शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
3
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
4
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
5
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
6
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
7
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
8
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
9
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
10
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
11
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
12
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
13
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
14
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
15
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
16
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
17
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
18
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
19
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
20
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत १ अब्ज डॉलर, येथे पैशाची चणचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 01:34 IST

जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) संशोधनाला मोठी गती प्राप्त झाली आहे.

पुणे : जगभरात कृत्रिम बुद्धिमत्तेवर (आर्टिफिशियल इंटिलिजन्स) संशोधनाला मोठी गती प्राप्त झाली आहे. भारतातही त्यावर संशोधन होत असले तरी पुरेशी गुंतवणूक, प्रयोगशाळा, संबंधित यंत्रणेच्या अभावामुळे ते कासवगतीने सुरू आहे. अभियांत्रिकी, संगणकशास्त्र अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्ता एका विषयापुरतीच मर्यादित राहिली आहे. केवळ वरवरचे ज्ञान मिळण्यापलीकडे संशोधनाला फारसा वाव नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी पूरक ‘इको सिस्टीम’च नसल्याने शिक्षणासह संशोधन क्षेत्रात त्यासाठी भरीव गुंतवणूक करण्यास कोणीच पुढे येत नाही.अमेरिकेतील मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी या खासगी विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधनासाठी स्वतंत्र महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामध्ये विद्यापीठाकडून तब्बल १ अब्ज डॉलर्सएवढी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच जगभरातील विकसित देश संगणकामध्ये मानवी क्षमता विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. भारतातही मागील काही वर्षांपासून याबाबत संशोधन सुरू आहे. पण संशोधनासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने त्याला मर्यादा आल्या आहेत. याला ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ व नालंदा विद्यापीठाचे कुलपती डॉ. विजय भटकर यांनीही दुजोरा दिला.ते म्हणाले, की भारतात ८० च्या दशकाच्या शेवटीपासून संगणक क्षेत्रातील संशोधनाला सुरूवात झाली. तर ९० च्या दशकात कृत्रिम बुद्धिमत्तेवर काम सुरू झाले. सी-डॅक संस्था त्यामध्ये मोठे योगदान देत आहे. पण मानवी बुद्धीला पार करणे कठीण असल्याचे त्यावेळी लक्षात आल्यानंतर संशोधनाची गती मंदावली. गेल्या काही वर्षात संशोधनाला पुन्हा गती मिळाली आहे. अनेक परदेशी कंपन्यांचे संशोधन भारतात सुरू आहे. त्यामध्ये आपलेच अभियंते, तज्ज्ञ अधिक आहेत. आयआयटी, विद्यापीठांमध्ये संशोधन सुरू आहे. पण निधीअभावी त्याला काही मर्यादा आहेत. तज्ज्ञ असले तरी संशोधनासाठी प्रयोगशाळा, वातावरण नाही. तुलनेने खासगी क्षेत्रात बऱ्यापैकी संशोधन होत आहे.