शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

पालघरच्या प्रश्नांकडे माझे दुर्लक्ष झाले, उद्धव ठाकरे यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 04:41 IST

पालघर जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याची प्रांजळ कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे झालेल्या जाहीर सभेत दिली

पालघर : पालघर जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याची प्रांजळ कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे झालेल्या जाहीर सभेत दिली. वसईतील गुंडगिरी, २९ गावे वगळणे, वाढवण बंदर आदी जुन्या मुद्द्यांना आपल्या भाषणातून हात घालणाºया ठाकरे यांनी जिल्ह्याला भेडसावणाºया प्रश्नांबाबत बोलायचे टाळले.

पालघर येथील दांडेकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयी संकल्प रॅली, प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पालघरच्या शनिवारच्या ३८ अंश सेल्सिअस तापमानाच्या रखरखत्या उन्हात हजारो कार्यकर्ते तासभर बसून असल्याचे पाहून ही सभा जिद्दीने, विचाराने पेटलेली असल्याचा उल्लेख त्यांनी या वेळी केला. हा भाग मला आता नवीन नसून येथील आदिवासी पाडे व शहरी भागात मी पोटनिवडणुकीच्या वेळीही प्रचार केला होता, असे त्यांनी सांगितले. बविआ हा पक्ष नसून एक कंपनी आहे, असा उल्लेख करीत मतदारसंघातील त्यांची गुंडगिरी मोडीत काढणार, अशी टीका त्यांनी हितेंद्र ठाकूर यांचा नामोल्लेख टाळत केली.

निसर्ग संपन्न वसईच्या जमिनी हडपण्याचा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा डाव असून हितेंद्र ठाकूर म्हणजे वसईला लागलेली कीड असल्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला. तसेच आमचा बालेकिल्ला असलेल्या तीनही विधानसभेतील युतीच्या कार्यकर्त्यांनी ही कीड वाढू दिली नसल्याबद्दल अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांच्या पक्षाला उखडून टाकण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

वाघोली (वसई) मधील ग्रामस्थांनी मारहाण करीत गुंडगिरी मोडून काढल्याचा २००९ सालच्या प्रकरणाचा उल्लेख करीत तुमच्या पाठीमागे मी व मुख्यमंत्री असतील, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. वसई तालुक्यातील २९ गावे महानगरपालिकेतून वगळण्याबाबत दिलेला शब्द मागे घेणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी गुंडगिरीविरोधात उभारलेल्या लढ्याचे त्यांनी कौतुक केले.

येथील गुंडगिरी मोडून काढायला मी व माझे शिवसैनिक पुरेसे असल्याचे सांगून मुंबई, ठाणे पालिकेचा कारभार व वसई-विरारचा कारभार बघा, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी सांगितले. तर खासदार गावितांनी उन्हात बसलेल्या कार्यकर्त्यांचे ‘सच्चे, निष्ठावान’ म्हणून कौतुक केले. विरोधक चुकीच्या अफवा पसरवत असून हे कट्टर कार्यकर्ते त्याला भुलणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार मनीषा चौधरी यांनी विरोधकांच्या संपर्कातील युतीच्या काही लोकांची पूर्ण खबर माझ्यासह मुख्यमंत्र्यांकडे असल्याचा गौप्यस्फोट केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalgharपालघरpalghar-pcपालघरUddhav Thackerayउद्धव ठाकरे