शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
2
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
3
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
4
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
5
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
6
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
7
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
8
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
9
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
10
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
11
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
12
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
13
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
14
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
15
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
16
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
17
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
18
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

Uttarakhand Politics: येत्या १५ दिवसांत भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करतील; माजी विधानसभा अध्यक्षांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2021 09:40 IST

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे.

ठळक मुद्देपुष्कर सिंह धामी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले यशपाल आर्य यांचा अलीकडेच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश जनतेच्या नाराजीमुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडणुकीत जिंकू की नाही या चिंतेत आहेत.राज्यातील जनतेला काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत. लोकं भाजपाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत - काँग्रेस

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतर करणाऱ्या नेत्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील काही नेते स्वपक्षाला रामराम करुन दुसऱ्या पक्षात प्रवेश करत आहेत तर काहीजण पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. याच काळात जागेश्वरचे आमदार आणि माजी विधानसभा अध्यक्ष गोविंद सिंह कुंजवाल यांनी केलेल्या दाव्यानंतर भाजपाच्या गोटात खळबळ माजली आहे.

आमदार गोविंद सिंह कुंजवाल म्हणाले की, आगामी १५ दिवसांत भाजपाचे(BJP) ६ आमदार काँग्रेस(Congress) पक्षात प्रवेश करतील. संपूर्ण राज्यात काँग्रेसची लाट आहे. निवडणुकीनंतर काँग्रेस बहुमताने सरकार स्थापन करेल असा दावा त्यांनी केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातवरण ढवळून निघालं आहे. विद्यमान आमदार भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. परंतु गोविंद सिंह कुंजवाल यांनी कुठल्याही भाजपा आमदाराचं नाव उघड केले नाही.

राज्यातील जनतेला काँग्रेसकडून अपेक्षा

जागेश्वर आमदार कुंजवाल यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. डबल इंजिनचं सरकार असूनही राज्याचा विकास झाला नाही. आजही राज्यातील जनतेला मुलभूत सुविधांपासून वंचित राहावं लागत आहे. जी विकास कामं काँग्रेस सरकारच्या कार्यकाळात झाली तीदेखील पुढे घेऊन जाता आलं नाही. राज्यातील जनतेला काँग्रेसकडून खूप अपेक्षा आहेत. लोकं भाजपाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहेत. बेरोजगारी आणि महागाई यामुळे जनता त्रस्त असून पुढील निवडणुकीत भाजपाला चांगलाच धडा मिळेल. कोरोना काळात गरीब एकवेळच्या अन्नासाठी व्याकुळ होते. जनतेच्या नाराजीमुळे सत्ताधारी पक्षाचे आमदार निवडणुकीत जिंकू की नाही या चिंतेत आहेत. त्यामुळेच भाजपाचे ६ आमदार काँग्रेसमध्ये लवकरच प्रवेश करतील असा दावा केला जात आहे.  

अलीकडेच यशपाल आर्य यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला

पुष्कर सिंह धामी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री राहिलेले यशपाल आर्य(Yashpal Arya) यांनी अलीकडेच काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. राज्यात काही महिन्यांवर निवडणुका आल्या असताना यशपाल आर्य यांनी भाजपाला धक्का दिला. यशपाल आर्य यांच्या जाण्यानं रिक्त झालेल्या एका कॅबिनेट पदासाठी अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे भाजपा सरकारवर नियुक्तीचं संकट आहे. त्यामुळे भाजपामध्ये आणखी काही आमदार नाराज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेस