शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
3
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
4
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
5
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
6
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
7
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
8
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
9
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
10
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
11
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
12
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
13
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
14
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
15
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
16
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
18
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
19
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
20
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
Daily Top 2Weekly Top 5

"वाजपेयींच्या एनडीएमध्ये ३३ पक्ष होते पण त्याला कुणी अनैतिक नाही म्हटले’’ शिवसेनेचा भाजपाला टोला

By बाळकृष्ण परब | Updated: November 29, 2020 19:04 IST

Sanjay raut : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर भाजपाने हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप केला होता.

ठळक मुद्देमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये वेगवेगळी विचारसरणी असलेल्या ३३ पक्षांची आघाडी होती त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हतेकोरोना विषाणू, लॉकडाऊन, पूर आणि निसर्ग चक्रीवादळ अशी संकटे आले नसती तर राज्य सरकारने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला असता

मुंबई - युती तुटल्यापासून शिवसेना आणि भाजपामध्ये सुरू असलेलं वाकयुद्ध आता दिवसागणित अधिकाधित तीव्र होत चाललं आहे. शनिवारी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यावर भाजपाने हे सरकार अनैतिक असल्याचा आरोप केला होता. भाजपाच्या या आरोपाला आता शिवसेनेकडून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये वेगवेगळी विचारसरणी असलेल्या ३३ पक्षांची आघाडी होती, पण त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या रूपात सत्तेवर असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि कांग्रेस यांच्या आघाडीचा अस्वाभाविक आणि अनैतिक असा उल्लेख भाजपाने केला होता. त्यावर पलटवार करताना संजय राऊत म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएमध्ये ३३ वेगवेगळ्या विचारसरणी असलेल्या पक्षांची आघाडी होती. मात्र त्या आघाडीला कुणी अनैतिक म्हटले नव्हते.जर कोरोना विषाणू, लॉकडाऊन, पूर आणि निसर्ग चक्रीवादळ अशी संकटे आले नसती तर राज्य सरकारने महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलला असता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या छत्राखाली ३३ राजकीय पक्षांची आघाडी होती. आणि सर्वांची विचारसरणी वेगवेगळी होती. मात्र त्यावर कुणी प्रश्न उपस्थित केले नव्हते.दरम्यान, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारवर जोरदार टीका केली होती. हे सरकार सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग, शेतकऱ्यांचे मुद्दे आणि विकास प्रकल्प अशा सर्व आघाड्यांवर सरकारला अपयश आले आहे.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतShiv SenaशिवसेनाBJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीPoliticsराजकारण