शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
4
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
5
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
6
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
7
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
8
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
9
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
10
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
11
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
12
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
13
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या छतावरून उडी घेत संपवले जीवन; पालकांचा गंभीर आरोप
14
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
15
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
16
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
17
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
18
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
19
McDonald's नं भारतीय वंशाच्या कर्मचाऱ्याला दिलं ३५ लाखांचं बक्षीस, अमेरिकेत 'डिनर'देखील करवलं
20
Numerology: होणारी बायको कशी असणार? हे जन्मतारखेवरुन कळणार! मूलांकानुसार जाणून घ्या भविष्य
Daily Top 2Weekly Top 5

‘खडकवासला’त २४ टीएमसी पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 00:19 IST

पानशेत भरण्याच्या मार्गावर; उजनीचा पाणीसाठा ११ टीएमसीच्या घरात

पुणे : जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोटक्षेत्रात मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा २३.८४ अब्ज घनफूट (टीएमसी) झाला आहे. खडकवासलापाठोपाठ पानशेत धरणही भरण्याच्या मार्गावर असून, तेथील पाणीसाठा ९७ टक्क्यांवर गेला आहे. खडकवासलासह जिल्ह्यातील ८ धरणांतून रविवारी नदीत पाणी सोडण्यात आले आहे. परिणामी उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १०.९० टीएमसी झाला आहे.जिल्ह्यातील पवना धरणात ५६, वडीवळे ४०, मुळशी २५ आणि डिंभे धरण क्षेत्रात ४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कळमोडी१.५१ टीएमसी (१०० टक्के), चासकमान ७.३८ (९७.४२ टक्के), भामा आसखेड ५.८६ (७६.४० टक्के) आणि पवना धरणात ७.६२ टीएमसी (८९.५८ टक्के) पाणीसाठा झाला आहे.गुंजवणी धरण क्षेत्रात १० आणि नीरा देवघरला १८ मिलिमीटर पाऊस झाला. गुंजवणीत २.२९ (६२ टक्के), नीरा देवघर ८.८९ (७५.८४ टक्के), भाटघर १७.५५ (७४.६७ टक्के) आणि वीर धरणात ९.१४ टीएमसी (९७.१८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. खडकवासला धरणातून सायंकाळी पाचपर्यंत ४ हजार २८० क्युसेक्स, मुळशी ३ हजार, कासारसाई शंभर, वडीवळे ९७०, चासकमान ५ हजार २७५, कळमोडी ६२८, वडज येथून ८७८, गुंजवणी १ हजार ३४० आणि वीर धरणातून ४ हजार ५६३ क्युसेक्स पाणी नदीत सोडण्यात आले. जिल्ह्यातील धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे. रविवारी सायंकाळी पाचपर्यंत उजनीत उपयुक्त पाणीसाठा १०.९० टीएमसी (२०.३५ टक्के) झाला आहे.

टॅग्स :WaterपाणीPuneपुणे