभे आहेत.सर्व कारखाने बंद होण्यासाठी ऊस उत्पादकांना एक ते दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील भीमा पाटस, कर्मयोगी, नीरा भीमा, दौंड शुगर, व्यंकटेशकृपा आणि अनुराज शुगर या कारखान्यांनी आपल्या हंगामाची सांगता केली आहे. तर, उर्वरितअकरा कारखान्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्यासाठी सुरू आहेत.यावर्षी ऊसउत्पादकांचे उसाचे पीक उशिरा तुटल्याने गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. त्यामुळे टनेज घटून ऊसउत्पादाकांना अर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. अडसाली ऊस संपविण्यासाठी कारखान्यांना फेबु्रवारी महिना उजाडला. त्यामुळे हंगाम संपविण्यासाठी साखर कारखान्यांना अजून एक ते दिड महिन्यांचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे हंगाम सुरू होताना साखरेला चांगले दर होते. मात्र, आता साखरेचे दर पडल्यामुळे बँकांनी साखरेचे मूल्यांकन कमी केले आहे. त्यामुळे एफआरपीसाठी कारखान्यांना पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.साखर उताºयात ‘सोमेश्वर’ची बाजी४जिल्ह्यातील सर्वच कारखाने साखर उताºयातअजून साडेअकराच्या आतच घुटमळट आहेत. अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर बारा वर गेले आहे. मात्र, या हंगामात थंडीचे प्रमाण चांगले असूनही म्हणावा तेवढा साखर कारखान्यांना साखर उतारा मिळत नाही.सोमेश्वर कारखाना ११.९५ टक्के साखर उतारा मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. कर्मयोगी कारखान्याने १० लाख ११ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ८७ क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने १० लाख १९ हजार ६२५ मे. टन उसाचे गाळप करून ११ लाख ७१ हजार ४०० पोत्यांचे उत्पादन घेत दूसरा क्रमांक पटकाविलासोमेश्वर कारखाना :९ लाख ७ हजार ८१५ मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ७७ हजार ६५० पोत्यांचे उत्पादन घेत तिसºया क्रमांकावर आहे.साखर उतारासोमेश्वर कारखाना११.९५दौंड शुगर११.९१माळेगाव कारखाना११.९०

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे