शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

राज ठाकरेंना 'त्या'साठी आमची मार्गदर्शन करायची तयारी: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 15:09 IST

राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे, असं संजय राऊत म्हणाले

ठळक मुद्देराज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याची चर्चामनसेकडून राज यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन केलं जात आहेशिवसेना नेते संजय राऊत यांनी राज यांच्या अयोध्या दौऱ्यावर व्यक्त केलं मत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेअयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मनसेकडून त्यासाठीचं नियोजन देखील सुरू झाल्याचं सांगण्यात येतंय. राज ठाकरेंच्या या दौऱ्याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी महत्वाचं विधान केलंय. 

"राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू", असं संजय राऊत म्हणाले. ते 'एबीपी माझा' या वृत्तवाहिनीशी बोलत होते. 

मनसेची मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. पण त्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. 

राज ठाकरे लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत; भाजप-मनसे युतीची नांदी?

दरम्यान, याआधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीच्या काठावर महाआरती देखील केली होती. त्यानंतर आता राज ठाकरे यांनीही अयोध्येला जाण्याची तयारी केल्याचं बोललं जात आहे. 

शिवसेनेने पहिल्यांदाच राज ठाकरेंच्या कुटुंबावर केली जाहीर टीका; वाद चिघळण्याची शक्यता

"मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौरा केल्यानं शिवसेनेनं तिथं राम मंदिराच्या आंदोलनात ऊर्जा भरण्याचं काम केलं होतं. त्यामुळे कुणी कितीही काही म्हटलं, तरी राम मंदिरासाठी शिवसेनेनं घेतलेला पुढाकार तुम्ही नाकारू शकत नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला गेलो आहोत. प्रत्येकानं तिथं जायला हवं. राज ठाकरे जात असतील तर चांगली गोष्ट आहे. अयोध्येची संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन त्यांना हवं असेल तर ते द्यायची आमची तयारी आहे. अयोध्येत मंदिर कुठं आहे. रामलल्ला कुठं आहेत. कोणकोणती मंदिरं आहेत. शरयूच्या काठावर कसं जायचं अशा गोष्टींचं आम्ही नक्की त्यांना मार्गदर्शन करू", अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. 

शेतकरी आंदोलन बळाचा वापर करुन संपवण्याचा प्रयत्नकेंद्र सरकारकडून बळाचा वापर करून शेतकऱ्यांचं आंदोलन संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे. "गेले दोन महिने शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत. त्यांना देशभर सहानुभुती देखील मिळत आहे. शेतकऱ्यांना मिळणारी सहानुभूती आणि पाठिंबा नष्ट करण्यासाठीच आंदोलनाला बदनाम करण्याचा कट भाजपने रचला आहे. लालकिल्ल्यावर धुडगूस घालणारे भाजपवालेच होते हे आता व्हिडिओंतून समोर येऊ लागलं आहे", असं संजय राऊत म्हणाले.  

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसेAyodhyaअयोध्या