शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सिंहगडाच्या "त्या" थरारक लढाईला आज झाली 350 वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:30 IST

आज पासून 350 वर्षापूर्वी सिंहगड्याची लढाई झाली हाेती. या लढाईत मराठ्यांनी सिंहगड स्वराज्यात आणला हाेता.

पुणे : माघ वद्य अष्टमीची ती भयाण रात्र हाेती. सर्वत्र अंधार पसरलेला हाेता. काेंढाण्यावर (आताचा सिंहगड) किल्लेदार उद्यभान राठाेड याच्याकडे सुमारे 1500 हशमांची फाैज हाेती. तर दुसरीकडे पाचशे मावळ्यांच्या फाैजेसह तानाजी मालुसरे सिंहगड जिंकण्यासाठी राजगडावरुन निघाले हाेते. आजपासून ठिक 350 वर्षापूर्वी 4 फेब्रुवारी 1670 राेजी काेंढाण्याची लढाई झाली. या लढाईत मराठ्यांनी मुघलांना कडवी झुंज देत काेंढाणा स्वराज्यात आणला हाेता. या लढाईत सेनापती तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. ''गड आला पण सिंह गेला'' अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा गाैरव केला हाेता. 

पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना स्वराज्यातील 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले हाेते. त्यात काेंढाण्याचा देखील समावेश हाेता. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला. काेंढाणा हा मुघलांना लष्करी दृष्टीने महत्वाचे ठिकाण होते. शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी ''राजगड'' केवळ काही मैलांवर होती. तसेच या ठिकाणावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण मिळवता येत होते. म्हणून मुघलांनी या किल्यावर जास्त शिबंदी व सैन्य तैनात केले होते. या किल्याचे नेतृत्व राजपुतांकडे देण्यात आले होते. ''उदयभान राठोड'' हा मोघल सरदार किल्लेदार होता. शिवाजी महाराजांना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते. म्हणून हा किल्ला परत घेणे अत्यंत गरजेचे होते.

काेंढाणा जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी ''तानाजी मालुसरे'' यांना दिली हाेती. जेव्हा त्यांना ही गाेष्ट समजली तेव्हा त्यांच्या मुलाचे लग्न हाेते. शिवाजी महाराजांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवत काेंढाणा सर करण्याचा विडा उचलला. ''आधी लगीन काेंढाण्याचे मग माझ्या रायबाचे'' हे त्यांचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत. काेंढाण्याची जबाबदारी मुघलांनी उदयभान राठाेड याच्याव साेपवली हाेती. त्याच्या हाताखाली सुमारे 1500 हशमांची फाैज हाेती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. 

द्राेणगिरीचा कडा चढून मराठ्यांचे सैन्य काेंढाण्यावर गेले. गडावर उदयभानाच्या सैन्याशी घमासान युद्ध झाले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता.

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाPuneपुणेhistoryइतिहास