शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सीमेवरील सैनिकांकरिता २५ हजार राख्या रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 18:51 IST

समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करुन देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, याकरीता १९९८ पासून हा सातत्याने राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देकच्छ, सियाचीन, आसाम,काश्मीर, राजस्थान, पंजाब, बंगाल आदी १५० सीमाभागांत प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या

पुणे : भारतीयांच्या रक्षणासाठी सैनिक देशाच्या सीमेवर लढत असतात. देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी हे सैनिक आपल्या कुटुंबाला विसरून आपले देशाप्रती असलेले कर्तव्य पार पाडत असतात. अनेक सण-समारंभ देखील ते आपल्या कुटुंबियांसमवेत साजरे करु शकत नाहीत. सण-समारंभाच्यावेळी आपल्या परिवाराबरोबर आपण सण साजरा करतो आहे, असे त्यांना वाटावे. यासाठी आपल्याबरोबरच आपल्या देशाचे सदैव रक्षण करणा-या सरहदवर लढणा-या सैनिकांना आपला भाऊ मानणा-या पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील बहिणींनी पंचवीस हजारांहून अधिक राख्या सीमेवर पाठविण्यास पुढाकार घेतला. भारत माता की जय... च्या जयघोषात विविध शाळा, महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांच्या एकत्रित राख्यांचे उत्साहात पूजन करण्यात आले.    सैनिक मित्र परिवार आणि  त्वष्टा कासार समाज गणेशोत्सव मंडळतर्फे राखी पौर्णिमेनिमित्त कसबा पेठेतील त्वष्टा कासार समाजाचे महाकालिका मंदिर येथे ज्येष्ठ गायिका अनुराधा मराठे आणि पारंपारिक वेशात आलेल्या चिमुकल्यांच्या हस्ते राख्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी त्वष्टा कासार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष सुरेश पोटफोडे, महराष्ट्र आणि गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बिपीन पाटोळे, सैनिक मित्र परिवाराचे अशोक मेहंदळे, आनंद सराफ, निता करडे, वीरमाता सुवर्णा गोडबोले, वीरपत्नी दिपाली मोरे, सुनीता गायकवाड, स्वरुपवर्धिनीच्या पुष्पा नढे उपस्थित होते. तसेच यावेळी अनुराधा मराठे यांनी सैनिक हो तुमच्यासाठी... गीताच्या सादरीकरणातून सैनिकांप्रती असलेला आदर व्यक्त केला. तसेच मनिषा निजामपूरकर यांनी गायलेल्या ए मेरे वतन के लोगो या गीताने उपस्थितांचे डोळे पाणावले. कल्याणी सराफ, गिरीजा पोटफोडे, रुपाली मावळे, राजू पाटसकर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.   अनुराधा मराठे म्हणाल्या, आज माझ्या आयुष्यातील अतिशय संस्मरणीय प्रसंग आहे. सातत्याने सैनिकांसाठी असे उपक्रम करीत आहात ही खूप मोठी गोष्ट आहे. माझे वडील स्वातंत्र्य सैनिक होते या लोकांना देशाबद्दल प्रचंड प्रेम असते हे मी अनुभवले आहे. सैनिक आपल्या घरादारापासून दूर, एकटे सीमेवर लढत असतात. आपल काहीतरी सीमेवर पोहोचते तेव्हा या साधनांच्या माध्यमातून आपली सैनिकांशी एकप्रकारे भेट होत असते. अशा माध्यमातून त्यांना मिळालेली भेट ही सहदय असते.     आनंद सराफ म्हणाले, समाजाच्या कृतज्ञतेचा प्रत्यय सैनिकांना करुन देण्यासाठी व त्यांनाही सण-उत्सव साजरा करता यावा, याकरीता १९९८ पासून हा सातत्याने राबविण्यात येत आहे. यामधून सैनिकांना आनंद व उर्जा मिळावी, असा आमचा प्रयत्न आहे. देशाच्या कच्छ, सियाचीन, आसाम,काश्मीर, राजस्थान, पंजाब, बंगाल आदी १५० सीमाभागांत प्रत्येक रेजिमेंटमध्ये या राख्या पाठविल्यानंतर तेथे पूजन करुन सैनिकांपर्यंत पोहोचविल्या जातात. अनेकदा सैनिकांकडून राख्यांना उत्तर म्हणून पत्र आणि भेटवस्तूदेखील पुणेकरांना पाठविल्या जातात. राखी संकलन व टपाल खर्चाकरीता ग्राहक पेठेचे या उपक्रमाला सहकार्य मिळाले आहे. योगिनी समेळ - हजारे यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेSoldierसैनिक