शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

सीमेवरील सैनिकांकरिता २५ हजार राख्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:51 IST

समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करुन देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, याकरीता १९९८ पासून हा सातत्याने राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देकच्छ, सियाचीन, आसाम,काश्मीर, राजस्थान, पंजाब, बंगाल आदी १५० सीमाभागांत प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या

पुणे : भारतीयांच्या रक्षणासाठी सैनिक देशाच्या सीमेवर लढत असतात. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी हे सैनिक आपल्या कुटुंबाला विसरून आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडत असतात. अनेक सण-समारंभ देखील ते आपल्या कुटुंबियांसमवेत साजरे करु शकत नाहीत. सण-समारंभाच्यावेळी आपल्या परिवाराबरोबर आपण सण साजरा करतो आहे, असे त्यांना वाटावे. यासाठी आपल्याबरोबरच आपल्या देशाचे सदैव रक्षण करणा-या सरहदवर लढणा-या सैनिकांना आपला भाऊ मानणा-या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी पंचवीस हजारांहून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यास पुढाकार घेतला. भारत माता की जय... च्या जयघोषात विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या एकत्रित राख्यांचे उत्साहात पूजन करण्यात आले.    सैनिक मित्र परिवार आणि  त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव मंडळतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाचे महाकालिका मंदिर येथे ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे आणि पारंपारिक वेशात आलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेश पोटफोडे, महराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बिपीन पाटोळे, सैनिक मित्र परिवाराचे अशोक मेहंदळे, आनंद सराफ, निता करडे, वीरमाता सुवर्णा गोडबोले, वीरपत्नी दिपाली मोरे, सुनीता गायकवाड, स्वरुपवर्धिनीच्या पुष्पा नढे उपस्थित होते. तसेच यावेळी अनुराधा मराठे यांनी सैनिक हो तुमच्यासाठी... गीताच्या सादरीकरणातून सैनिकांप्रती असलेला आदर व्यक्त केला. तसेच मनिषा निजामपूरकर यांनी गायलेल्या ए मेरे वतन के लोगो या गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले. कल्याणी सराफ, गिरीजा पोटफोडे, रुपाली मावळे, राजू पाटसकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.   अनुराधा मराठे म्हणाल्या, आज माझ्या आयुष्यातील अतिशय संस्मरणीय प्रसंग आहे. सातत्याने सैनिकांसाठी असे उपक्रम करीत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते या लोकांना देशाबद्दल प्रचंड प्रेम असते हे मी अनुभवले आहे. सैनिक आपल्या घरादारापासून दूर, एकटे सीमेवर लढत असतात. आपल काहीतरी सीमेवर पोहोचते तेव्हा या साधनांच्या माध्यमातून आपली सैनिकांशी एकप्रकारे भेट होत असते. अशा माध्यमातून त्यांना मिळालेली भेट ही सहदय असते.     आनंद सराफ म्हणाले, समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करुन देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, याकरीता १९९८ पासून हा सातत्याने राबविण्यात येत आहे. यामधून सैनिकांना आनंद व उर्जा मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. देशाच्या कच्छ, सियाचीन, आसाम,काश्मीर, राजस्थान, पंजाब, बंगाल आदी १५० सीमाभागांत प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविल्यानंतर तेथे पूजन करुन सैनिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तूदेखील पुणेकरांना पाठविल्या जातात. राखी संकलन व टपाल खर्चाकरीता ग्राहक पेठेचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले आहे. योगिनी समेळ - हजारे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेSoldierसैनिक