शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

उजनी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 02:20 IST

पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली धनदांडग्यांचे मळे फुलविण्याचे काम सुरू

- सुरेश पिसाळ भिगवण : उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडल्याने पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे उजनीकाठचे शेतकरी, तसेच नागरिकांचा पाणीप्रश्न येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या जिवावर शेतातील पिकासाठी काढलेली लाखोंची कर्जे माफ होत नसल्याने बळीराजासमोर संकटे ‘आ’वासून उभी आहेत.या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने आधीच अडचणीत आलेली शेती आता पाण्याच्या संकटात सापडणार आहे. त्याची धास्ती शेतकरीवर्गाला पडली आहे. दररोज पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने पाणीसाठ्याची भीषण स्थिती निर्माण होणार आहे.गतवर्षी खडकवासला धरणसाखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा उजनी धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन न झाल्याने जानेवारीतच पाण्याचे संकट गडद झाले आहे. दुष्काळाचा सगळ्यात मोठा फटका उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. ज्यांनी धरण उभारणीसाठी गावेच्या गावे आणि उभे संसार पाण्याखाली घालवले, त्यांनाही पीके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. डोळ्यांसमोरून धरणातील पाणी लांब-लांब जाताना दिसत आहे. पण, धरणग्रस्त शेतकरी पाण्यासाठी तडफडत आहे.सध्या धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर शहर आणि परिसरासाठी सोडले आहे. जलाशयातील पाणीसाठा कमालीचा खालावल्याने या हजारो शेतकºयांना आपली पिके वाचविण्यासाठी आता धडपड करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना आजच्या घडीला संकटात आल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.धरण प्राधिकरणाची निर्मिती गरजेचीउजनी धरणावर पुणे, सोलापूर, नगरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीसह औद्योगिक कारखानदारांचे भवितव्य अवलंबून आहे. पाण्याचे दरवर्षी योग्य नियोजनहोत नसल्याने अनेक दिवसांपासून उजनी धरण प्राधिकरण नियामक मंडळाची निर्मितीची मागणी आता जोर धरूलागली आहे.वाद उफाळून येण्याची शक्यता...सोलापूरला पिण्याच्या नावाखाली लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी होत असल्याने धरणग्रस्त शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर सोलापूर आणि धरणग्रस्त शेतकरी वाद उफाळून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई