शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

बारा वर्षांत ४२ हजार शेतक-यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 4:51 AM

पावसाने ओढ दिल्याने येणारी नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात गेल्या १२ वर्षांत ४२ हजार ४८२ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

विशाल शिर्के ।पुणे : पावसाने ओढ दिल्याने येणारी नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे राज्यात गेल्या १२ वर्षांत ४२ हजार ४८२ शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. देशभरात १ लाख ७१ हजार ८०५ शेतकºयांच्या आत्महत्या झाल्या. देशात राज्यातील या आत्महत्यांचे प्रमाण २८ टक्के आहे.पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून मिळविलेल्या माहितीतून हे विदारक वास्तव समोर आले आहे. २०१६चा शेतकरी आत्महत्यांचा अहवाल अद्याप प्रसिद्ध झाला नसल्याने, त्या वर्षाची आकडेवारी यात समाविष्ट नाही.देशांत महाराष्ट्रासारख्या प्रगत प्रदेशातच सातत्याने सर्वाधिक आत्महत्येची नोंद होत आहे. महाराष्ट्रापाठोपाठ कर्नाटकातील (१४ टक्के) आणि आंध्र प्रदेशातील (१२.३४ टक्के) शेतकºयांनी आपली जीवनयात्रा संपविली असून, केरळसारखे १०० टक्के साक्षर राज्यदेखील या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. आंध्र प्रदेशात २४ हजार ७२ आणि कर्नाटकात २१ हजार २०१ आत्महत्यांची नोंद झाली आहे.मध्य प्रदेशात शेतकरी आत्महत्येचा आकडा १४ हजार ५३० इतका आहे. उत्तर प्रदेशात ६ हजार २१२, गुजरातेत ५ हजार ४०५, राजस्थान ५ हजार ९३, ओडिसात बावीसशे आणि बिहारमध्ये ७४६ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. ईशान्येकडील राज्यांपैकी आसाममध्ये सर्वाधिक ३ हजार २०३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.>आत्महत्याग्रस्त राज्यांची आकडेवारीराज्य २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५महाराष्ट्र ३,३३७ ३,७८६ ३,१४६ २,५६८ ३०३०कर्नाटक २,१०० १,८७५ १,४०३ ३,२१ १,१९७आंध्र प्रदेश २,२०६ २,५७२ २,०१४ १६० ५१६मध्य प्रदेश १,३२६ १,१७२ १,०९० ८२६ ५८१