शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
3
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
4
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
5
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
6
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
7
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
8
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
9
९८ लाख कोटींच्या साम्राज्याचा सम्राट निवृत्त! वॉरेन बफे यांचा कंपनीतून ९५ व्या वर्षी राजीनामा
10
आजपासून काय-काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? कार महागणार, पीएफच्या नियमांतही मोठे बदल होणार अन् बरंच काही...!
11
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
12
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
13
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
14
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
15
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
16
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
17
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
18
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
19
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
20
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेड प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांकडून हेक्टरला २५ लाखांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 14:15 IST

भामा आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत.

ठळक मुद्देभामा आसखेड प्रकल्पग्रस्त : जिल्हा प्रशासन शासनास प्रस्ताव सादर करणार

पुणे : भामा आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी प्रस्ताव सादर करणाऱ्या जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, जमिनीच्या मोबदल्यात जमिनीची मागणी करणाऱ्या ३१३ शेतकऱ्यांपैकी सुमारे ७० शेतकऱ्यांनी प्रति हेक्टरी २५ लाख रुपयांची अशी मागणी केली आहे. त्यामुुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने या संदर्भातील दुसरा अहवाल तयार करून शासनास पाठविला जाणार आहे,अशी माहिती प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख यांनी दिली. भामा आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात रविवारी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांची बैठक घेण्यात आली. आमदार सुरेश गोरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त सौरभ राव, प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, जिल्हा पुनर्वसन अधिकारी भारत वाघमारे यावेळी आदी उपस्थित होते.  जमिनीच्या मोबदल्यात जमिनीची मागणी करत उच्च न्यायालयात गेलेल्या ३८८ शेतकºयांचे खेड तालुक्यात ३५ हेक्टर आणि दौंड तालुक्यात ७० हेक्टर  हेक्टर क्षेत्रावर प्राधान्यक्रमानुसार पुनर्वसन करण्यास जिल्हा प्रशासनातर्फे सुरवात करण्यात आली आहे. परंतु, लाभ क्षेत्रातील काही भूखंडाबाबत न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्वसनाचे काम थांबविण्यात आले. प्रशासनातर्फे  ३१३ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी वीर बाजी पासलकर आणि पानशेत प्रकल्पांतर्गत असणाऱ्या ४२५.६१ हेक्टर क्षेत्रात पुनर्वसन करण्यासाठीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. त्याबाबत शासनाकडून कुठलाच आदेश प्राप्त झालेला नाही. जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी प्रकल्पग्रस्तांबोबत समन्वय साधण्यासाठी बैठक घेतली. यावेळी बैठकीस उपस्थित शेतक-यांपैकी ७० शेतकऱ्यांनी हेक्टरी २५ लाख रुपये दराने मागणी केली. जिल्हा प्रशासन आणि प्रकल्पग्रस्तांची मागणी या दरात मोठा फरक असल्याने मध्यम भूमिका घेऊन ठराविक रक्कम निश्चित केली जाईल. मात्र,जमिनीच्या मोबदल्यात रक्कम हा पर्याय निवडणाऱ्यां प्रकल्पग्रस्तांची यादी तयार केली जाणार आहे. त्यानंतर अंतीम अहवाल शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येणार आहे, असेही देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीGovernmentसरकारNavalkishor Ramनवलकिशोर राम