शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

जवानांसाठी आपुलकीचा गोड ठेवा!; पुण्यातील गणेश मंडळांचा पुढाकार : १०० किलो तिळगूळ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:19 IST

देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून १०० किलो तिळगूळ सैनिकांना पाठवण्यात आला.

ठळक मुद्देजातीपातींवरून समाजात जे वाद होताना दिसत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट : गायत्री खडकेते सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत : हेमंतराजे मावळे

पुणे : स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून १०० किलो तिळगूळ सैनिकांना पाठवण्यात आला. ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत तिळगुळाचे पूजन करण्यात आले. या उपक्रमात २५ मंडळांनी सहभाग होत आपुलकीचा ठेवा सैनिकांपर्यंत पोहोचवून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवच जणू पुणेकरांना करून दिली. शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बिपीन पाटोळे, शाहीर हेमंतराजे मावळे, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, वीरपत्नी दीपाली मोरे, स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष मदनसिंह राजपूत उपस्थित होते. स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन पुणे, संयुक्त प्रसाद मित्रमंडळ, नेने घाट गणेशोत्सव मंडळ, कडबे आळी गणेशोत्सव मंडळ, हसबनीस बखळ मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, त्वष्टा कासार मंडळ आणि इतर सार्वजनिक मंडळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. गायत्री खडके म्हणाल्या, की सध्या जातीपातींवरून समाजात जे वाद होताना दिसत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांनी कधीही जातपात मानली नाही. आपल्या देशात जातींवरून भांडणे होत असल्याचे कळल्यावर त्यांना खूप वाईट वाटेल. सैनिकांना तिळगूळ पाठवताना ‘आम्ही जातपात न मानता भारतीय म्हणून एकजुटीने राहू,’ असा विश्वास देणे गरजेचे आहे.बिपीन पाटोळे म्हणाले, ‘सैनिकांप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. तिळगुळाचा प्रसाद सैनिकांसाठी लाखमोलाचा आहे.’ शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, ‘आपण सैनिकांना तिळगूळ पाठवतो, आजूबाजूच्या लोकांनाही ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे सांगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याच देशात धर्मासाठी, जातीसाठी लढत असू तर सैनिकांच्या लढ्याचा काहीच फायदा होणार नाही. ते देशाच्या सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत.’ गिरीश सरदेशपांडे, महेश काटदरे, नितीन पंडित, अजित परांजपे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणे