शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

"प. बंगालमध्ये काश्मीरपेक्षा वाईट स्थिती", भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार

By मोरेश्वर येरम | Updated: December 15, 2020 14:53 IST

राज्यात होणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्याची भाजपने निवडणूक आयोगाकडे मागणी केलीय.

ठळक मुद्देभाजपची पश्चिम बंगालमधील परिस्थितीवरुन निवडणूक आयोगाकडे धावराजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कारवाई करण्याची केली मागणीप.बंगालमध्ये तातडीने आचार संहिता लागू करण्याची भाजपची मागणी

नवी दिल्लीपश्चिम बंगालमधील विधानसभा निवडुकीसाठीचं राजकीय वातावरण आता चांगलंच तापू लागलं आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) मंगळवारी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. पश्चिम बंगालमधील परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करत कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. राज्यात होणाऱ्या राजकीय हिंसाचाराच्या घटनांवर कडक कारवाई करण्यात यावी असं भाजपचं म्हणणं आहे.

पश्चिम बंगालमधील सध्याची परिस्थिती ही काश्मीरपेक्षाही वाईट आहे, असं विधान निवडणूक आयोगाकडे तक्रार करणारे भाजपचे आमदार सब्यासाची दत्ता यांनी केलं आहे.

भाजपने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात पश्चिम बंगालमधील कायदा-सुव्यवस्था आणि हिंसाचाराचा उल्लेख केला आहे. यात अनेक घटनांची नोंद करण्यात आली आहे. 

>> जे.पी.नड्डा यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून पश्चिम बंगाल पोलीस पक्षपात करत आहे.>> पश्चिम बंगाल पोलीस तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते असल्याचं काम करत आहेत.>> राज्यात सुरक्षेच्या कारणास्तव निमलष्करी दलाची नियुक्ती केली जावी. >> राज्य सरकारी कर्मचारीच बैठका घेऊन तृणमूल काँग्रेसचा प्रचार करत आहेत. मग निवडणूक नि:पक्षपातीपणे कशी होईल?>> पश्चिम बंगालमध्ये तातडीने आचारसंहिता लागू करावी.अशा तक्रारी आणि मागण्या भाजपने निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत. 

भाजपच्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग देखील सक्रीय झालं असून १७ डिसेंबर रोजी आयोगाचे उपायुक्त सुदीप जैन पश्चिम बंगालचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात पश्चिम बंगालमधील परिस्थितीची पाहणी ते करणार आहेत.  

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालMamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग