शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ अंतर्गत आखाती देशांतून १८० महाराष्ट्रीयन पुण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 12:35 IST

संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी, शारजा या देशांमध्येही अनेक भारतीय नागरिक आहेत..

ठळक मुद्देअडीच महिन्यांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकलेले १८० हून अधिक महाराष्ट्रीयन मायदेशीपुढील सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाणार ; तपासणी करून घरी पाठविले जाणार

पुणे : मागील अडीच महिन्यांपासून संयुक्त अरब अमिरातीमध्ये अडकून पडलेले १८० हून अधिक महाराष्ट्रीयन बांधव रविवारी (दि. १४) मायदेशी परतले. दुबई येथून विशेष विमानाने पुणेविमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांना हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. सात दिवसांनंतर तपासणी करून त्यांना घरी पाठविले जाणार आहे.कोरोना संकटामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवा ठप्प झाली. त्यामुळे जगभरातील विविध देशांमध्ये हजारो भारतीय नागरिक अडकून पडले. त्यांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारकडून वंदे भारत मिशन घेण्यात आले. त्यानुसार विविध देशांतून विशेष विमानाने त्यांना परत आणले जात आहे. संयुक्त अरब अमिरातीतील दुबई, अबुधाबी, शारजा या देशांमध्येही अनेक भारतीय नागरिक आहेत. त्यामध्ये नोकरदार, कामगार तसेच पर्यटकांचाही समावेश आहे. त्यात महाराष्ट्रीयन नागरिकांचाही समावेश होता. त्यांना परत आणण्यासाठी मागील काही दिवसांपासून मुळचे पुण्याचे असलेले दुबई येथील जीएमबीएफ ग्लोबल संस्थेचे उपाध्यक्ष राहुल तुळपुळे व शारजा येथील धनश्री वाघ पाटील यांनी प्रयत्न करत होते. त्यांनी महाराष्ट्रात येऊ इच्छिणारे नागरिक, परराष्ट्र मंत्रालय शासनाशी समन्वय साधून परतीया मार्ग मोकळा केला.

शनिवारी (दि. १३) जवळपास १९० नागरिक मुंबई विमानतळावर उतरले. तर रविवारी १८० हून अधिक नागरिक विशेष विमानाने दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे विमानतळावर उतरले. तिथे सर्वांचे थर्मल स्क्रिनींग करण्यात आले. त्यांना पुढील सात दिवस हॉटेलमध्ये क्वारंटाईन केले जाणार आहे. प्रशासनाकडून त्यांना हॉटेलपर्यंत नेण्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. सात दिवसांनी तपासणी करून घरी सोडण्यात येईल. त्यानंतरचे पुढील सात दिवस ते होम क्वारंटाईन असतील.-----------मी अबुधाबीमध्ये होते. महाराष्ट्रात परत येण्यासाठी दोन-अडीच महिन्यांपासून प्रयत्न करत होतो. अनेकांना परत यायचे होते. राहूल तुळपुळे व धनश्री पाटील यांनी केलेल्या प्रयत्नामुळे दिलासा मिळाला. पुढील १४ दिवस सर्व जण क्वारंटाईन असतील.- भक्ती गायकवाड, प्रवासी

टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळDubaiदुबईCentral Governmentकेंद्र सरकार