शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील ६ कारखान्यांची धुराडी झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 02:43 IST

जिल्ह्यातील १६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी ६ लाख मे.टन उसाचे गाळप करून, १ कोटी १९ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे.

सोमेश्वरनगर  - जिल्ह्यातील १६ कारखान्यांपैकी ६ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. सर्व कारखान्यांनी मिळून १ कोटी ६ लाख मे.टन उसाचे गाळप करून, १ कोटी १९ लाख क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. तर, ११.९५चा सरासरी साखर उतारा ठेवत सोमेश्वर कारखान्याने साखर उताऱ्यात बाजी मारली आहे.यावर्षी जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांपेक्षा ऊसगाळपात खासगी कारखान्यांनी आघाडी घेतली आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी साखर कारखान्यांना पुरेसा ऊस उपलब्ध नसल्याचे चित्र होते. मात्र, उसाचे जादा टनेज बसू लागल्याने कारखान्यांनी ऊसगाळपास विलंब होत आहे. त्यातच राज्यातील साखर कारखाने १ नोव्हेंबरला सुरू करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्याने आणि कारखान्यांनी गेटकेन उसावर जादा भर दिल्याने सभासदांचे ऊस अजून शेतातच उभे आहेत.सर्व कारखाने बंद होण्यासाठी ऊस उत्पादकांना एक ते दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. जिल्ह्यातील भीमा पाटस, कर्मयोगी, नीरा भीमा, दौंड शुगर, व्यंकटेशकृपा आणि अनुराज शुगर या कारखान्यांनी आपल्या हंगामाची सांगता केली आहे. तर, उर्वरितअकरा कारखान्याने आपापल्या कार्यक्षेत्रातील ऊस संपविण्यासाठी सुरू आहेत.यावर्षी ऊसउत्पादकांचे उसाचे पीक उशिरा तुटल्याने गहू अथवा इतर तत्सम पिके शेतकºयांना घेता आली नाहीत. त्यामुळे टनेज घटून ऊसउत्पादाकांना अर्थिक तोटा सहन करावा लागणार आहे. अडसाली ऊस संपविण्यासाठी कारखान्यांना फेबु्रवारी महिना उजाडला. त्यामुळे हंगाम संपविण्यासाठी साखर कारखान्यांना अजून एक ते दिड महिन्यांचा कालावधी लागण्याची चिन्हे आहेत. तर दुसरीकडे हंगाम सुरू होताना साखरेला चांगले दर होते. मात्र, आता साखरेचे दर पडल्यामुळे बँकांनी साखरेचे मूल्यांकन कमी केले आहे. त्यामुळे एफआरपीसाठी कारखान्यांना पैशांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.साखर उताºयात ‘सोमेश्वर’ची बाजी४जिल्ह्यातील सर्वच कारखाने साखर उताºयातअजून साडेअकराच्या आतच घुटमळट आहेत. अनेक साखर कारखान्यांचे ‘डे’ चे साखर बारा वर गेले आहे. मात्र, या हंगामात थंडीचे प्रमाण चांगले असूनही म्हणावा तेवढा साखर कारखान्यांना साखर उतारा मिळत नाही.सोमेश्वर कारखाना ११.९५ टक्के साखर उतारा मिळवित जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे. कर्मयोगी कारखान्याने १० लाख ११ हजार मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ८७ क्विंटल पोत्यांचे उत्पादन घेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने १० लाख १९ हजार ६२५ मे. टन उसाचे गाळप करून ११ लाख ७१ हजार ४०० पोत्यांचे उत्पादन घेत दूसरा क्रमांक पटकाविलासोमेश्वर कारखाना :९ लाख ७ हजार ८१५ मे. टन उसाचे गाळप करून १० लाख ७७ हजार ६५० पोत्यांचे उत्पादन घेत तिसºया क्रमांकावर आहे.साखर उतारासोमेश्वर कारखाना११.९५दौंड शुगर११.९१माळेगाव कारखाना११.९०

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेPuneपुणे