शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
3
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
4
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
5
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
6
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
9
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
10
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
11
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
12
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
13
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
14
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
15
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
16
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
17
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
18
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
19
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
20
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी

वाहतूक कोंडीमुळे हिंजवडी आयटी पार्कला घरघर; 56 कंपन्यांचं स्थलांतर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2018 11:44 AM

अनेक कंपन्या राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कला रामराम करणार

पुणे: वाहतूक कोंडी आणि पायाभूत सोयी सुविधांचा अभाव यांच्यामुळे हिंजवडीमधील 56 कंपन्यांनी हिंजवडी आयटी पार्कमधून काढता पाय घेतला आहे. यामध्ये 6 बहुराष्ट्रीय आणि 50 लहान कंपन्यांचा समावेश आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये दोन मोठ्या कंपन्यांनी वाहतूक कोंडीला वैतागून बालेवाडी आणि खराडी परिसरात आपला मुक्काम हलवला आहे. यानंतर आता 56 कंपन्या हिंजवडीला रामराम करणार आहेत.राज्यातील सर्वात मोठं आयटी पार्क अशी हिंजवडीची ओळख आहे. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या आणि राष्ट्रीय कंपन्यांची कार्यालयं हिंजवडीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून आयटी पार्कला घरघर लागली आहे. ऑफिसला ये-जा करताना करावा लागणारा वाहतूक कोंडीचा सामना आणि पायाभूत सुविधांचा अभाव यांच्यामुळे अनेक कंपन्या हिंजवडीतून इतरत्र स्थलांतरित होत आहेत. हिंजवडीत कार्यालयात पोहोचण्यासाठी अनेक कर्मचाऱ्यांना दीड ते दोन तासांचा अवधी लागतो. तितकाच वेळ ऑफिसमधून घरी जाण्यासाठी लागतो. त्यामुळे दिवसातील किमान चार तास वाहतूक कोंडीत जातात. यामुळे अनेक कंपन्यांनी हिंजवडीला रामराम केला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये आयटी पार्कमधील दोन महत्त्वाच्या कंपन्या बालेवाडी आणि खराडीत स्थलांतरित झाल्या. यानंतर आता आणखी सहा बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडीतून काढता पाय घेतला आहे. तर आणखी 50 लहान कंपन्या वाकड, बाणेर, बालेवाडी आणि पुण्यातील अन्य भागांमध्ये स्थलांतरित झाल्या आहेत. त्यामुळे राज्यातील सर्वात मोठ्या आयटी पार्कला घरघर लागली आहे.  

टॅग्स :hinjawadiहिंजवडीITमाहिती तंत्रज्ञान