शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

११५ शाळांची वाट जिकिरीची

By admin | Updated: March 23, 2017 04:15 IST

पुरंदर तालुक्यात प्राथमिक शाळांची शिक्षणाची वाट जिकिरीची बनलेली आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळांची एकूण संख्या २१६ आहे.

जेजुरी : पुरंदर तालुक्यात प्राथमिक शाळांची शिक्षणाची वाट जिकिरीची बनलेली आहे. तालुक्यातील प्राथमिक शाळांची एकूण संख्या २१६ आहे. पुरंदर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या माहितीनुसार यातील सुमारे ११५ शाळा अवघड क्षेत्रात येत आहेत. तब्बल निम्म्या शाळा अवघड क्षेत्रात येत असल्याचे वास्तव उघड झाले आहे.पुरंदर तालुक्यात पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने नुकतेच सर्वेक्षण करून या शाळांचे वर्गीकरण केले आहे. या वर्गीकरणातून मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. अशा शाळांची यादीही पुणे जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आलेली आहे. निम्म्यापेक्षा जास्त शाळा अवघड क्षेत्रात येत असल्याने पुरंदर तालुकाच अतिदुर्गम व सोई-सुविधांपासून वंचित आहे की काय? अशी चर्चा आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने २७ फेब्रुवारी २०१७ रोजी शिक्षकांच्या बदल्या करण्याबाबत शासननिर्णय पारित केला आहे. त्यानुसार बदल्यांबाबतचे काही निकषही सुचवलेले आहेत. यापैकी अवघड क्षेत्रातील शाळा व सोप्या क्षेत्रातील शाळांचे वर्गीकरण करून त्यानुसार शिक्षकांच्या बदल्या करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आलेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना एकट्याने अवघड क्षेतातील शाळा ठरवणे शक्य नसल्याने त्यांनी मुख्यालयापासूनचे शाळेचे अंतर, दळणवळणाचा अभाव, डोंगराळ दुर्गम भाग व काम करण्यासाठी प्रतिकूल परिस्थिती या निकषानुसार तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना अवघड व सोप्या क्षेत्रात असणाऱ्या शाळांचे वर्गीकरण करण्याबाबत सुचवले आहे.अनेक शाळांत जाण्यासाठी शिक्षकांना दळणवळणाअभावी मोठी पायपीट करावी लागत आहे व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तालुक्यातील शिक्षण सुरू आहे. तालुक्यातील पुणे-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या अनेक शाळाही अवघड क्षेत्रात घेण्यात आलेल्या आहेत. वरील निकषानुसार विचार करता तालुक्यात एकही शाळा अवघड क्षेत्रात बसू शकत नसतानाही एवढी मोठी यादी तयार झाली आहे. पाच वर्षांपूर्वी शासनाने महसूल विभागातर्फे शाळांची पटपडताळणीकेली होती. त्या वेळी संपूर्ण महाराष्ट्रात बोगस पटसंख्या उघडकीस आली होती. त्याच धर्तीवर अवघड क्षेत्रातील शाळा निवडताना महसूल विभाग, पंचायत विभाग, अंगणवाडी विभाग, एसटी महामंडळ आणि लोकप्रतिनिधी यांच्या संयुक्त समितीमार्फत शाळांचे वर्गीकरण झाल्यास वस्तुनिष्ठ व पारदर्शक ठरेल, अशी तालुक्यातील शिक्षकांत चर्चा आहे. इयत्ता सहावीचा वर्ग सुरू करण्यासाठी परिसरात तीन किलोमीटरच्या अंतरापर्यंत सहावीचा वर्ग असणारी दुसरी शाळा असल्यास परवानगी मिळत नाही. याचाच अर्थ १२ वर्षांचा विद्यार्थी तीन किलोमीटरवरील शाळेत शिक्षण घेण्यासाठी जाणे अपेक्षित आहे. असे असतानाही पुरंदरच्या शिक्षण विभागाला अर्धा ते तीन किलोमीटरवरील शाळा अवघड क्षेत्रातील का वाटतात? की तालुक्यातील शिक्षक पुढाऱ्यांनी स्वत:च्या बदल्या न व्हाव्यात, म्हणून प्रशासनावर दबाव आणून या शाळांची यादी वाढवलेली आहे काय? यामागील नेमके गौडबंगाल काय?