शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

On The Spot Report: ३ हजार आसनक्षमतेचे 'तालकटोरा'; दिल्लीतील गोलाकार स्टेडियममध्ये मराठीचा जागर!

By श्रीकिशन काळे | Updated: February 11, 2025 15:46 IST

मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होणार आहे

पुणे : ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्लीमध्ये यंदा होत आहे. येथील तालकटोरा स्टेडियममध्ये हे संमेलन होणार असून, त्यामध्ये तीन हजार लोकांना बसण्याची सोय आहे. गोलाकार असे स्टेडियम आहे. मधोमध व्यासपीठ उभारण्यात येईल. पुस्तकांचे स्टॉल्स स्टेडियमच्या बाहेर प्रांगणात असतील. संमेलनाच्या आदल्या दिवशी संमेलनाच्या तयारीसाठी स्टेडियम उपलब्ध होणार आहे.

आपल्या मायमराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला आणि याच पार्श्वभूमीवर, मायमराठीचा जागर करण्यासाठी ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१, २२ आणि २३ फेब्रुवारी २०२५ या तीन दिवसांत होत आहे. भाषा, संस्कृती, राष्ट्रभावना, मानवता आणि एकात्मता यांचा आगळा मिलाफ यानिमित्ताने महाराष्ट्र वा देशातीलच नव्हे, अवघ्या जगातील साहित्यरसिक देशाच्या राजधानीत अनुभवणार आहेत.

व्यासपीठ एका बाजूला असेल !

स्टेडियम गोलाकार आहे. त्यामुळे मधोमध असलेल्या जागेत एका बाजूला व्यासपीठ उभे केले जाईल. त्यामुळे त्या व्यासपीठाच्या मागील खुर्च्यां रिकाम्या असतील. साधारण दोन-तीनशे लोकांना तिथे बसता येणार नाही. अडीच हजार लोकांना पाहता येईल, अशी सोय होईल.

तालकटोरा ठिकाणच का ?

नवी दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमला देखील ऐतिहासिक महत्त्व आहे. मराठे पानीपतचे युध्द लढले तेव्हा याच ठिकाणावर तळ ठोकून होते. त्यामुळे त्या भूमिला ऐतिहासिक महत्त्व आहे. त्या ठिकाणी २८ नोव्हेंबर १९७४ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी स्टेडियमचे उद्घाटन केले होते. मराठ्यांनी तालकटोरा भागात आपला पराक्रम गाजवला, म्हणून त्याच ठिकाणी मराठीचा जागर होत आहे.

दिल्लीत संमेलना ठिकाणी कसे जाल ?

संमेलनाशी संबंधित माहिती, घडामोडी आणि संवादासाठी abmssdelhi.org या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशनपासून तालकटोरा स्टेडियमला पोहोचण्यासाठी मेट्रो मार्गाचा वापर करता येतो. नवी दिल्ली मेट्रो स्टेशनपासून राजीव चौक (यलो लाईनने प्रवास करून) आणि त्यानंतर रामकृष्ण आश्रम/ आरके आश्रम पर्यंत जाता येईल.

दिल्लीमध्ये १९५४ साली मराठी साहित्य संमेलन झाले होते. तेव्हा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे संमेलनाध्यक्ष होते. त्यामुळे तब्बल ७७ वर्षानंतर दिल्लीत मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्यासाठी ऐतिहासिक जागा तालकटोरा निवडली. कारण या ठिकाणी मराठे पानीपतचे युध्द लढले तेव्हा तळ ठोकून होते. त्या जागेला ऐतिहासिक महत्त्व आहे. -संजय नहार, आयोजक, ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीmarathiमराठीakhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळSocialसामाजिक