शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
4
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
5
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
6
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
7
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
8
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
9
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
10
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
11
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
12
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
13
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
14
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
15
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
16
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
17
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
18
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
19
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
20
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!

सिंहगडाच्या "त्या" थरारक लढाईला आज झाली 350 वर्षे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 16:30 IST

आज पासून 350 वर्षापूर्वी सिंहगड्याची लढाई झाली हाेती. या लढाईत मराठ्यांनी सिंहगड स्वराज्यात आणला हाेता.

पुणे : माघ वद्य अष्टमीची ती भयाण रात्र हाेती. सर्वत्र अंधार पसरलेला हाेता. काेंढाण्यावर (आताचा सिंहगड) किल्लेदार उद्यभान राठाेड याच्याकडे सुमारे 1500 हशमांची फाैज हाेती. तर दुसरीकडे पाचशे मावळ्यांच्या फाैजेसह तानाजी मालुसरे सिंहगड जिंकण्यासाठी राजगडावरुन निघाले हाेते. आजपासून ठिक 350 वर्षापूर्वी 4 फेब्रुवारी 1670 राेजी काेंढाण्याची लढाई झाली. या लढाईत मराठ्यांनी मुघलांना कडवी झुंज देत काेंढाणा स्वराज्यात आणला हाेता. या लढाईत सेनापती तानाजी मालुसरे धारातीर्थी पडले. ''गड आला पण सिंह गेला'' अशा शब्दात छत्रपती शिवाजी महाराज यांनी तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा गाैरव केला हाेता. 

पुरंदरच्या तहात शिवाजी महाराजांना स्वराज्यातील 23 किल्ले मुघलांना द्यावे लागले हाेते. त्यात काेंढाण्याचा देखील समावेश हाेता. आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी मुघलांकडे गेलेले किल्ले परत मिळवण्याचा सपाटा लावला. काेंढाणा हा मुघलांना लष्करी दृष्टीने महत्वाचे ठिकाण होते. शिवाजी महाराजांच्या राज्याची राजधानी ''राजगड'' केवळ काही मैलांवर होती. तसेच या ठिकाणावरून पुणे परिसरावर चांगलेच नियंत्रण मिळवता येत होते. म्हणून मुघलांनी या किल्यावर जास्त शिबंदी व सैन्य तैनात केले होते. या किल्याचे नेतृत्व राजपुतांकडे देण्यात आले होते. ''उदयभान राठोड'' हा मोघल सरदार किल्लेदार होता. शिवाजी महाराजांना देखील राजगडाच्या इतक्या जवळ मुघल अस्तित्व नको होते. म्हणून हा किल्ला परत घेणे अत्यंत गरजेचे होते.

काेंढाणा जिंकण्याची जबाबदारी शिवाजी महाराजांनी ''तानाजी मालुसरे'' यांना दिली हाेती. जेव्हा त्यांना ही गाेष्ट समजली तेव्हा त्यांच्या मुलाचे लग्न हाेते. शिवाजी महाराजांनी दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी मुलाच्या लग्नाची तयारी बाजूला ठेवत काेंढाणा सर करण्याचा विडा उचलला. ''आधी लगीन काेंढाण्याचे मग माझ्या रायबाचे'' हे त्यांचे शब्द इतिहासात अजरामर झाले आहेत. काेंढाण्याची जबाबदारी मुघलांनी उदयभान राठाेड याच्याव साेपवली हाेती. त्याच्या हाताखाली सुमारे 1500 हशमांची फाैज हाेती. ४ फेब्रुवारीच्या (माघ वद्य अष्टमी) रात्री तानाजी मालुसरे याच्या नेतृत्वाखाली राजगडावरून निघालेले मराठा सैन्य गुंजवणी नदी पार करत सिंहगडाच्या पायथ्याला येऊन पोचले. ती भयाण काळोखी रात्र होती. कोंढाण्यावर जाण्याचा मार्ग त्यांनी निवडला, तो म्हणजे शत्रूच्या ध्यानीमनी न येणारा प्रचंड असा द्रोणगिरीचा कडा. 

द्राेणगिरीचा कडा चढून मराठ्यांचे सैन्य काेंढाण्यावर गेले. गडावर उदयभानाच्या सैन्याशी घमासान युद्ध झाले. शत्रूशी बेभान होऊन लढताना तानाजींच्या हातातील ढाल पडल्यावरही, डाव्या हातावर घाव घेत उदयभानाला निपचित पाडूनच स्वतःचे प्राण तानाजींनी सोडले. मात्र त्यांच्यामागून 'सूर्याजी मालुसरे' आणि 'शेलारमामा' यांनी नेतृत्व करून हा किल्ला काबीज केला. गडावरील गवताच्या गंज्या पेटवून किल्ला जिंकला गेल्याचा इशारा राजांना राजगडावरती दिला गेला होता.

टॅग्स :sinhagad fortसिंहगड किल्लाPuneपुणेhistoryइतिहास