शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

"वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला

By बाळकृष्ण परब | Updated: November 29, 2020 19:04 IST

Sanjay raut : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर भाजपाने हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप केला होता.

ठळक मुद्देमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये वेगवेगळी विचारसरणी असलेल्या ३३ पक्षांची आघाडी होती त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हतेकोरोना विषाणू, लॉकडाऊन, पूर आणि निसर्ग चक्रीवादळ अशी संकटे आले नसती तर राज्य सरकारने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला असता

मुंबई - युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेलं वाकयुद्ध आता दिवसागणित अधिकाधित तीव्र होत चाललं आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर भाजपाने हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप केला होता. भाजपाच्या या आरोपाला आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये वेगवेगळी विचारसरणी असलेल्या ३३ पक्षांची आघाडी होती, पण त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रूपात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कांग्रेस यांच्या आघाडीचा अस्वाभाविक आणि अनैतिक असा उल्लेख भाजपाने केला होता. त्यावर पलटवार करताना संजय राऊत म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये ३३ वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या पक्षांची आघाडी होती. मात्र त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हते.जर कोरोना विषाणू, लॉकडाऊन, पूर आणि निसर्ग चक्रीवादळ अशी संकटे आले नसती तर राज्य सरकारने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला असता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या छत्राखाली ३३ राजकीय पक्षांची आघाडी होती. आणि सर्वांची विचारसरणी वेगवेगळी होती. मात्र त्यावर कुणी प्रश्न उपस्थित केले नव्हते.दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली होती. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग, शेतकऱ्यांचे मुद्दे आणि विकास प्रकल्प अशा सर्व आघाड्यांवर सरकारला अपयश आले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPoliticsराजकारण