शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

बेशिस्तांना ३७ कोटी दंड, वाहतूक पोलिसांकडून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 02:45 IST

पुणे शहर वाहतूकदृष्ट्या ‘बेशिस्ती’चे शहर म्हणून गणले जाऊ लागले असून गेल्या वर्षभरात बेशिस्त वाहनचालकांनी तब्बल ३७ कोटींचा दंड भरला आहे. वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाºया दंड वसुलीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक नियमभंग करणाºया वाहनचालकांची संख्या पोलिसांच्या कारवाईपेक्षा अधिक गतीने वाढत चालली आहे.

- लक्ष्मण मोरेपुणे : पुणे शहर वाहतूकदृष्ट्या ‘बेशिस्ती’चे शहर म्हणून गणले जाऊ लागले असून गेल्या वर्षभरात बेशिस्त वाहनचालकांनी तब्बल ३७ कोटींचा दंड भरला आहे. वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाºया दंड वसुलीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून वाहतूक नियमभंग करणाºया वाहनचालकांची संख्या पोलिसांच्या कारवाईपेक्षा अधिक गतीने वाढत चालली आहे. वाहतूक शाखेने सुरू केलेल्या आॅनलाईन दंड वसुली आणि सीसीटीव्ही कारवाईमधून तब्बल ३२ लाख रुपयांची दंड वसुली करण्यात आली आहे.शिक्षणाचे माहेरघर, आयटी सिटी आणि आता स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या पुण्याची ‘बेशिस्त वाहनचालकांचे शहर’ अशी नवी ओळख पडत चालली असून पुणेकरांमध्ये अद्यापही वाहतूक निरक्षरता मोठ्या प्रमाणावर असल्याचे चित्र आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहतूक नियमभंगाच्या पावत्या फाडण्याचा विक्रम पुणेकरांनी यंदाही कायम ठेवला आहे. सर्वच क्षेत्रात आघाडीवर असलेले पुणे शहर राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत वाहतूक नियमभंगामध्येही अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ‘जिथे कमी तिथे आम्ही’ असे अभिमानाने सांगणारे पुणेकरांकडून वाहतूक नियमभंगासाठी ३७ कोटींचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही दंडवसुली आतापर्यंत सर्वांत उच्चांकी दंडवसुली आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत वाहतूक पोलिसांनी विविध प्रकारच्या केलेल्या कारवायांमध्ये यामध्ये किरकोळ आणि सहज टाळता येण्याजोग्या चुका वाहनचालकांकडून अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. किरकोळ स्वरूपाचे वाहतुकीचे नियमही पाळण्यात वाहनचालकांची मोठी उदासिनता कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाली आहे. एरवी टाळता येण्याजोग्या सिग्नल तोडणे, नो एंट्रीमध्ये वाहन घालणे, नो पार्किंग, झेब्रा क्रॉसिंगवर वाहन लावणे, बेदरकारपणे वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे, काळ्या काचा लावणे, जोरजोरात हॉर्न वाजविणे, कागदपत्र जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने येणे, पदपथावर वाहन लावणे अथवा चालवणे यासोबतच फॅन्सी नंबर प्लेट, लेन कटिंग वाहनांना रिफ्लेक्टर न लावणे, रहदारीस अडथळा करणे अशा टाळता येण्याजोग्या चुका वाहन चालकांकडून झालेल्या आहेत.किरकोळ स्वरूपाच्या वाटणाºया चुका केवळ दंड भरण्यापुरत्या मर्यादीत राहिलेल्या नसून या चुकांमुळेच अनेकदा गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अपघातांचे गांभिर्य कमी झाल्यामुळे वाहनचालकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेदरकारपणा येऊ लागला आहे. विशेषत: दुचाकी आणि मोटार सायकलचालकांमध्ये हे प्रमाण अधिक पाहायला मिळते. वाहतुकीचे नियम वाहनचालकांच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आहेत याचा विसर वाहनचालकांना पडलेला आहे. केवळ वाहन चालवता आले म्हणजे झाले, असे नसून वाहतूक साक्षरता येणेही आवश्यक आहे.विनाहेल्मेट कारवाई थंडावलीहेल्मेट वापर न करणाºयांवरील कारवाई थंडावली असून वर्षभरात २८ हजार जणांविरुद्ध हेल्मेट कारवाई करण्यात आली असून पोलिसांनी १ कोटी ३९ लाख ६८ हजारांचा दंड वसूल केला आहे.केंद्र शासनाने नवीन कायदा करून वाहतूक नियमभंगाच्या दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवायांमधील दंड वसुलीच्या रकमेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.वाहनचालकांचे प्रबोधन करण्यासाठी वाहतूक पोलीस वर्षभर विविध प्रकारच्या जनजागृती मोहिमा घेत असतात़ यासोबतच स्वयंसेवी संस्था आणि शालेय विद्यार्थीही रस्त्यावर उतरून वाहनचालकांना वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करत असतात़ मात्र, वाहनचालकांमध्ये अद्यापही वाहतुकचे नियम पाळण्याबाबत जागरुकता आलेली नसल्याचे चित्र दिसून येत आहे़

टॅग्स :Puneपुणे