शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

पुढच्या 25 वर्षांचा करार करून सत्तेत येणार; दसरा मेळाव्यात संजय राऊतांचा एल्गार

By हेमंत बावकर | Updated: October 25, 2020 19:30 IST

Sanjay Raut On Dasara Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील प्रयत्नांवर भाष्य केले.

मुंबई : शिवसेनेचे सरकार जे देशभरात ठाकरे सरकार म्हणून ओळखले जाते, ते पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचे शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगतिले. शिवाय पुढील्या पाच वर्षांनी सुद्धा सत्तेत येणारच आणि त्यापुढील 25 वर्षांचा जनतेसोबत करार करून सत्तेत राहणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली. 

याचबरोबर त्यांनी दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांना फटकारले. फलाना फलाना नेते दिल्लीतून सांगतात महाराष्ट्रातील सरकार पाडण्य़ासाठी मुंबईत 200 कोटी रुपये पाठविले आहेत. अरे मुंबईसाठी 200 कोटी रुपये हा फार कमी आकडा आहे. तुम्हाला शोभतील असे 2000 कोटी, 5000 कोटी असे आकडे सांगा. 200 कोटी हा तुमच्यासाठी महापालिकेचा आकडा झाला. कोणीही कितीही कारस्थाने केली, तरीही ठाकरे सरकार राहणार आहे, असे राऊत म्हणाले. आमच्यामागे 11 कोटी जनतेचा आशिर्वाद असल्याचे राऊत म्हणाले. 

 आता यापुढे सारे महा होणार आहे. हा महाविजयादशमी सोहळा आहे. आगामी काळात महाराष्ट्र दिल्लीचेही तख्त राखणार असल्याचे राऊत म्हणाले. 1 वर्ष होऊन गेले. जेव्हा मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणालो, त्याच दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता, असे सांगत त्यांनी सेनापती बापट यांच्या ओळी ऐकविल्या. थोड्याच दिवसांत कळेल की देशाचे नेतृत्व महाराष्ट्रच करणार आहे, ते कोण करणार हे आम्हाला माहिती आहे, असे राऊत म्हणाले. एक शिवसैनिक लाख शिवसैनिक, आपण मराठी आहोत सगळे, असे राऊत म्हणाले. तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनातून आराम पडावा आणि ते पुन्हा राज्याच्या सेवेत रुजू व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो, कारण समोर कोणतरी पैलवान हवा, असेही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस