शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

On The Spot Report: ३ हजार आसनक्षमतेचे 'तालकटोरा'; दिल्लीतील गोलाकार स्टेडियममध्ये मराठीचा जागर!

By श्रीकिशन काळे | Updated: February 11, 2025 15:46 IST

मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होणार आहे

पुणे : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीमध्ये यंदा होत आहे. येथील तालकटोरा स्टेडियममध्ये हे संमेलन होणार असून, त्यामध्ये तीन हजार लोकांना बसण्याची सोय आहे. गोलाकार असे स्टेडियम आहे. मधोमध व्यासपीठ उभारण्यात येईल. पुस्तकांचे स्टॉल्स स्टेडियमच्या बाहेर प्रांगणात असतील. संमेलनाच्या आदल्या दिवशी संमेलनाच्या तयारीसाठी स्टेडियम उपलब्ध होणार आहे.

आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर, मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होत आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.

व्यासपीठ एका बाजूला असेल !

स्टेडियम गोलाकार आहे. त्यामुळे मधोमध असलेल्या जागेत एका बाजूला व्यासपीठ उभे केले जाईल. त्यामुळे त्या व्यासपीठाच्या मागील खुर्च्यां रिकाम्या असतील. साधारण दोन-तीनशे लोकांना तिथे बसता येणार नाही. अडीच हजार लोकांना पाहता येईल, अशी सोय होईल.

तालकटोरा ठिकाणच का ?

नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे पानीपतचे युध्द लढले तेव्हा याच ठिकाणावर तळ ठोकून होते. त्यामुळे त्या भूमिला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या ठिकाणी २८ नोव्हेंबर १९७४ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी स्टेडियमचे उद्घाटन केले होते. मराठ्यांनी तालकटोरा भागात आपला पराक्रम गाजवला, म्हणून त्याच ठिकाणी मराठीचा जागर होत आहे.

दिल्लीत संमेलना ठिकाणी कसे जाल ?

संमेलनाशी संबंधित माहिती, घडामोडी आणि संवादासाठी abmssdelhi.org या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून तालकटोरा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रो मार्गाचा वापर करता येतो. नवी दिल्ली मेट्रो स्टेशनपासून राजीव चौक (यलो लाईनने प्रवास करून) आणि त्यानंतर रामकृष्ण आश्रम/ आरके आश्रम पर्यंत जाता येईल.

दिल्लीमध्ये १९५४ साली मराठी साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे संमेलनाध्यक्ष होते. त्यामुळे तब्बल ७७ वर्षानंतर दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी ऐतिहासिक जागा तालकटोरा निवडली. कारण या ठिकाणी मराठे पानीपतचे युध्द लढले तेव्हा तळ ठोकून होते. त्या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. -संजय नहार, आयोजक, ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीmarathiमराठीakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळSocialसामाजिक