शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha Adhiveshan: ...मग तुम्हाला काय इथे भजी-वडे तळायला बसवलंय?; देवेंद्र फडणवीसांचा रोखठोक सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 13:53 IST

Vidhan Sabha Adhiveshan Live Update: सगळं काम केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला काय भजी-वडे तळायला बसवलंय, असा बोचरा सवाल फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारला विचारला.

मुंबई - तालिका अध्यक्षांनी १२ आमदारांच्या केलेल्या निलंबनानंतर विधानसभा अधिवेशनात भाजपाने सत्ताधाऱ्यांविरोधात अधिकच आक्रमक भूमिका घेतली आहे. (Vidhan Sabha Adhiveshan) दरम्यान, विधिमंडळाच्या पायऱ्यांवरील प्रतिअधिवेशनावर कारवाई करण्यात आल्यानंतर भाजपाने माध्यमांच्या कक्षात जाऊन प्रतिविधानसभा आयोजित केली. यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी आक्रमक रूपात विरोधीपक्ष नेत्याचे भाषण करून राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सगळं काम केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला काय भजी-वडे तळायला बसवलंय, असा बोचरा सवालही फडणवीस यांनी यावेळी ठाकरे सरकारला विचारला. (Devendra Fadanvis Criticize Mahavikas Aghadi Government)

देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात म्हणाले की, आम्ही विविध विषयावर प्रश्न उपस्थित करून सरकारची पोलखोल करत असल्याने सत्ताधाऱ्यांमध्ये चलबिचल सुरू आहे. आज १२ वाजता प्रतिविधानसभेत मी बोलणार म्हणून मार्शलना पाठवून आम्हाला हटवण्यात आले. मात्र आमचा आवाक कुणीही बंद करू शकत नाही. सरकारला लोकशाहीची चाड नाही. मात्र आम्ही लोकशाही जिवंत ठेवणारे लोक आहोत. त्यामुळे आम्ही विरोधात आवाज उठवत राहू. हे सरकारच सर्वच बाबतीती अपयशी ठरले आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

ते म्हणाले की, या सरकारमुळे महाराष्ट्र कोरोनाची राजधानी बनली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी ६० लाख रुग्ण हे महाराष्ट्रमध्ये सापडले आहेत. राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडाही मोठा आहे. त्यातही एकूण मृत्यूंपैकी निम्मे मृत्यू हे एप्रिल, मे आणि जून या तीन महिन्यांत झाले आहेत. आज सरकारने तीन कोटी लसींची मागणी करणारा ठराव मंजूर केला आहे. मात्र आतापर्यंत राज्यात जे लसीकरण झाले त्या लसी आल्या कुठून जमिनीतून आल्या की आकाशातून पडल्या, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी विचारला.

या सरकारला शेतकऱ्यांचे शाप लागणार आहेत. त्यांना राजकारणात  राजकारणात जागा राहणार नाही. अमरावती जिल्ह्यात दोन दिवसांत सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यात शेतकऱ्यांच्या भयानक प्रमाणात आत्महत्या होत आहेत. शेतकऱ्यांना नागवलं जातंय, तर वारकऱ्यांना जेरबंद केलं जातंय. मुघल, इंग्रजांना जमलं नाही ते ठाकरे सरकारनं करून दाखवलं आहे. या राज्यात खुन्यांना, बलात्काऱ्यांना अटक होत नाही. मात्र वारकऱ्यांना अटक होत आहे. काय मर्दुमकी आहे या सरकारची. पन्नासपेक्षा कमी लोकांमध्ये वारी करतो, परंपरा जपायची आहे, एवढीच मागणी वारकऱ्यांकडून करण्यात आली होती. मात्र बंडातात्या कराडकरांना अटक करण्यात आली. आजही अनेक वारकरी नेते आणि संत पोलिसांच्या पहाऱ्यात आहेत, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी संत जनाबाईंचा अभंग एक अभंग वाचून दाखवला.पुण्यवंत पाताळ लोकीं नेला । दरिद्री तो भाग्यवंत केला । चोरटयाचा बहुमान वाढविला । कीर्तिवानाचा अपमान केला

दरम्यान, प्रत्येक बाबतीत केंद्र सरकारकडे बोट दाखवण्यावरूनही देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील ठाकरे सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकार करणार, कर्जमाफी केंद्र सरकार देणार, चक्रीवादळग्रस्तांना मदत केंद्र सरकार देणार, पीक विमा केंद्र सरकार देणार, राज्याचं अर्थकारण केंद्र सरकार चालवणार, मराठा आरक्षण केंद्र सरकार देणार, ओबीसी आरक्षण केंद्र सरकार देणार, पदोन्नतीतील आरक्षण केंद्र सरकार देणार, मेट्रोचं काम थांबलं तर त्या केंद्र सरकार जबाबदार ठरवणार, रेमडेसिवीर केंद्र सरकार देणार, पीपीई किट केंद्र सरकार देणार, ऑक्सिजनचा  पुरवठा केंद्र सरकार करणार, लसीकरण केंद्र सरकार सुरू करणार, असं सगळं जरतसेच आता जर सगळं काम जर केंद्र सरकारने करायचं आणि यांनी इथे केवळ वसुल्या करायच्या का. या सरकारच्या प्रत्येक विभागातला वाझे जर समोर आणला तर या सरकारमध्ये काय चाललंय ते समजेल, असा इशाराही देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

केंद्र सरकारने करायचं, तर मग तुम्हाला सत्तेवर काय भजी-वडे तळायला बसवलंय का? अशा प्रकारचे राज्यकर्तेच पाहिले नाहीत, ज्यांना आत्मविश्वास नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेPoliticsराजकारण