शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

'मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला?'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2019 06:47 IST

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

भिवंडी : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरच्या सहीने देशात चलनी नोटा चालवल्या जात असताना, मोदींना नोटा रद्द करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न करत बहुजन वंचित आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भिवंडीतील जाहीर सभेत सरकारवर टीका केली.भिवंडीतील टावरे स्टेडियम येथे शुक्रवारी झालेल्या या सभेमध्ये एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी, आ. वारीस पठाण, वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अरुण सावंत आदी उपस्थित होते. अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले की, या मतदारसंघातून मुंबईला पाणी जाते; परंतु येथील विधानसभा क्षेत्रात पाण्याचे प्रश्न तसेच आहेत. शहरातील यंत्रमाग व्यवसायाला चालना देण्यासाठी पूर्वीच्या काँग्रेस व भाजपच्या खासदारांनी आतापर्यंत काहीच प्रयत्न केले नाहीत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थितांना खिशातील १०रु पयांची नोट बाहेर काढून, नोटाच्या मागील मजकूर वाचण्यास सांगितले. नोटांवरील गव्हर्नरांचा संदेश त्यांनी भरसभेत वाचला व प्रतिप्रश्न केला की, जर गव्हर्नरांच्या सहीने नोटा चलनात आणल्या जातात, तर नोटा रद्द करण्याचा अधिकार मोदींना कोणी दिला असा सवाल केला.साध्वी प्रज्ञांना हद्दपार करण्याचे आवाहननरेंद्र मोदी यांनी लोकसभेत १० टक्के आर्थिक निकषांवर घेतलेला आरक्षणाचा विषय असो किंवा ट्रिपल तलाकचा विषय असो, त्यास विरोध करण्यासाठी कोणी सहकारी नव्हते. त्यासाठी मुस्लिम व अनुसूचित जातींच्या हक्काच्या संरक्षणासाठी आपल्या विचारांचे संसदेत खासदार पाठवणे जरुरीचे आहे, असे असदुद्दीन ओवेसी यांनी यावेळी सांगितले. अभिनेता अक्षयकुमार याने घेतलेल्या मोदींच्या मुलाखतीची त्यांनी खिल्ली उडवली. साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल अपशब्द वापरले. मात्र भाजप अशा व्यक्तींवर कारवाई करत नाही. हा महाराष्ट्राचा अपमान आहे. त्यामुळे अशा देशद्रोही प्रवृत्तींना मतदारांनी हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन ओवेसी यांनी केले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019bhiwandi-pcभिवंडीPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरNarendra Modiनरेंद्र मोदी