शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
4
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
6
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
7
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
8
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
9
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
10
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
11
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
12
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
13
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
14
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
15
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
16
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
17
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
18
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
19
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
20
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार

On The Spot Report: ३ हजार आसनक्षमतेचे 'तालकटोरा'; दिल्लीतील गोलाकार स्टेडियममध्ये मराठीचा जागर!

By श्रीकिशन काळे | Updated: February 11, 2025 15:46 IST

मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होणार आहे

पुणे : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीमध्ये यंदा होत आहे. येथील तालकटोरा स्टेडियममध्ये हे संमेलन होणार असून, त्यामध्ये तीन हजार लोकांना बसण्याची सोय आहे. गोलाकार असे स्टेडियम आहे. मधोमध व्यासपीठ उभारण्यात येईल. पुस्तकांचे स्टॉल्स स्टेडियमच्या बाहेर प्रांगणात असतील. संमेलनाच्या आदल्या दिवशी संमेलनाच्या तयारीसाठी स्टेडियम उपलब्ध होणार आहे.

आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर, मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होत आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.

व्यासपीठ एका बाजूला असेल !

स्टेडियम गोलाकार आहे. त्यामुळे मधोमध असलेल्या जागेत एका बाजूला व्यासपीठ उभे केले जाईल. त्यामुळे त्या व्यासपीठाच्या मागील खुर्च्यां रिकाम्या असतील. साधारण दोन-तीनशे लोकांना तिथे बसता येणार नाही. अडीच हजार लोकांना पाहता येईल, अशी सोय होईल.

तालकटोरा ठिकाणच का ?

नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे पानीपतचे युध्द लढले तेव्हा याच ठिकाणावर तळ ठोकून होते. त्यामुळे त्या भूमिला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या ठिकाणी २८ नोव्हेंबर १९७४ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी स्टेडियमचे उद्घाटन केले होते. मराठ्यांनी तालकटोरा भागात आपला पराक्रम गाजवला, म्हणून त्याच ठिकाणी मराठीचा जागर होत आहे.

दिल्लीत संमेलना ठिकाणी कसे जाल ?

संमेलनाशी संबंधित माहिती, घडामोडी आणि संवादासाठी abmssdelhi.org या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून तालकटोरा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रो मार्गाचा वापर करता येतो. नवी दिल्ली मेट्रो स्टेशनपासून राजीव चौक (यलो लाईनने प्रवास करून) आणि त्यानंतर रामकृष्ण आश्रम/ आरके आश्रम पर्यंत जाता येईल.

दिल्लीमध्ये १९५४ साली मराठी साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे संमेलनाध्यक्ष होते. त्यामुळे तब्बल ७७ वर्षानंतर दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी ऐतिहासिक जागा तालकटोरा निवडली. कारण या ठिकाणी मराठे पानीपतचे युध्द लढले तेव्हा तळ ठोकून होते. त्या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. -संजय नहार, आयोजक, ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीmarathiमराठीakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळSocialसामाजिक