शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

West Bengal Assembly Election 2021:  राहुल गांधी जिथे जिथे सभेसाठी गेले, तिथे तिथे काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 16:32 IST

West Bengal Assembly Election 2021: काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीचे पश्चिम बंगालमधील अस्तित्व जवळपास संपुष्टात आले असून, काँग्रेस आणि डाव्यांना एकही जागा मिळाली नाही.

ठळक मुद्देबंगालमध्ये काँग्रेस डाव्या आघाडीच्या तब्बल ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट झाले जप्त राहुल गांधी यांनी माटीगारा-नक्षलवाडी आणि गोलपोखर येथे १४ एप्रिल रोजी प्रचारसभा घेतल्या होत्यामात्र येथील काँग्रेसचे उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला आहे. (West Bengal Assembly Election 2021) तर दोनशे जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला ७७ जागांवरच समाधान लागले. मात्र या निवडणुकीत काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आघाडीचे पश्चिम बंगालमधील अस्तित्व जवळपास संपुष्टात आले असून, काँग्रेस (Congress) आणि डाव्यांना एकही जागा मिळाली नाही. दरम्यान, बंगालमध्ये काँग्रेस डाव्या आघाडीच्या तब्बल ८५ टक्के उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे ज्या दोन ठिकाणी राहुल गांधी (Rahul Gandhi)यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या तिथेही काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होऊन दारुण पराभव झाला आहे. (Congress deposits confiscated wherever Rahul Gandhi held rallies)

या संदर्भातील वृत्त न्यूज १८ ने प्रसारित केले आहे. त्यातील आकडेवारीनुसार पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस, डावे पक्ष आणि आयएसएफ आघाडीने २९२ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी केवळ ४२ जागांवर अनामत रक्कम वाचवता आली. या आघाडीतील आयएसएफ या घटक पक्षाला एक जागा मिळाली. तर काँग्रेस आणि डाव्या आघाडीला एकही जागा मिळाली नाही. त्यामुळे बंगालच्या विधानसभेत पहिल्यांदाच काँग्रेस आणि डाव्या पक्षांचे सदस्य दिसणार नाही.    काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी माटीगारा-नक्षलवाडी आणि गोलपोखर येथे १४ एप्रिल रोजी प्रचारसभा घेतल्या होत्या. मात्र येथील काँग्रेसचे उमेदवार आपले डिपॉझिट वाचवू शकले नाहीत. माटीगारा-नक्षलवाडी मतदारसंघावर काँग्रेसचा दशकभरापासून कब्जा होता. मात्र येथील आमदार शंकर मालाकार यांना यावेळी केवळ ९ टक्के मते मिळाली. गोलपोखर येथेही काँग्रेसला केवळ १२ टक्के मते मिळाली. 

काँग्रेस, डावे पक्ष आणि आयएसएफ आघाडीमध्ये डाव्या पक्षांनी १७० जागा लढवल्या होत्या. त्यापैकी २१ जागांवर त्यांना डिपॉझिट वाचवता आले. तर काँग्रेसला ९० जागांपैकी ११ जागांवर डिपॉझिट वाचवण्यात यश मिळवले. तर आयएसएफने ३० जागांपैकी १० जागांवर डिपॉझिट वाचवण्यात यश मिळवले. तसेच एका जागेवर विजयही मिळवला.  डाव्या पक्षांना केवळ चार जागांवर तर काँग्रेसला केवळ २ जागांवर दुसऱ्या क्रमांकावर राहता आले. दरम्यान, या पक्षांच्या मतांच्या टक्केवारीत झालेल्या मोठ्या प्रमाणावरील घटीचा थेट फायदा तृणमूल काँग्रेसला झाला. बंगालमध्ये काँग्रेसला केवळ २.९४ तर डाव्या पक्षांना केवळ ५ टक्के मते मिळाली.  

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीWest Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१Politicsराजकारण