शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

तब्बल २३ दिवस उशिराने गोव्यासह राज्यातून मॉन्सून माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 14:46 IST

नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले़. येत्या २४ तासात मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परण्याची शक्यता आहे़.

ठळक मुद्देसंपूर्ण देशातून येत्या २४ तासात मॉन्सून माघारी जाण्याचे संकेत२६ आॅक्टोबरपर्यंत द्वीपसमुहातूनही तो माघारी परतेल़ 

पुणे : नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले़ सर्वसाधारणपणे दरवर्षी १ आॅक्टोबरला मॉन्सून राज्यातून माघारी जात असतो़ यंदा त्याला तब्बल २३ दिवस उशीर झाला आहे़ येत्या २४ तासात मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परण्याची शक्यता असून २६ आॅक्टोबरला तो द्वीपसमुहातूनही माघारी परण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे़ साधारण दरवर्षी मॉन्सूनच्या परतीस पश्चिम राजस्थानमधून १ सप्टेंबरच्या सुमारास सुरुवात होते़ यंदा मॉन्सूनला सर्वाधिक काळ रेंगाळला असून गेल्या ७ वर्षात सर्वात उशिरा मॉन्सूनची माघारी जाण्यास सुरुवात झाली होती़ मॉन्सूनची माघारी सुरु झाली हे जाहीर करताना हवामान विभाग काही निकष पडताळून पहाते़ त्यात सलग ५ दिवस त्या त्या क्षेत्रातील पावसाचे कमी होत गेलेले प्रमाण, हवेतील आर्द्रता कमी होत जाते़ त्यानंतर त्या भागातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे समजले जाते़ गेल्या काही दिवसात राज्यात अपवाद वगळता पाऊस झाला नाही़ तसेच आर्द्रता कमी होत गेली असून उष्मा वाढला आहे़ मंगळवारी मॉन्सूनची माघारीची रेषा कलिंगापट्टम, मेडक, बिजापूर, गोवा अशी आहे़ येत्या २४ तासात मॉन्सूनचे संपूर्ण देशभरातून माघारी परतण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़  देशभरात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ९५ टक्के पाऊस झाला असला तरी त्याचे वितरण असमान होते़ आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कमी झालेल्या पावसामुळे हे असमान वितरण झाले असल्याचा निष्कर्ष हवामान विभागाने काढला आहे़ विशेषत: उत्तर भारतातील अनेक विभागात यंदा कमी पाऊस झाला आहे़ त्याचबरोबर विदर्भात सप्टेंबर अखेर सरासरीपेक्षा तब्बल २३ टक्के पाऊस कमी होता़ त्यानंतरही १ ते २३ आॅक्टोंबर दरम्यान विदर्भातील ५ जिल्ह्यात कमी पाऊस पडला आहे़ नांदेडमध्येही कमी पाऊस झाला आहे़  परतीचा पाऊसही माघारी गेल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील धरणातील पाणीसाठा कमी आहे़ त्यामुळे उन्हाळ्यात तेथे पाणी संकट उद्भवण्याची शक्यता आहे़  

टॅग्स :RainपाऊसPuneपुणेgoaगोवा