शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

उमेदवार कोण, यावर सगळे गणित, सेना-भाजपाचे काय होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 6:25 AM

बिहारचे तत्कालीन राज्यपाल रा.सू. गवई यासारख्या दिग्गजांनी एकेकाळी प्रतिनिधित्व केलेल्या मतदारसंघात यावेळी होणारी लढतही चमकदार असेल.

- गणेश देशमुखऐतिहासिक राजकीय पार्श्वभूमी लाभलेला अन् अनुसूचित प्रवर्गांसाठी राखीव असलेला अमरावती लोकसभा मतदारसंघ हा देशभरातील चर्चित मतदारसंघांपैकी एक. श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे जनक डॉ.पंजाबराव देशमुख, देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा देवीसिंग पाटील, केरळ, बिहारचे तत्कालीन राज्यपाल रा.सू. गवई यासारख्या दिग्गजांनी एकेकाळी प्रतिनिधित्व केलेल्या या मतदारसंघात यावेळी होणारी लढतही चमकदार असेल.लोकसभेतील शिवसेनेचे गटनेता आनंदराव अडसूळ हे या मतदारसंघातून दुसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करीत आहेत. पूर्वाश्रमीच्या दाक्षिणात्य अभिनेत्री आणि अपक्ष आमदार रवि राणा यांच्या सौभाग्यवती नवनीत राणा यांनी आनंदराव अडसूळ यांना यापूर्वीच्या निवडणुकीत तगडे आव्हान दिले होते.हा मतदारसंघ अडसुळांचा असला तरी अडसूळ मात्र अमरावतीचे नाहीत. सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात अडसूळ हे बुलडाणा मतदारसंघातून २००९च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात पोहोचले. तत्पूर्वी ते बुलडाण्याचे खासदार होते. राखीव आणि सुरक्षित मतदारसंघ हे अडसूळ यांच्या राजकारणातील अग्रणी सूत्र. त्यामुळे आनंदराव अडसुळांनी यावेळी पुन्हा मतदारसंघ बदलल्यास आश्चर्य वाटू नये.अद्याप युतीची अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांतील इच्छुक प्रतिस्पर्ध्यांप्रमाणे वावरत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचा घरोबा जमला असला तरी अमरावतीची जागा कुणाला, हे अधिकृतपणे जाहीर झाले नसल्याने दोन्ही पक्षांमध्ये दाव्यांचे राजकारण रंगले आहे. एकंदरीत सर्वच पक्षांमधील इच्छुकांच्या उत्साहाला उधाण आले आहे.काँग्रेसचे किशोर बोरकर, भाजपच्या सीमा सावळे, राष्ट्रवादीचे दिनेश बूब देव पाण्यात ठेऊन आहेत. रा.सू. गवर्इंचे पुत्र आणि रिपाइंचे प्रमुख राजेंद्र गवई यांनी स्वत:ची उमेदवारी घोषित केली आहे. तर नवनीत राणा या कुठले तिकीट घेणार? याविषयी उत्सुकता आहे.'लोकमत'कडे असलेल्या विश्वसनीय माहितीनुसार, नवनीत या राष्ट्रवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील.भाजप-शिवसेनेची युतीझाल्यास सेनेचे आनंदराव अडसूळ यांचा दावा पहिला असेल.मतदारसंघ भाजपच्या वाट्याला दिला गेलाच तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या माजी स्थायी सभापती सीमा सावळे या उमेदवार असतील. त्यामुळे उमेदवार कोण असतील, यावरच या मतदारसंघाचेराजकीय गणित अवलंबून असेल. ते सारे युती होणे न होणे यावर अवलंबून आहे.>सध्याची परिस्थितीखासदार आनंदराव अडसूळ हे त्यांचे पायलट असलेले पुत्र दर्यापूरचे माजी आमदार अभिजित यांना लोकसभेच्या मैदानात उतरवून अनपेक्षित धक्का देऊ शकतात. संत्र्यामुळे श्रीमंती अनुभवलेला हा मतदारसंघ संत्राबागा वाळल्यामुळे भीषण आर्थिक अडचणीत आला. खासदारांच्या दोन टर्ममध्ये संत्र्यासाठी वेगळे काहीच केले गेले नाही. सेवानिवृत्त लोकांचे शहर असा परिचय आता अमरावतीचा द्यावा लागतो. निवृत्त लोक शहरात वास्तव्याला येतात. शहरात निर्माण झालेले अभियंते, डॉक्टर्स इतरत्र निघून जातात.अचलपूर जिल्हा निर्मिती, मेळघाट, पर्यटन, पाणीटंचाई, खारपाणपट्टा, विमानसेवा, तूर, कापूस, महापालिका अकार्यक्षमतेसंबंधीच्या समस्या निवारणासाठी हे सरकारही अपयशी ठरले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Anandrao Adsulआनंदराव अडसूळ