शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

जवानांसाठी आपुलकीचा गोड ठेवा!; पुण्यातील गणेश मंडळांचा पुढाकार : १०० किलो तिळगूळ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 12:19 IST

देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून १०० किलो तिळगूळ सैनिकांना पाठवण्यात आला.

ठळक मुद्देजातीपातींवरून समाजात जे वाद होताना दिसत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट : गायत्री खडकेते सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत : हेमंतराजे मावळे

पुणे : स्वत:च्या प्राणांची पर्वा न करता देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी मकरसंक्रांतीनिमित्त पुण्यातून १०० किलो तिळगूळ सैनिकांना पाठवण्यात आला. ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देत तिळगुळाचे पूजन करण्यात आले. या उपक्रमात २५ मंडळांनी सहभाग होत आपुलकीचा ठेवा सैनिकांपर्यंत पोहोचवून देशाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्याची जाणीवच जणू पुणेकरांना करून दिली. शनिवार पेठ मेहुणपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सैनिक मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके, बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. बिपीन पाटोळे, शाहीर हेमंतराजे मावळे, मेहुणपुरा मंडळाचे अध्यक्ष सचिन शिंदे, वीरपत्नी दीपाली मोरे, स्टेशनरी कटलरी असोसिएशनचे अध्यक्ष मदनसिंह राजपूत उपस्थित होते. स्टेशनरी कटलरी अँड जनरल मर्चंट असोसिएशन पुणे, संयुक्त प्रसाद मित्रमंडळ, नेने घाट गणेशोत्सव मंडळ, कडबे आळी गणेशोत्सव मंडळ, हसबनीस बखळ मित्र मंडळ, जयहिंद मित्र मंडळ, त्वष्टा कासार मंडळ आणि इतर सार्वजनिक मंडळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. गायत्री खडके म्हणाल्या, की सध्या जातीपातींवरून समाजात जे वाद होताना दिसत आहेत, ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. देशासाठी लढणाऱ्या सैनिकांनी कधीही जातपात मानली नाही. आपल्या देशात जातींवरून भांडणे होत असल्याचे कळल्यावर त्यांना खूप वाईट वाटेल. सैनिकांना तिळगूळ पाठवताना ‘आम्ही जातपात न मानता भारतीय म्हणून एकजुटीने राहू,’ असा विश्वास देणे गरजेचे आहे.बिपीन पाटोळे म्हणाले, ‘सैनिकांप्रती असलेला आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम अतिशय महत्त्वाचे आहेत. तिळगुळाचा प्रसाद सैनिकांसाठी लाखमोलाचा आहे.’ शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, ‘आपण सैनिकांना तिळगूळ पाठवतो, आजूबाजूच्या लोकांनाही ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असे सांगण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याच देशात धर्मासाठी, जातीसाठी लढत असू तर सैनिकांच्या लढ्याचा काहीच फायदा होणार नाही. ते देशाच्या सीमेवर आपल्यासाठी लढत आहेत म्हणून आज आपण सुरक्षित आहोत.’ गिरीश सरदेशपांडे, महेश काटदरे, नितीन पंडित, अजित परांजपे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. आनंद सराफ यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :Puneपुणे