शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

दिलदार शत्रू! जेव्हा अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते, मी जिवंत आहे ते केवळ राजीव गांधी यांच्यामुळेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2020 10:30 IST

असाच एक मनाला भिडणारा किस्सा अटलबिहारी वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) यांनी स्वत: त्यांच्या आयुष्यात घडला होता तो अनेकदा सार्वजनिकरित्या जाहीर केला आहे.

नवी दिल्ली – देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची आज दुसरी पुण्यतिथी आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी वाजपेयींच्या आठवणींना उजाळा दिला आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे राजकीय जीवन नेहमी आदर्शमय राहिलं आहे. ज्यात त्यांनी त्यांच्या राजकीय विरोधकांना सन्मान आणि आदर कायम जपला आहे.

असाच एक मनाला भिडणारा किस्सा अटलबिहारी वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) यांनी स्वत: त्यांच्या आयुष्यात घडला होता तो अनेकदा सार्वजनिकरित्या जाहीर केला आहे. १९९१ मध्ये जेव्हा माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली होती. त्यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते अटलबिहारी वाजपेयी संसदेत विरोधी पक्षनेते होते. तेव्हा एका ज्येष्ठ पत्रकाराने वाजपेयी यांच्याकडे राजीव गांधी यांच्याबद्दल त्यांची प्रतिक्रिया मागितली. तेव्हा अटलबिहारी वाजपेयी अतिशय भावूक झाले. त्यांनी त्यांच्या अंदाजात एक घडलेला किस्सा पत्रकाराला सांगत मी आज जिवंत आहे ते केवळ राजीव गांधी यांच्यामुळेच अशा शब्दात भावना व्यक्त केली.

ही गोष्ट आहे १९८४-१९८९ दरम्यान..जेव्हा राजीव गांधी(Rajiv Gandhi) देशाचे पंतप्रधान होते आणि अटलबिहारी वाजपेयी हे किडनीच्या आजारामुळे त्रस्त होते. तेव्हा भारतात अशा आजारासाठी उत्तम आरोग्य व्यवस्था उपलब्ध नव्हती. ज्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांना उपचारासाठी अमेरिकेत जावं लागतं. पण आर्थिक कारणांमुळे वाजपेयी अमेरिकेला जाऊ शकत नव्हते. अटलबिहारी वाजपेयी हा अनुभव सांगताना भावूक झाले होते.

ते म्हणाले की, मी किडनीच्या आजारापासून त्रस्त आहे ही बाब कोणीतरी पंतप्रधान राजीव गांधी यांना सांगितली आणि मला परदेशात उपचारासाठी जाणं गरजेचे आहे हे त्यांना माहिती पडले. एकेदिवशी राजीव गांधी यांनी मला त्यांच्या कार्यालयात बोलावले आणि सांगितले की, भारताकडून एक शिष्टमंडळ संयुष्ट राष्ट्राला पाठवायचं आहे. मला अपेक्षा आहे की, या संधीचा लाभ घेऊन तुम्ही न्यूयॉर्कमध्ये तुमचा उपचारदेखील कराल. राजीव गांधी यांच्यामुळे मला न्यूयॉर्कला जाता आले. माझा उपचार झाल्याने मी बरा झालो. त्यामुळे त्यांच्यामुळे आज मी जिवंत आहे असं अटलबिहारी वाजपेयींनी सांगितले.

न्यूयॉर्कवरुन परतल्यानंतर ना राजीव गांधींनी ही गोष्ट कोणाला सांगितली, ना मी बोललो. राजकीय आयुष्यात आम्ही कायम एकमेकांच्या विरोधाची भूमिका घेतली. मात्र अटलबिहारी वाजपेयी यांनी काही काळानंतर एका पोस्टकार्डच्या माध्यमातून राजीव गांधींनी केलेल्या मदतीबद्दल त्यांचे आभार मानले. अटलबिहारी वाजपेयी आणि राजीव गांधी हे दोघंही आज हयात नाहीत. मात्र राजकारणात दिलदार शत्रू कसा असावा हे वाजपेयी आणि राजीव गांधी यांच्या या गोष्टीतून नक्कीच शिकायला मिळतं.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीRajiv Gandhiराजीव गांधीPoliticsराजकारण