शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

वासनिक म्हणाले, ‘सॉरी’ दुखावण्याचा हेतू नव्हता; लेटरबॉम्ब टाकणाऱ्यांची आज तलवार म्यान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 08:32 IST

कार्यसमितीच्या कायम आमंत्रित सदस्य रजनीताई पाटील यांनीही बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच पक्षाला उत्तम नेतृत्व देऊ शकतात ही बाजू धरून लावली.

विकास झाडे

नवी दिल्ली : कॉँग्रेस कार्यसमितीच्या सात तास झालेल्या बैठकीत बराच वेळ हा रविवारी वरिष्ठ नेत्यांनी पक्षश्रेष्ठींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेल्या लेटरबॉम्बवर गेला. कॉँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी त्यांच्याकडून झालेल्या प्रकारावर दिलगिरी व्यक्त केली. माझ्याकडून असे अनवाधानाने घडले, कोणाला दुखावण्याचा माझा हेतू नव्हता अशी खंत त्यांनी बैठकीत व्यक्त केली.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, आज बैठकीत पक्षाचे कोषाध्यक्ष अहमद पटेल यांनी या तिन्ही नेत्यांच्या कृतीची निंदा करीत यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती याकडे लक्ष वेधले, त्यावेळी गुलाम नबी आझाद यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. परंतु मुकुल वासनिक यांनी माझ्याकडून अनवधानाने असे झाले असल्याचे सांगत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. आनंद शर्मा यांनीही वासनिकांच्या सुरात सूर मिळवला. माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनीही आज यावर भाष्य करण्याचे टाळले.

कार्यसमितीचे कायम आमंत्रित सदस्य खा. राजीव सातव यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची बाजू लावून धरली. पक्षात सामूहिक नेतृत्वातून निर्णय घेतले जात नाहीत या आरोपाचा सातव यांनी बैठकीत चांगलाच समाचार घेतला. मी गुजरातचा प्रभारी आहे या काळात पक्षश्रेष्ठींनी कोणताही निर्णय घेताना मला आणि प्रदेशाध्यक्षांनाच विचारून घेतला आहे. महाराष्ट्रात प्रभारी आणि प्रदेश अध्यक्षाला वगळून कोणते निर्णय पक्षश्रेष्ठीने घेतले ते टीकाकारांनी सांगावे. असे कोणतेही राज्य नाही की, तेथील प्रदेश अध्यक्ष आणि प्रभारीला न विचारता निर्णय घेतले जातात. दहा वर्षे डॉ. मनमोहन सिंग हे देशाचे पंतप्रधान होते, हे सरकार सामुहिक नेतृत्वातून चालले नाही का? ज्यांनी आता पक्षांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले त्यांनी आधी मंत्रिपदेही भोगले आहे. त्यांचे पक्षासाठी किती योगदान होते? याचे मुल्यमापन व्हायला नको का? असा सवालही खा. सातव यांनी उपस्थि केल्याचे सुत्राने सांगितले. आपण बैठकीत दिलगिरी व्यक्त केली का? असे ‘लोकमत’ने एसएमएसद्वारा मुकुल वासनिक यांना विचारले असता त्यांनी उशिरा ‘नो’ असे उत्तर दिले.उत्तम नेतृत्वकार्यसमितीच्या कायम आमंत्रित सदस्य रजनीताई पाटील यांनीही बैठकीत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हेच पक्षाला उत्तम नेतृत्व देऊ शकतात ही बाजू धरून लावली. कॉँग्रेस एकसंघ ठेवण्याचे आणि सामूहिक नेतृत्व देण्याचे कौशल्य केवळ त्यांच्यातच आहे. याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीMukul Wasnikमुकूल वासनिक