शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

पुणे महापालिकेच्या कारवाईत 5 कुटुंब बेघर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 5:03 PM

पुणे महानगरपालिकेच्या वारजे क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये डी पी रस्त्यावरील नवं सह्याद्री चाैकातील पाच घरे पाडण्यात आली आहेत.

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वारजे क्षेत्रिय कार्यालयाकडून करण्यात आलेल्या कारवाईमध्ये डी पी रस्त्यावरील नवं सह्याद्री चाैकातील पाच घरे पाडण्यात आली आहेत. या ठिकाणी रस्त्याचे काम सुरु असून ही घरे रस्त्यात येत असल्याने पाडण्यात आली आहेत. या कारवाईमुळे येथील पाच कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. महापालिकेकडून या नागरिकांना इतर ठिकाणी घरे दिल्याचे सांगितले जात असले तरी घरे मिळाली नसल्याचे या नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच या भागात असणाऱ्या आणि एनजीटीकडून नाेटीस देण्यात आलेल्या अतिक्रमणांवर पालिकेकडून कारवाई करण्यात आलेली नाही त्यामुळे गरीबांवरच कारवाईचा बडका का असा सवाल आता येथील नागरिक विचारत आहेत. 

गेल्या पंन्नास वर्षांपासून येथे पाच कुटुंबे राहत आहेत. सध्या राजाराम पुलापासून डी पी रस्त्याच्या रंदीकरणाचे काम सुरु आहे. या रुंदीकरणामध्ये ही घरे बाधीत हाेणार हाेती. याबाबत पालिकेने या घर मालकांना नाेटीस दिली हाेती. 13 तारखेला दिलेल्या नाेटीसमध्ये घर रिकामे करुन पुनर्वसन केलेल्या ठिकाणी राहण्यास जावे असे आदेश पालिकेकडून देण्यात आले हाेते. पालिकेने घरेच दिली नसल्याचा आराेप येथील रहिवासी करत आहेत. काही वर्षांपूर्वी घरे देण्यात आली परंतु ती घरे सध्या येथे राहत असणाऱ्या कुटुंबीयांच्या आई वडीलांना देण्यात आली आहेत. त्याचबराेबर एसआरए कायद्यानुसार मुलांना देखील घरे देण्यात यायला हवीत असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. तसेच गेली 50 वर्षे याच ठिकाणी राहत असल्याचा दावा येथील कुटुंबे करत आहेत. महापालिकेने केलेल्या कारवाईमुळे ही कुटुंबे बेघर झाली असून जाेपर्यंत घरे मिळत नाहीत ताेपर्यंत येथेच बसून राहणार असल्याचा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. 

येथे राहणाऱ्या रेश्मा पवळ म्हणाल्या, गेल्या 50 वर्षांपासून आम्ही येथे राहताेय. 13 तारखेला आमच्या घरावर नाेटीस लावण्यात आली. काल आमची घरं बुलडाेझर आणून पाडण्यात आली. महापालिका म्हणते आम्हाला पुनर्वसनाअंतर्गत घरे देण्यात आली आहेत. प्रत्यक्षात आम्हाला कुठलिही घरे देण्यात आलेली नाहीत. ज्या घरांबाबात पालिका बाेलतीये ती घरे आमच्या सासू सासऱ्यांना देण्यात आली आहेत. अचानक करण्यात आलेल्या कारवाईमुळे आम्ही रस्त्यावर आलाे आहाेत. रस्त्यावर राहत असल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. आमचा संसारच उघड्यावर आला आहे. 

तुकाराम एडके म्हणाले, काल घरी पुरुष मंडळी नसताना महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने आमची घरे पाडली. अधिकाऱ्यांनी याेग्य वर्तन केले नाही. घरातले सामान रस्त्यावर फेकून दिले. 13 तारखेला नाेटीस लावली आणि लगेच 15 तारखेला कारवाई करण्यात आली. मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. महापालिका म्हणते तुमची दुसरीकडे व्यवस्था केली आहे, तुम्हाला घरे दिली आहेत. परंतु आम्हाला कुठलिही घरे दिलेलीच नाहीत. या कुटुंबाच्या फाईल्स महापालिकेकडे आहेत. त्यांना अद्याप घरे देण्यात आलेली नाहीत. असे असताना थेट कारवाई करण्यात आली. राजारामपूल ते म्हात्रे पुलादरम्यान असणारी बेकायदेशीर बांधकामे तशीच आहेत. त्यांच्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. केवळ गरीबांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिका म्हणते तुमच्या आई वडीलांना घरे दिली आहेत, तिकडे जाऊन रहा परंतु आमची तिसरी पिढी येथे राहत आहे. आई वडीलांना देण्यात आलेल्या छाेट्याशा खाेल्यांमध्ये संपूर्ण कुटुंब राहणे शक्य नाही. 

याविषयी बाेलताना पालिकेच्या वारजे क्षेत्रिय कार्यलयाचे अधिकारी गणेश साेनूने म्हणाले, यापूर्वी तीन वेळेला त्यांना नाेटीस देण्यात आली हाेती. त्यांना घरे देण्यात आल्याची माहिती सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहे. सर्व नियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे. ज्या दाेन कुटुंबांना घरे देण्याचे बाकी हाेते त्यांच्यासाठी तात्पुरत्या निवासाची साेय करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाPuneपुणे