शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

मोबाईलवर बोलणारे २१ हजार वाहनचालक जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्यास मनाई आहे, असे असले तरी आपल्या जीवापेक्षा अनेकांना मोबाईलचा कॉल ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : वाहन चालविताना मोबाईलवर बोलण्यास मनाई आहे, असे असले तरी आपल्या जीवापेक्षा अनेकांना मोबाईलचा कॉल घेणे अधिक महत्त्वाचे वाटते. अशा २१ हजार ८५१ वाहन चालकांवर गेल्या वर्षभरात पोलिसांनी कारवाई केली आहे. ही केवळ पोलिसांनी केलेली कारवाई आहे. यापेक्षा कित्येकपटीने वाहनचालक बिनधास्तपणे वाहन चालविताना मोबाईलवर सर्रास बोलताना जागोजागी आढळून येत असतात.

वाहतूक पोलिसांनी गेल्या वर्षभरात मोबाईलवर बोलणा-या २१ हजार ८५१ जणांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४३ लाख ७० हजार २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मोबाईलवर बोलणा-या वाहनचालकाला २०० रुपये दंड केला जातो.

लॉकडाऊनमुळे काही महिने रस्त्यावरील वाहनांची वर्दळ कमी होती. त्यामुळे चार महिने कारवाई झाली नव्हती. नाही तर याचा आकडा आणखी वाढू शकला असता. विना गिअरच्या दुचाकी वाहनांमुळे वाहन चालविताना मोबाईलवर बोलणा-याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. एका हातात मोबाईल धरून किंवा कान आणि खांद्या वाकडा करून त्यात मोबाईल धरून वाहनचालक बोलत जात असल्याचे दिसून येतात. जीवापेक्षा कोणाचाही फोन इतका महत्त्वाचा कधीच नसतो. पण, याची जाणीव बहुतांश वाहनचालकांकडे नसल्याचे दिसून येते.

याबाबत वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी सांगितले की, वाहन चालविताना चालकाचे सर्व लक्ष वाहन चालविण्याकडेच असले पाहिजे. मोबाईलवर बोलत वाहन चालविण्याने चालकाचे लक्ष विचलित होऊ शकते. काही क्षण जरी लक्ष विचलित झाले तर अपघाताची शक्यता वाढते. दुचाकीचालक तसेच चारचाकी चालक स्वत: बरोबरच रस्त्यावरील इतर वाहने, पादचारी यांना धोका पोहचवू शकतात. तसेच गाडीत बसलेल्या इतरांच्या जीवाला ते धोका निर्माण करीत असतात. एक सेंकदभराचेही दुर्लक्ष अनेकांच्या जीवावर बेतू शकते. पण

.......

विनाहेल्मेट आणि झेब्रा कॉसिंगवर वाहन पुढे करणे, याच्या पाठोपाठ वाहतूक नियमभंगाखाली वाहन चालविताना मोबाईलवर बोलणा-यावर तिस-या क्रमांकाची कारवाई करण्यात आली आहे.

.......

आपले घरी कोणीतरी वाट पहात आहे. याची जाणीव ठेवून वाहनचालकाने संपूर्ण लक्ष वाहन चालविण्याकडे ठेवावे. मोबाईलवर बोलून तुम्ही तुमच्या व इतरांचा जीव गमावण्याची शक्यता वाढते. अशा दुर्लक्षामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेकांना कायमस्वरूपी दुखापत झालेली आहे. हे पाहता चालकांनी वाहन चालविताना मोबाईलवर न बोलता पोलिसांना सहकार्य केले तर कारवाईची वेळ येणार नाही.

-राहुल श्रीरामे, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा