शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

किसान सन्मान निधीला ३ लाख जण मुकणार? नवे शेतकरी महसूलच्या पात्रतेच्या कात्रीत

By नितीन चौधरी | Updated: June 7, 2023 06:19 IST

महसूल विभागाने शेतकऱ्यांना पात्र न ठरवल्यास राज्यभरातील सुमारे ३ लाख १४ हजार शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत.

नितीन चौधरी, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: पीएम किसान सन्मान योजनेतील पात्र शेतकरीच राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजनेतही पात्र ठरणार आहेत. या दोन्ही योजनांचा लाभ घेण्यासाठी नव्या शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, सव्वातीन लाख शेतकऱ्यांचे अर्ज महसूल विभागाच्या मान्यतेअभावी प्रलंबित आहेत. कृषी विभागाने दिलेली आकडेवारी चुकीची असून शेतकऱ्यांची कागदपत्रे तपासून त्यांना पात्र ठरविण्यात येत असल्याचे महसूल विभागाचे म्हणणे आहे. मात्र, या साठमारीत हे शेतकरी केंद्राच्या चौदाव्या व राज्याच्या पहिल्या हप्त्यापासून वंचित राहण्याची भीती आहे.

राज्यातील एक कोटी १७ लाख तीन हजार ८८९ शेतकऱ्यांनी पीएम किसान योजनेसाठी नावनोंदणी केली होती. त्यापैकी ९७ लाख ७४ हजार ४३० शेतकरी यासाठी पात्र ठरले. मात्र, त्यानंतर या योजनेच्या पात्रता निकषांमध्ये बदल करण्यात आले. त्यानुसार पात्र केलेल्या शेतकऱ्यांची संख्या राज्यात ७१ लाख चार हजार ४८४ इतकी आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नव्याने अर्ज केलेले आहेत.

शेतकऱ्यांनी अपलोड केलेले कागदपत्र पडताळणी करण्यासाठी त्यांना प्रत्यक्ष बोलावून पात्र ठरवले जात आहे. नवे उतारे जोडावे लागतात. त्यानंतरच त्यांना पात्र केले जाते, अशी माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील सूत्रांनी दिली.

चौदावा हप्ता लवकरच 

- पीएम किसान सन्मान योजनेचा चौदावा हप्ता येत्या आठवडाभरात मिळण्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. याच पात्र शेतकऱ्यांना राज्य सरकारची नमो शेतकरी योजना लागू केली जाणार आहे. 

- त्यामुळे शेतकऱ्यांना एकाचवेळी दोन्ही योजनांचा मिळून चार हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे. महसूल विभागाने शेतकऱ्यांना पात्र न ठरवल्यास राज्यभरातील सुमारे तीन लाख १४ हजार शेतकरी या लाभापासून वंचित राहणार आहेत.

 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना