शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

पोलिसांमुळे ३२ मुले गुन्हेगारीच्या विळख्यातून बाहेर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 01:56 IST

मित्राने आणलेली मोटारसायकल पाहून तो त्याच्याबरोबर मागे बसला व ते फिरत असताना त्यांना पोलिसांनी पकडले.  मित्राबरोबर त्याच्यावरही वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला.

- विवेक भुसेपुणे  - मित्राने आणलेली मोटारसायकल पाहून तो त्याच्याबरोबर मागे बसला व ते फिरत असताना त्यांना पोलिसांनी पकडले.  मित्राबरोबर त्याच्यावरही वाहनचोरीचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे घरातील तसेच आजूबाजूचे लोकही त्याच्याकडे वाईट नजरेने पाहू लागले़ कोणताही सहभाग नसताना त्याच्यावर चोरीचा शिक्का बसला. प्रचंड नैराश्य आलेल्या या मुलाला पोलिसांनी मार्गदर्शन व मदत केल्याने तो आता या सर्व परिस्थितीतून बाहेर आला आहे़ आता तो बारावीत आहे. शहरातील वाढत्या गुन्हेगारीमध्ये बालगुन्हेगारांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे़ एकदा त्यांच्यावर एखादा गुन्हा दाखल झाला की त्याच्याकडे आजूबाजूचे लोक गुन्हेगार, चोर म्हणून पाहतात़ मित्रांकडून हेटाळणी होते़ त्यामुळे तो इतरांपासून तुटत जाऊन आपोआप गुन्हेगारीकडे ओढला जातो़ त्यातून कायमचा गुन्हेगार होतो.पुणे शहरात गेल्या तीन वर्षांत तब्बल दीड हजार अल्पवयीन मुले बालगुन्हेगार किंवा विधीसंघर्षित ठरले आहे़ ही मुले कायमस्वरूपी गुन्हेगारीत ओढली जाऊ नये, यासाठी पोलिसांनी विशेष बालपथकाची स्थापना केली आहे़ या माध्यमातून मुलांचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन केले जाते़ त्यांना यातून दूर करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत केली जाऊ लागली आहे. पुणे पोलिसांनी ३२ मुलांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारीपासून दूर केले आहे़ अल्पवयीन मुलांकडून अनेकदा हौस म्हणून वाहनचोरी करून ती फिरविली जाते़ त्यात ते पकडले गेले की, त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का बसतो़ अनेकदा काही जण त्यांचा वापर करून घेत असतात़याबाबत विशेष बालपथकाचे पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब भोर यांनी सांगितले की, भरोसा सेल अंतर्गत विशेष बालपथकाची स्थापना करण्यात आली आहे़विधीसंघर्षग्रस्त मुलांचे समुपदेशन करून त्यांना गुन्हेगारीपासून रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे़ त्यासाठी या क्षेत्रात कामकरणारे कार्यकर्ते तसेच १९ सामाजिक संस्थांची मदत घेण्यात येत आहे. विधीसंघर्षग्रस्त मुलांची संख्या मोठी आहे़ त्यामुळे त्यांच्या तसेच त्यांच्या पालकांच्या प्रत्येक पोलीस ठाण्यात बैठका घेऊन त्यांना मार्गदर्शन केले.  जात आहे़ आतापर्यंत २२ पोलीस ठाण्यांमध्ये अशा बैठका घेण्यात आल्या आहेत़या मुलांना पुन्हा मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काय मदत करता येतील़ शिक्षण घेण्यासाठी मदत हवी आहे का? काही मुले आता १८ वर्षांची झाली आहेत़ त्यांना नोकरीची गरज असते़ त्याच्यासाठी प्रयत्न केला जात आहे़मुले आणि पालकांची दर महिन्यांना एकत्रित बैठका घेण्यात येणार असून त्यातून या मुलांना व त्यांच्या पालकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ त्यासाठी स्वंयसेवी संस्थांची मदत घेतली जात असल्याचे भोर यांनी सांंगितले़गेल्या तीन वर्षांत सुमारे दीड हजार विधीसंघर्षग्रस्त मुलेमुले व पालकांच्या एकत्रित बैठका घेऊन त्यांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्नस्वयंसेवी संस्थांची मदतआतापर्यंत ३२ मुलांचे समुपदेशनशिक्षण, नोकरीसाठी मुलांना सहाय्यमुलांच्या हक्काचे सरंक्षण होईल याकडे लक्षलवकरच सर्वांचा एकत्रित मेळावा घेण्याचे नियोजन1 एक मुलगा सातवी शिकत असताना त्याच्यावर सायकल चोरीचा आरोप झाला़ त्यामुळे तो मनातून खचला होता़ त्याचे व त्याच्या पालकांचे पोलिसांनी समुपदेशन केले़ शिक्षणासाठी मदत केली़ त्यातून तो दहावीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाला आहे़2या मुलांकडे व त्यांच्या पालकांकडे पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर देण्यात आले आहेत़ त्यांना काहीही मदत लागली तर त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले आहे़3पोलिसांनी बोलावले म्हटल्यावर पूर्वी ही मुले व त्यांचे पालक येण्यास घाबरत असत़ त्यांना वाटायचे की हे आपल्याला एखाद्या गुन्ह्यात अडकवतील़ आता त्यांना विश्वास वाटू लागल्याने ते स्वत: होऊन विशेष बालपथकाच्या कक्षात येऊ लागले आहेत़ या सर्वांचा एकत्रित मेळावा लवकरच घेण्याचा विचार असल्याचे बाळासाहेब भोर यांनी सांगितले़ 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिस