नवी दिल्लीः लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्यातच आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मोठं विधान केलं आहे. हिंदूजवळ भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. देशातील दलित-मुस्लिम ऐक्य शक्य नाही, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत. योगी आदित्यनाथ यांनी बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मायावती मुस्लिमांकडे मतं मागत आहेत. गठबंधनसाठी फक्त मतदान करा आणि स्वतःचं मत दुसऱ्या कोणाला जाऊ देऊ नका, असं त्या सांगत आहेत. त्यामुळे हिंदूकडे आता भाजपाशिवाय कोणताही पर्याय नाही. तसेच तुमचा अली, तर आमचा बजरंगबली असंही ते सपा-बसपा महागठबंधनला उद्देशून म्हणाले आहेत.
तुमचा अली, तर आमचा बजरंगबली- योगी आदित्यनाथ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 16:24 IST