शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

चौकीदार शतप्रतिशत चोर; राहुल गांधी यांचे कर्नाटकात टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2019 03:46 IST

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार हा शतप्रतिशत चोरच असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली.

कोलार : भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौकीदार हा शतप्रतिशत चोरच असल्याची टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी केली. मोदी यांनी ३0 हजार कोटी रुपये चोरुन त्यांचे मित्र अनिल अंबानी यांना दिल्याचा राफेल विमानाच्या सौद्यावरून त्यांनी आरोप केला.कर्नाटकातील कोलार येथील एका रॅलीमध्ये राहुल यांनी मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, भ्रष्टाचाऱ्यांच्या सर्वच नावांमध्ये मोदी कसे असा प्रश्न करून राहुल यांनी नीरव असो, ललित असो वा नरेंद्र सारेच मोदी भ्रष्टाचारी निघाले, अजून असे किती मोदी पुढे येतील ते, समजत नाहीत, अशी टीका केली.नीरव, ललित, मेहुल चोकसी, मल्ल्या, अनिल अंबानी यांच्यासोबत नरेंद्र मोदीसह साºयाच चोरांची एक टोळी आहे. स्वत:ला चौकीदार समजणारे मोदी आता शेतकरी, रोजगार आणि भ्रष्टाचाराबद्दल बोलतच नाहीत.तुम्ही कधी शेतकºयाच्या, कामगाराच्या आणि बेरोजगार व्यक्तीच्या घराबाहेर चौकीदार पाहिला आहे का? पण हे चौकीदार मात्र १५-२० धनदांडग्यांची चौकीदारी करता आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है, अशी मोहीम यापूर्वीच सुरू केली होती. गेल्या वर्षी नोव्हेबंर महिन्यात राजस्थानात झालेल्या रॅलीत राहुल यांनी चौकीदार चोर है, अशी देशाची नवी मोहीम असेल, असे म्हटले होते. मोदीजी म्हणाले होते, मला एकवेळ पंतप्रधान बनवू नका, पण देशाचा चौकीदार करा, परंतु सत्तेत येताच पंतप्रधानांनी त्यांचे शब्द फिरविले आणि लोकांचा विश्वास गमावला, अशी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेस जर सत्तेत आली, तर संसदेत आणि विधानसभेबरोबरच सरकारी नोकरीतही महिलांना ३३ टक्के आरक्षण देईल, अशी घोषणा यावेळी राहुल यांनी केली. राहुल गांधी यांनी या रॅलीत न्याय योजनेचाही उल्लेख केला. ते म्हणाले, या योजनेंतर्गत जवळपास पाच कोटी परिवारांच्या खात्यात वार्षिक ७२ हजार रुपयांची रक्कम देण्यात येईल. पक्षाने जाहीरनाम्यात याची माहिती दिली असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकKarnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक 2019kolar-pcकोलारRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी