शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

तब्बल २३ दिवस उशिराने गोव्यासह राज्यातून मॉन्सून माघारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2017 14:46 IST

नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले़. येत्या २४ तासात मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परण्याची शक्यता आहे़.

ठळक मुद्देसंपूर्ण देशातून येत्या २४ तासात मॉन्सून माघारी जाण्याचे संकेत२६ आॅक्टोबरपर्यंत द्वीपसमुहातूनही तो माघारी परतेल़ 

पुणे : नैऋत्य मोसमी पावसाने गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रातून माघारी परतल्याचे हवामान विभागाने मंगळवारी जाहीर केले़ सर्वसाधारणपणे दरवर्षी १ आॅक्टोबरला मॉन्सून राज्यातून माघारी जात असतो़ यंदा त्याला तब्बल २३ दिवस उशीर झाला आहे़ येत्या २४ तासात मॉन्सून संपूर्ण देशातून माघारी परण्याची शक्यता असून २६ आॅक्टोबरला तो द्वीपसमुहातूनही माघारी परण्याची शक्यता असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे़ साधारण दरवर्षी मॉन्सूनच्या परतीस पश्चिम राजस्थानमधून १ सप्टेंबरच्या सुमारास सुरुवात होते़ यंदा मॉन्सूनला सर्वाधिक काळ रेंगाळला असून गेल्या ७ वर्षात सर्वात उशिरा मॉन्सूनची माघारी जाण्यास सुरुवात झाली होती़ मॉन्सूनची माघारी सुरु झाली हे जाहीर करताना हवामान विभाग काही निकष पडताळून पहाते़ त्यात सलग ५ दिवस त्या त्या क्षेत्रातील पावसाचे कमी होत गेलेले प्रमाण, हवेतील आर्द्रता कमी होत जाते़ त्यानंतर त्या भागातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असल्याचे समजले जाते़ गेल्या काही दिवसात राज्यात अपवाद वगळता पाऊस झाला नाही़ तसेच आर्द्रता कमी होत गेली असून उष्मा वाढला आहे़ मंगळवारी मॉन्सूनची माघारीची रेषा कलिंगापट्टम, मेडक, बिजापूर, गोवा अशी आहे़ येत्या २४ तासात मॉन्सूनचे संपूर्ण देशभरातून माघारी परतण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़  देशभरात यंदा जून ते सप्टेंबर या कालावधीत ९५ टक्के पाऊस झाला असला तरी त्याचे वितरण असमान होते़ आॅगस्ट व सप्टेंबरमध्ये कमी झालेल्या पावसामुळे हे असमान वितरण झाले असल्याचा निष्कर्ष हवामान विभागाने काढला आहे़ विशेषत: उत्तर भारतातील अनेक विभागात यंदा कमी पाऊस झाला आहे़ त्याचबरोबर विदर्भात सप्टेंबर अखेर सरासरीपेक्षा तब्बल २३ टक्के पाऊस कमी होता़ त्यानंतरही १ ते २३ आॅक्टोंबर दरम्यान विदर्भातील ५ जिल्ह्यात कमी पाऊस पडला आहे़ नांदेडमध्येही कमी पाऊस झाला आहे़  परतीचा पाऊसही माघारी गेल्याने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमधील धरणातील पाणीसाठा कमी आहे़ त्यामुळे उन्हाळ्यात तेथे पाणी संकट उद्भवण्याची शक्यता आहे़  

टॅग्स :RainपाऊसPuneपुणेgoaगोवा