शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

पुढच्या 25 वर्षांचा करार करून सत्तेत येणार; दसरा मेळाव्यात संजय राऊतांचा एल्गार

By हेमंत बावकर | Updated: October 25, 2020 19:30 IST

Sanjay Raut On Dasara Melava : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतील प्रयत्नांवर भाष्य केले.

मुंबई : शिवसेनेचे सरकार जे देशभरात ठाकरे सरकार म्हणून ओळखले जाते, ते पाच वर्षे पूर्ण करणार असल्याचे शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सांगतिले. शिवाय पुढील्या पाच वर्षांनी सुद्धा सत्तेत येणारच आणि त्यापुढील 25 वर्षांचा जनतेसोबत करार करून सत्तेत राहणार असल्याची घोषणा राऊत यांनी केली. 

याचबरोबर त्यांनी दिल्लीतील भाजपाच्या नेत्यांना फटकारले. फलाना फलाना नेते दिल्लीतून सांगतात महाराष्ट्रातील सरकार पाडण्य़ासाठी मुंबईत 200 कोटी रुपये पाठविले आहेत. अरे मुंबईसाठी 200 कोटी रुपये हा फार कमी आकडा आहे. तुम्हाला शोभतील असे 2000 कोटी, 5000 कोटी असे आकडे सांगा. 200 कोटी हा तुमच्यासाठी महापालिकेचा आकडा झाला. कोणीही कितीही कारस्थाने केली, तरीही ठाकरे सरकार राहणार आहे, असे राऊत म्हणाले. आमच्यामागे 11 कोटी जनतेचा आशिर्वाद असल्याचे राऊत म्हणाले. 

 आता यापुढे सारे महा होणार आहे. हा महाविजयादशमी सोहळा आहे. आगामी काळात महाराष्ट्र दिल्लीचेही तख्त राखणार असल्याचे राऊत म्हणाले. 1 वर्ष होऊन गेले. जेव्हा मुख्यमंत्री शिवसेनेचा म्हणालो, त्याच दिवशी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता, असे सांगत त्यांनी सेनापती बापट यांच्या ओळी ऐकविल्या. थोड्याच दिवसांत कळेल की देशाचे नेतृत्व महाराष्ट्रच करणार आहे, ते कोण करणार हे आम्हाला माहिती आहे, असे राऊत म्हणाले. एक शिवसैनिक लाख शिवसैनिक, आपण मराठी आहोत सगळे, असे राऊत म्हणाले. तसेच विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोनातून आराम पडावा आणि ते पुन्हा राज्याच्या सेवेत रुजू व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो, कारण समोर कोणतरी पैलवान हवा, असेही राऊत म्हणाले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस