शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
3
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
4
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
5
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
6
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
7
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
8
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
9
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
10
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
11
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
12
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
13
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
14
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
15
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
16
‘लजावल इश्क’वरून पाकिस्तानात गदारोळ; यूझर्सनी हा शो ‘बायकॉट’ करण्याचं केलं आवाहन
17
दिल्लीत नवा आदेश! ‘दरवाजे उघडा, डोळे बंद ठेवा’; नोकरशाहीच्या वर्तुळाला थंडीत घाम फुटण्याची वेळ
18
व्हिसाचे संकट, संधीचा व्हिसा! भारत जगात नवे स्थान निर्माण करू शकतो, जर...
19
भारतीय विद्यार्थ्यांच्या अमेरिकन ड्रीमची नौका बुडणार की काय?
20
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?

West Bengal Violence: अशी ‘ही’ बनवाबनवी! बंगाल हिंसाचारातील पीडित म्हणून भाजपानं चक्क पत्रकाराचाच फोटो वापरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 15:16 IST

BJP has posted a video on its social media handles attacking the TMC: या व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, माणिक मोइत्रा नावाच्या एका व्यक्तीला सीतलकूची येथे मारण्यात आलं आहे

ठळक मुद्देपश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेतबंगालच्या विविध भागात जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीचे प्रकार सुरू आहेत. टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ला होत असल्याचा आरोप

कोलकाता – पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील वातावरण तापलं आहे. भारतीय जनता पार्टीने ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसवर हिंसाचाराचे गंभीर आरोप लावले आहेत. बंगालमधील या घटनांचा निषेध करण्यासाठी भाजपाने संपूर्ण देशभरात धरणं आंदोलनही केले होते. बुधवारी भाजपाच्या बंगाल पदाधिकाऱ्यांकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे.

या व्हिडीओत असा दावा करण्यात आला आहे की, माणिक मोइत्रा नावाच्या एका व्यक्तीला सीतलकूची येथे मारण्यात आलं आहे. पण भाजपाने या व्हिडीओत ज्या व्यक्तीचा फोटो वापरला आहे तो एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनेलचा पत्रकार अभ्रो बनर्जी यांचा आहे. बंगालमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर भाजपाने ९ लोकांच्या नावाची यादी जारी केली आहे. ज्यात मोमिक मोइत्रा, मिंटू बर्मन यांच्या नावाचा समावेश आहे. परंतु माणिक मोइत्रा नावाने कोणाची ओळख पटली नाही.

या व्हिडीओवरून वाद-विवाद झाल्यानंतर भाजपाने हा व्हिडीओ ट्विटरवरून हटवला आहे. मात्र त्याआधीच हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला होता. भाजपाने ५.२८ मिनिटांचा एक व्हिडीओ बुधवारी जारी केला. जो भाजपाच्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आला होता. हा व्हिडीओ १२ हजाराहून अधिक लोकांनी पाहिला. व्हिडीओत जो फोटो लावला होता तो इंडिया टूडेचे पत्रकार अभ्रो बनर्जी यांचा होता

या प्रकरणात अभ्रो बनर्जी यांनी सांगितले की, आज सकाळी उठण्यासाठी मला थोडा वेळ झाला. तेव्हा मोबाईलवर पाहिलं की १०० पेक्षा अधिक मिस कॉल येऊन गेले. एवढे मिसकॉल पाहून मला धक्का बसला त्यानंतर अरविंद नावाच्या मित्राने फोन करून सांगितलं भाजपाच्या आयटी सेलने माणिक मोइत्राऐवजी तुझ्या फोटोचा वापर केला आहे. हा व्हिडीओ पाहून मी चकीत झालो असं त्यांनी म्हटलं. इतकचं नाही तर मी इथं १४०० किमी दूर आहे. परंतु एखादी चुकीची माहिती किती धोकादायक ठरू शकते. अभ्रो बनर्जी सध्या दिल्लीत आहेत आणि ते न्यूज चॅनेलमध्ये काम करतात.

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना

पश्चिम बंगालच्या निवडणूक निकालानंतर राज्यात हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. रविवारी सुरू झालेला हिंसाचार अद्यापही शांत झाला नाही. बंगालच्या विविध भागात जाळपोळ, दगडफेक, तोडफोडीचे प्रकार सुरू आहेत. टीमसीच्या कार्यकर्त्यांकडून भाजपाच्या अनेक कार्यकर्त्यांवर हल्ले करण्यात येत आहेत. त्यात अनेकांचा जीव गेलाय असा आरोप भाजपाने केला आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी