शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Uttarakhand Politics: येत्या १५ दिवसांत भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील; माजी विधानसभा अध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 09:40 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे.

ठळक मुद्देपुष्कर सिंह धामी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले यशपाल आर्य यांचा अलीकडेच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जनतेच्या नाराजीमुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडणुकीत जिंकू की नाही या चिंतेत आहेत.राज्यातील जनतेला काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत. लोकं भाजपाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत - काँग्रेस

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील काही नेते स्वपक्षाला रामराम करुन दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत तर काहीजण पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. याच काळात जागेश्वरचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवाल यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे.

आमदार गोविंद सिंह कुंजवाल म्हणाले की, आगामी १५ दिवसांत भाजपाचे(BJP) ६ आमदार काँग्रेस(Congress) पक्षात प्रवेश करतील. संपूर्ण राज्यात काँग्रेसची लाट आहे. निवडणुकीनंतर काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करेल असा दावा त्यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातवरण ढवळून निघालं आहे. विद्यमान आमदार भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. परंतु गोविंद सिंह कुंजवाल यांनी कुठल्याही भाजपा आमदाराचं नाव उघड केले नाही.

राज्यातील जनतेला काँग्रेसकडून अपेक्षा

जागेश्वर आमदार कुंजवाल यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. डबल इंजिनचं सरकार असूनही राज्याचा विकास झाला नाही. आजही राज्यातील जनतेला मुलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. जी विकास कामं काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झाली तीदेखील पुढे घेऊन जाता आलं नाही. राज्यातील जनतेला काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत. लोकं भाजपाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. बेरोजगारी आणि महागाई यामुळे जनता त्रस्त असून पुढील निवडणुकीत भाजपाला चांगलाच धडा मिळेल. कोरोना काळात गरीब एकवेळच्या अन्नासाठी व्याकुळ होते. जनतेच्या नाराजीमुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडणुकीत जिंकू की नाही या चिंतेत आहेत. त्यामुळेच भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.  

अलीकडेच यशपाल आर्य यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला

पुष्कर सिंह धामी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले यशपाल आर्य(Yashpal Arya) यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राज्यात काही महिन्यांवर निवडणुका आल्या असताना यशपाल आर्य यांनी भाजपाला धक्का दिला. यशपाल आर्य यांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या एका कॅबिनेट पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपा सरकारवर नियुक्तीचं संकट आहे. त्यामुळे भाजपामध्ये आणखी काही आमदार नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस