शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या नियुक्तीची घोषणा होणार का?; सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 07:24 IST

बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्यावर पूर्णवेळ संघटनेचे काम करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशवर पक्षाने अध्यक्ष नेमलेला नाही.

मनोहर कुंभेजकर

मुंबई : गेल्या दिड वर्षा पासून मुंबई काँग्रेसला अध्यक्ष नाही. वयाची ८० पार केलेले एकनाथ गायकवाड हे सध्या मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. मुंबई आणि महाराष्ट्र प्रदेशचा अध्यक्ष बदलणार हे गेले वर्षभर काँग्रेस कार्यकर्ते ऐकत आहेत. मात्र अजूनही या दोन अध्यक्षपदांच्या नियुक्तीचा घोळ संपत नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे चित्र आहे.

बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीत मंत्रिपद दिल्यावर पूर्णवेळ संघटनेचे काम करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेशवर पक्षाने अध्यक्ष नेमलेला नाही. पक्षाची सर्वत्र पिछेहाट होत असतानाही काँग्रेसचे शिर्ष नेतृत्व स्वतःच पक्ष वाढीसाठी काही करू इच्छित नाही असा चुकीचा संदेश लोकांपर्यंत जात आहे. महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील हे दोन दिवसांच्या दौऱ्यावर उद्या दि, २ व दि, ३ रोजी मुंबईत येत आहेत. उद्या दुपारी १० ते १ पर्यंत ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मध्ये ते राज्यातील दलित नेत्यांशी चर्चा करतील. तर दुपारी ५ ते रात्री ८ पर्यंत गांधी भवन येथे पालिकेच्या काँग्रेसच्या नगरसेवकांसोबत ते चर्चा करतील. रात्री ८ ते ९  या वेळेत ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ते चर्चा करतील. तर गुरुवार, ३ रोजी ते सकाळी १० ते १ मध्ये निमंत्रितांच्या भेटीगाठी घेतील.

महाराष्ट्र कॉंग्रेस चे प्रभारी एच. के. पाटील यांनी आत्तापर्यंत ७-८ वेळा महाराष्ट्रात दौरा केलेला असून सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चाही केली आहे. गेल्या ऑक्टोबरला व नंतर दिवाळीच्या दुसऱ्या १७ नोव्हेंबर रोजी त्यांनी मुंबईचा दौरा केला होता. यावेळी मुंबई काँग्रेसचे  अध्यक्षपद व आगामी पालिका निवडणुकीविषयी त्यांनी काँग्रेसच्या मुंबईतील मान्यवर नेत्यांशी चर्चा देखिल केली होती. १९ रोजी एच. के. पाटील हे दिल्लीला जाऊन रिपोर्ट दिला. मात्र २०२२ची पालिकेची महत्वाची निवडणूक असतांना अजूनही मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची नियुक्ती जाहिर होत नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे.

पक्षाची वाटचाल दिशाहीन होत असल्याचे मतकाँग्रेसचे संकटमोचक अहमद पटेल यांच्या निधनाच्या ३-४ दिवसात जर पक्षाने नवीन खजिनदार नेमला तर संघटनेत मुंबई अध्यक्ष नेमायला किती वर्षे पाहिजे? अखिल भारतीय स्तरावर देखील अध्यक्ष नेमला नसल्याने २३ वरिष्ठ नेत्यांनी पत्र लिहिले आहे, तरी पक्ष अजून जुन्याच मगृरीत आहे असे पदाधिकाऱ्यांचे मत झाले आहे. गुरुदास कामत यांचे निधन, प्रिया दत्त , मिलिंद देवरा यांचे पक्षात अलिप्त राहणे व काम न करणे, संजय निरुपम यांची सततची वादग्रस्त वक्तव्ये आणि त्यामुळे जुन्या जाणत्या वरिष्ठ लोकांनी काँग्रेस सोडणे तसेच प्रसिद्ध अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर यांनी ही आज काँग्रेसला सोडचिठ्ठी देणे यामुळे पक्ष रसातळाला जात आहे. तरीही पक्ष नेतृत्वाला अजून अध्यक्ष जाहीर करायला वेळ मिळत नाही यामुळे पक्षाची वाटचाल दिशाहीन होत असल्याचे मत माजी मंत्र्याने व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तोडीस तोड़ व अनुभवी नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा अभ्यासू नेता काँग्रेसकड़े असताना त्यांची महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती पक्ष का करत नाही? असा प्रश्न सामान्य कार्यकर्ते विचारत आहेत.

टॅग्स :congressकाँग्रेस