शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणात अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 02:20 IST

पिण्याच्या पाण्याच्या नावाखाली धनदांडग्यांचे मळे फुलविण्याचे काम सुरू

- सुरेश पिसाळ भिगवण : उजनी धरणातून सोलापूरला पिण्यासाठी पाणी सोडल्याने पाणीपातळीत झपाट्याने घट झाली आहे. अवघा २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे उजनीकाठचे शेतकरी, तसेच नागरिकांचा पाणीप्रश्न येत्या काळात गंभीर होण्याची शक्यता आहे. पाण्याच्या जिवावर शेतातील पिकासाठी काढलेली लाखोंची कर्जे माफ होत नसल्याने बळीराजासमोर संकटे ‘आ’वासून उभी आहेत.या वर्षी कमी प्रमाणात पाऊस झाल्याने आधीच अडचणीत आलेली शेती आता पाण्याच्या संकटात सापडणार आहे. त्याची धास्ती शेतकरीवर्गाला पडली आहे. दररोज पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असल्याने पाणीसाठ्याची भीषण स्थिती निर्माण होणार आहे.गतवर्षी खडकवासला धरणसाखळीत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने यंदा उजनी धरण शंभर टक्के भरले होते. मात्र, पाण्याचे योग्य पद्धतीने नियोजन न झाल्याने जानेवारीतच पाण्याचे संकट गडद झाले आहे. दुष्काळाचा सगळ्यात मोठा फटका उजनी धरण परिसरातील शेतकऱ्यांना बसू लागला आहे. ज्यांनी धरण उभारणीसाठी गावेच्या गावे आणि उभे संसार पाण्याखाली घालवले, त्यांनाही पीके जगविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. डोळ्यांसमोरून धरणातील पाणी लांब-लांब जाताना दिसत आहे. पण, धरणग्रस्त शेतकरी पाण्यासाठी तडफडत आहे.सध्या धरणातील पाणी मोठ्या प्रमाणावर पिण्याच्या पाण्यासाठी सोलापूर शहर आणि परिसरासाठी सोडले आहे. जलाशयातील पाणीसाठा कमालीचा खालावल्याने या हजारो शेतकºयांना आपली पिके वाचविण्यासाठी आता धडपड करावी लागत आहे. तालुक्यातील अनेक गावांच्या पाणी योजना आजच्या घडीला संकटात आल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.धरण प्राधिकरणाची निर्मिती गरजेचीउजनी धरणावर पुणे, सोलापूर, नगरसह उस्मानाबाद जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतीसह औद्योगिक कारखानदारांचे भवितव्य अवलंबून आहे. पाण्याचे दरवर्षी योग्य नियोजनहोत नसल्याने अनेक दिवसांपासून उजनी धरण प्राधिकरण नियामक मंडळाची निर्मितीची मागणी आता जोर धरूलागली आहे.वाद उफाळून येण्याची शक्यता...सोलापूरला पिण्याच्या नावाखाली लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी होत असल्याने धरणग्रस्त शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला. आता आगामी निवडणुकांच्या तोंडावर सोलापूर आणि धरणग्रस्त शेतकरी वाद उफाळून येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाई