शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाणे: पाच पिढ्यांची साक्षीदार ‘विठाबाई’! महाराष्ट्रातील ज्येष्ठ आजीबाईचे ११४व्या वर्षी निधन
2
मोठी बातमी! मोदींच्या हत्येचा कट रशियाने उधळला? अमेरिकेचा एजंट ढाक्यामध्ये मारला गेला, चर्चांना उधाण...
3
धक्कादायक!! २ ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटरशी भारतात भरदिवसा घाणेरडे कृत्य, एकीच्या तर थेट...
4
Virat Kohli: ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कोहलीचा मोठा पराक्रम, इयान बॉथमचा महारेकॉर्ड मोडला!
5
Viral Video : आई रॉक्ड अन् लेकी शॉक्ड! सकाळी उशीरापर्यंत झोपून राहणाऱ्या मुलींना उठवण्यासाठी आईनं काय केलं बघाच!
6
पुढील वर्षी असं काही होईल, जे यापूर्वी कधीच झालं नाही, बाबा वेंगाची सोन्याबाबत मोठी भविष्यवाणी
7
महिला डॉक्टरने प्रशांत बनकरला प्रपोज केलेला, त्याने...; बहिणीचा धक्कादायक गौप्यस्फोट
8
Virat Kohli Celebration : चेहऱ्यावर हसू अन् खातं उघडल्याचा 'विराट' आनंद! व्हिडिओ बघाच
9
Crime: एकेकाळी 'राज्यस्तरीय पैलवान', लग्नानंतर ड्रग्जचं व्यसन जडलं, पैशांसाठी मुलाला विकले!
10
अफगाणिस्तानातून कोणकोणत्या नद्या पाकिस्तानच्या दिशेने वाहतात? तालिबानने प्रवाहच रोखला तर काय होईल?
11
भारतीय नर्सला सिंगापूरमध्ये १४ महिन्यांचा कारावास अन् २ चाबकाचे फटके; असं नेमकं काय घडलं?
12
IND vs AUS 3rd ODI : 'या' पठ्ठ्यानं कोच गंभीरचा विश्वास ठरवला सार्थ! ऑस्ट्रेलियनं संघ २३६ धावांवर ऑलआउट
13
जैन बोर्डिंगचा व्यवहार १ तारखेच्या अगोदर रद्द नाही झाला तर संपूर्ण देशभर मोठे आंदोलन; जैन मुनींचा इशारा
14
पाकिस्तान पुन्हा तोंडघशी पडला; UN मध्ये काश्मीरचा मुद्दा उपस्थित करताच भारतानं दाखवला आरसा
15
Shreyas Iyer Brilliant Catch : श्रेयसनं घेतला जबरदस्त कॅच! पण ऑस्ट्रेलियन बॅटरसह त्यानंही सोडलं मैदान; नेमकं काय घडलं?
16
ट्रम्प आता चीनशी पंगा घेणार...! जिनपिंग यांना थेट तैवानवरून जाब विचारणार, आशियाच्या दौऱ्यावर निघाले
17
Pandav Panchami 2025: आजच्या काळात काय आहे पांडव पंचमीचे महत्त्व? तिलाच 'लाभ पंचमी' का म्हणतात?
18
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर; मोदी सरकारनं 'या' प्रस्तावाला दिली मंजुरी, जाणून घ्या
19
VIRAL : एका आठवड्यात पैसे परत करेन म्हणणारी 'ऑनलाइन' मैत्रीण पालटली! १५ हजारांची मदत करणार्‍यालाच सुनावलं
20
पीएसआय गोपाल बदने परळीचा, शेवटचे लोकेशन पंढरपूर; प्रशांत बनकरचे आई-वडील म्हणतात...

“राज्याचा खरा मुख्यमंत्री कोण, अजित पवार की उद्धव ठाकरे?”; ‘तो’ प्रस्ताव परस्पर नाकारला

By प्रविण मरगळे | Updated: November 23, 2020 16:57 IST

VBA Leader Prakash Ambedkar on Electricty Bill News: अजित पवार की उद्धव ठाकरे या दोघांपैकी राज्याचा मुख्यमंत्री कोण याचा खुलासा त्यांनी करावा, अन्यथा वीजबिल बंद करा, वीजबिल भरू नका हे आंदोलन यापुढे तीव्र करू असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी सरकारला दिला आहे.

ठळक मुद्दे२०१४ ते २०१९ मध्ये महावितरणाला जो आर्थिक फटका बसला याला सर्वस्वी भाजपा जबाबदार आहेवीजबिलाचं आंदोलन सर्वात पहिलं आम्ही केले, कॉपी कॅट आंदोलन करण्यापेक्षा नवीन काहीतरी कराअर्थमंत्री अशाप्रकारे प्रस्ताव नाकारतात, मुळात अजित पवारांना तसा अधिकार आहे का?

मुंबई – महावितरणाने वीज ग्राहकांना ५० टक्के वीजबिलात सवलत देऊ शकतो असा प्रस्ताव ऊर्जा खात्याकडे आला, त्यानंतर ऊर्जा मंत्रालयाने ही फाईल अर्थमंत्री अजित पवारांना देतात, त्यावर अजित पवार मुख्यमंत्र्यांना विचारात न घेता, मंत्रिमंडळाता न विचारता ऊर्जा खात्याचा प्रस्ताव नाकारतात, अर्थसंकल्पावर अंमल करण्याचा अधिकार अर्थमंत्र्यांना असतो, अर्थसंकल्पाव्यतिरिक्त काही निधीचा प्रस्ताव असेल तर तो मुख्यमंत्र्यांकडे जावा लागतो, मग ऊर्जा खात्याचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पोहचलाच नाही, मग खरा मुख्यमंत्री कोण? असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मागील सरकारच्या काळात वीजबिलात मोठी थकबाकी झाली, आता जी सूट मागितली जात आहे ती घरगुती वापरासंदर्भात मागितली जात आहे, यासाठी सरकारला साडेतीन हजार कोटींचा बोजा पडणार आहे. अजित पवार की उद्धव ठाकरे या दोघांपैकी राज्याचा मुख्यमंत्री कोण याचा खुलासा त्यांनी करावा, अन्यथा वीजबिल बंद करा, वीजबिल भरू नका हे आंदोलन यापुढे तीव्र करू असा इशारा प्रकाश आंबेडकरांनी सरकारला दिला आहे.

२०१४ ते २०१९ मध्ये महावितरणाला जो आर्थिक फटका बसला याला सर्वस्वी भाजपा जबाबदार आहे, त्यामुळे वीजबिलाबाबत भाजपाला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. वीजबिलाचं आंदोलन सर्वात पहिलं आम्ही केले, कॉपी कॅट आंदोलन करण्यापेक्षा नवीन काहीतरी करा. आंदोलन करण्याचा सर्वपक्षांना अधिकार आहेत. त्यामुळे आंदोलन कुठल्या मुद्द्यावर करावं हे ज्याचं त्याने ठरवावं असं सांगत प्रकाश आंबेडकरांनी भाजपावरही टीकास्त्र सोडलं.

दरम्यान, महावितरण विभागाने ५० टक्के वीजबिलात सवलत देता येईल असा प्रस्ताव अर्थ खात्याला दिला जातो, त्यानंतर अर्थमंत्री अशाप्रकारे प्रस्ताव नाकारतात, मुळात अजित पवारांना तसा अधिकार आहे का? विभागाने जो प्रस्ताव दिला तो मुख्यमंत्र्यांकडे पोहचत नाही, त्यांना कल्पनाही नाही, मुख्यमंत्रीही त्यात लक्ष घालत नाहीत, मग राज्यात खरा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न पडतो, मंत्री आहेत तेच मुख्यमंत्री आहेत का? की ज्यांना मुख्यमंत्रिपद दिलेत ते आहेत. ऊर्जा खात्याने ५० टक्के वीजबिलात सवलत देऊ शकतो असा प्रस्ताव दिला होता, या प्रस्तावाचा अर्थसंकल्पावर काहीही परिणाम होणार नव्हता. मग हा प्रस्ताव का फेटाळण्यात आला? सामान्य माणसांचे नुकसान यामुळे होत आहे, त्यामुळे लोकांनी वीजबिल भरू नये असं आवाहन प्रकाश आंबेडकरांनी जनतेला केले आहे.

आधी वीजबिल भरा, असे सांगणाऱ्यांची तक्रार करा

आधी वीजबिल भरा, नंतर वीजबिल दुरुस्ती करून देतो, असे अधिकारी सांगत असतील त्यांची तक्रार करा. तक्रार प्राप्त झाल्यास त्यांना घरी बसवल्याशिवाय राहणार नाही. कारण आमच्या अशा सूचना नाहीत. काही अधिकारी, कर्मचारी जाणूनबुजून अशा पद्धतीची वागणूक देत असतील तर त्यांची तक्रार वेबसाइटवर करा असं आवाहन ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे.

मंत्रालयात घुसून आंदोलनाचा इशारा

ऊर्जा उद्योगाच्या खासगीकरण धोरणाविरुद्ध व वीज कायदा २०२० रद्द करावा, यासाठी २६ नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडी सरकारने येत्या तीन दिवसांत बीजबिलात सवलतीचा निर्णय घेतला नाही तर मंत्रालयात घुसून आंदोलन करू, इशारा भाजपाने दिला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवारNitin Rautनितीन राऊतelectricityवीजPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर