शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदींनी 115 योजना आणल्या, पण ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले - अमित शाह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 17:23 IST

West bengal Assembly Election 2021 : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

ठळक मुद्देराज्यात भाजपा सरकार सत्तेत आल्यास 18 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले जातील, असे आश्वासन अमित शहा यांनी दिले.

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी (West bengal Assembly Election 2021) अजून काही दिवस शिल्लक आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपा आणि तृणमूल काँग्रेस यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारवर हल्लाबोल केला आहे. बंगालच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 115 योजना आणल्या, तर ममता बॅनर्जी यांच्या सरकारमध्ये 115 घोटाळे झाले, असे म्हणत अमित शाह यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला. (West Bengal Polls : 'Didi's 115 scams vs PM Modi's 115 schemes': Amit Shah goes all out against Mamata Banerjee)

राज्यातील पुरुलिया जिल्ह्यात आयोजित रॅलीत अमित शाह बोलत होते. यावेळी ममता दीदी तुम्हाला फ्लोराइडयुक्त पाणी देते. एकदा तुम्ही दीदीला सत्तेबाहेर जाण्याचा मार्ग दाखवा, त्यानंतर भाजपा सरकार तुम्हाला 10 हजार कोटी रुपये खर्च करुन तुम्हाला शुद्ध पिण्याचे पाणी देईल, असे अमित शाह यांनी सांगितले. तसेच, कम्युनिस्टांनी येथे उद्योग सुरू होऊ दिले नाहीत. यानंतर दीदींनी उद्योगांनाही बाहेर ठेवले. तृणमूल काँग्रेस असो किंवा कम्युनिस्ट कोणीही रोजगार देऊ शकत नाही. तुम्हाला रोजगार हवा असेल तर एनडीए सरकारला मतदान करावेच लागेल, असे अमित शाह म्हणाले.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट १८ हजार रुपये पाठविले जातीलपंतप्रधान मोदींनी राज्याच्या विकासासाठी ११५ योजना आणल्या. मात्र, त्यांना राज्यात राबविण्यात आल्या नाहीत. यादरम्यान, ममता सरकारमध्ये 115 घोटाळे झाले. राज्यात भाजपा सरकार सत्तेत आल्यास 18 हजार रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठविले जातील, असे आश्वासन अमित शाह यांनी दिले.

आदिवासींच्या हितासाठी एक बोर्ड स्थापण करण्याचा निर्णयअमित शाह यांनी राज्यातील आदिवासींच्या हिताबद्दलही भाष्य केले आहे. ते म्हणाले की आदिवासींच्या हितासाठी आम्ही एक बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यतिरिक्त सार्वजनिक क्षेत्रातील महिलांसाठी 33 टक्के आरक्षण दिले जाईल. याशिवाय, राज्यभर महिलांसाठी सार्वजनिक वाहतूक मोफत करण्यात येणार आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Amit Shahअमित शहाWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१BJPभाजपाMamata Banerjeeममता बॅनर्जी