शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरकाशीतल्या ढगफुटीनंतर पुण्याचे २४ जण अडकले; कोणताही संपर्क होईना, सुप्रिया सुळेंची CM धामींना विनंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 14:30 IST

उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीनंतर पुण्यातील २४ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.

Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमधील उत्तरकाशीतील धराली गावात मंगळवारी दुपारी ढगफुटीमुळे मोठा प्रलय आला. धराली गावात डोंगरावरून पाण्याचा पूर आणि मोठ्या प्रमाणात ढिगारा आला आणि ३४ सेकंदात संपूर्ण गाव वाहून गेले. आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. बुधवारी सकाळी बचाव-शोध मोहिमेदरम्यान एक मृतदेह आढळून आला. त्याची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ढगफुटीनंतर ११ सैनिकांसह ५० हून अधिक लोक बेपत्ता आहेत. तर १५० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घनेनंतर महाराष्ट्रातील पर्यटकही बेपत्ता असून खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांना बचाव कार्यात लक्ष घालण्याची मागणी केली आहे.

पावसामुळे उत्तराखंडमध्ये मोठी आपत्ती आली आहे. उत्तरकाशीच्या धराली गावात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. धराली खीर गड येथे ढगफुटीनतर पाण्याची पातळी वाढल्याने धराली बाजाराच मोठं नुकसान झालं. विनाशकारी ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात मातीचे ढिगारे वाहत आले आणि सगळं गावं गाडलं गेले. यामुळे तिथल्या होमस्टेचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. विनाशकारी प्रलयानंतर पुण्याच्या मंचर येथील २४ नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.

"उत्तरकाशीमध्ये झालेल्या ढगफुटीमुळे महाराष्ट्रातील पुणे येथील मंचर येथील सुमारे २४ नागरिक उत्तराखंडमध्ये अडकले आहेत. गेल्या २४ तासांपासून त्यांच्याशी कोणताही संपर्क झाला नसल्याने त्यांचे कुटुंबीय अत्यंत दुःखी आहेत. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर हस्तक्षेप करून त्यांना वाचवावे," असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं.

आंबेगाव तालुक्यातील अवसरी खुर्द येथील १९९० सालच्या दहावीच्या बॅचमधील ८ पुरुष आणि ११ महिलांचा एक गट १ ऑगस्ट रोजी उत्तराखंडला गेला होता. त्यांच्याशी शेवटचा संपर्क गंगोत्री परिसरात झाला. त्यातील काही जणांनी गंगोत्रीमधील फोटो शेअर केले होते. मात्र त्यानंतर ढगफुटीची घटना घडली आणि त्यानंतर त्यांच्याशी कोणताही संपर्क झालेला नाही.

दरम्यान, उत्तराखंडच्या दुर्घटनेत सोलापूरचे चार भाविक अडकले आहेत. धीरज बगले, समर्थ दासरी, विठ्ठल पुजारी व मल्हारी धोत्रे अशी चौघांची नावे आहेत. चौघेही हरिद्वार येथे दर्शनासाठी गेले होते. उत्तराखंडमध्ये एका गाडीतून त्यांनी प्रवास केला. चौघांचेही शेवटचे लोकेशन हे गंगोत्री पार्किंग दाखवण्यात आले होते. ५ ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजता त्यांचा कुटुंबियांशी संवाद झाला होता.

टॅग्स :Supriya Suleसुप्रिया सुळेPuneपुणेUttarakhandउत्तराखंड