>अपेक्षित गुंतवणूक, अनुभव नाहीभारतामध्ये संशोधन क्षेत्रात शासनाकडून अमेरिकेच्या तुलनेत ५ टक्केही गुंतवणूक केली जात नाही. खासगी क्षेत्रात मात्र तुलनेने चांगले संशोधन होत आहे. रोबोटिक्समध्ये प्रगती केली जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना खूप मोठी आहे. त्यासाठी अनुभवी तज्ज्ञही आपल्याकडे पुरेसे नाहीत. त्यासाठी पदवीस्तरापासून स्वतंत्र अभ्यासक्रम करण्याची गरज आहे. सध्या शैक्षणिक संस्थांमध्ये या विषयाकडे पर्यायी विषय म्हणून पाहिले जाते. परदेशातील बहुतेक संस्था, विद्यापीठे खासगी आहेत. आपल्याकडे शासनाचे नियंत्रण असल्याने निधी न मिळण्याबरोबरच नियम, धोरणांचा अडसर मोठ्या प्रमाणावर येतो.- दीपक शिकारपूर,प्रसिद्ध संगणकतज्ज्ञनोएडा येथील बेनेट युनिव्हर्सिटीमध्ये अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या (एआयसीटीई) पुढाकारातून आर्टिफिशियल इंटिलिजन्स क्लस्टर तयार करण्यात आले आहे. याअंतर्गत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासह अनेक शैक्षणिक संस्था एकत्रित आल्या आहेत. त्यामध्ये संस्थांमधील तज्ज्ञ, विविध प्रकल्प, प्रयोगशाळा यांची देवाणघेवाण होऊन कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळेल. अद्याप हे प्राथमिक स्तरावर आहे. पण आपल्याकडे आता याबाबतीत मोठी प्रगती झालेली दिसते. पण शैक्षणिक संस्थांमध्ये त्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा नाहीत. निधीची कमतरता असते. अभियांत्रिकीच्या एकाच शाखेत एक विषय म्हणून याचा समावेश आहे. याची व्याप्ती वाढण्याची गरज आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षी कृत्रिम बुद्धिमत्ता क्लबही सुरू केला आहे. त्यानुसार विद्यार्थी व प्राध्यापक एकत्रित येऊन विविध प्रकल्पांवर विचारविनिमय करतात.- डॉ. बी. बी. आहुजा, संचालक कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये संगणक अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ केवळ एका विषयात सामावलेली आहे. पण काही शैक्षणिक संस्था रोबोटिक्स, मशिन लर्निंग यांसह विविध विषयांत अधिक खोलवर जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. पूर्वीतर केवळ पदव्युत्तर अभ्यासक्रमातच हाविषय होता.विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, की कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये अधिक संशोधनासाठी आपल्याकडे आवश्यक ‘इको सिस्टीम’ तयार झालेली नाही. कृत्रिम बुद्धिमत्तेचे शिक्षण मिळाल्यानंतर त्या क्षमतेचे रोजगार मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी उद्योगक्षेत्रातही त्याचा पुरेसा वापर असायला हवा.भारतात असे उद्योग खूपकमी आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेवर स्वतंत्र अभ्यासक्रम किंवा संस्था सुरू करणे सध्या तरी गरजेचे नाही. आपल्याकडे तेवढी बुद्धिमत्ता असली तरी संशोधनाची संस्कृती विकसित झालेली नाही. तेवढ्या क्षमतेच्या प्रयोगशाळा तयार झालेल्या नाहीत. संशोधनामध्ये गुंतवणूक करून पुरेसा परतावा मिळत नाही. त्यामुळे शासनासह उद्योगक्षेत्रही त्यात पैसा गुंतविण्यासाठी पुढे येत नाहीत. प्रगत राष्ट्रांमध्ये याउलट चित्रआहे.विद्यापीठामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगअंतर्गत रोबोटिक्स अ‍ॅन्ड आॅटोमेशन हा बी. टेक. अभ्यासक्रम शिकविला जातो. त्यामध्येच कृत्रिम बुद्धिमत्तेवर प्रकाश टाकला जातो. सध्या ‘चॉईस बेस्ड’ शिक्षण पद्धतीचा काळ आहे. त्यानुसार अभ्यासक्रम सुरू केले जातात. जगभरात कृत्रिम बुद्धिमत्ता यावर संशोधन सुरू आहे. म्हणून प्रत्येक संस्थेने त्यावरच लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. विद्यार्थ्यांच्या गरजा, रोजगाराच्या संधी ओळखून बदल करणे आवश्यक आहे. तसेच कोणताही नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी एआयसीटीईची मान्यता व इतर गोष्टींचा अडसर येतो. विद्यापीठाकडे संशोधनासाठी आवश्यक प्रयोगशाळा, तज्ज्ञ उपलब्ध आहेत. पण सध्या तरी ‘चॉईस बेस्ड एज्युकेशन’ला प्राधान्य दिले जात आहे.- ग्रुप कॅप्टन (निवृत्त) दीपक आपटे, कुलसचिव एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्स