शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

पालघरच्या प्रश्नांकडे माझे दुर्लक्ष झाले, उद्धव ठाकरे यांची कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2019 04:41 IST

पालघर जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याची प्रांजळ कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे झालेल्या जाहीर सभेत दिली

पालघर : पालघर जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाल्याची प्रांजळ कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे झालेल्या जाहीर सभेत दिली. वसईतील गुंडगिरी, २९ गावे वगळणे, वाढवण बंदर आदी जुन्या मुद्द्यांना आपल्या भाषणातून हात घालणाºया ठाकरे यांनी जिल्ह्याला भेडसावणाºया प्रश्नांबाबत बोलायचे टाळले.

पालघर येथील दांडेकर मैदानात आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना महायुतीचे उमेदवार राजेंद्र गावित यांच्या विजयी संकल्प रॅली, प्रचार सभेत उद्धव ठाकरे बोलत होते. पालघरच्या शनिवारच्या ३८ अंश सेल्सिअस तापमानाच्या रखरखत्या उन्हात हजारो कार्यकर्ते तासभर बसून असल्याचे पाहून ही सभा जिद्दीने, विचाराने पेटलेली असल्याचा उल्लेख त्यांनी या वेळी केला. हा भाग मला आता नवीन नसून येथील आदिवासी पाडे व शहरी भागात मी पोटनिवडणुकीच्या वेळीही प्रचार केला होता, असे त्यांनी सांगितले. बविआ हा पक्ष नसून एक कंपनी आहे, असा उल्लेख करीत मतदारसंघातील त्यांची गुंडगिरी मोडीत काढणार, अशी टीका त्यांनी हितेंद्र ठाकूर यांचा नामोल्लेख टाळत केली.

निसर्ग संपन्न वसईच्या जमिनी हडपण्याचा आमदार हितेंद्र ठाकूर यांचा डाव असून हितेंद्र ठाकूर म्हणजे वसईला लागलेली कीड असल्याचा उल्लेख ठाकरे यांनी केला. तसेच आमचा बालेकिल्ला असलेल्या तीनही विधानसभेतील युतीच्या कार्यकर्त्यांनी ही कीड वाढू दिली नसल्याबद्दल अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही त्यांच्या पक्षाला उखडून टाकण्याचे आवाहन ठाकरे यांनी केले.

वाघोली (वसई) मधील ग्रामस्थांनी मारहाण करीत गुंडगिरी मोडून काढल्याचा २००९ सालच्या प्रकरणाचा उल्लेख करीत तुमच्या पाठीमागे मी व मुख्यमंत्री असतील, असा विश्वास त्यांनी ग्रामस्थांना दिला. वसई तालुक्यातील २९ गावे महानगरपालिकेतून वगळण्याबाबत दिलेला शब्द मागे घेणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत श्रमजीवीचे संस्थापक विवेक पंडित यांनी गुंडगिरीविरोधात उभारलेल्या लढ्याचे त्यांनी कौतुक केले.

येथील गुंडगिरी मोडून काढायला मी व माझे शिवसैनिक पुरेसे असल्याचे सांगून मुंबई, ठाणे पालिकेचा कारभार व वसई-विरारचा कारभार बघा, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या वेळी सांगितले. तर खासदार गावितांनी उन्हात बसलेल्या कार्यकर्त्यांचे ‘सच्चे, निष्ठावान’ म्हणून कौतुक केले. विरोधक चुकीच्या अफवा पसरवत असून हे कट्टर कार्यकर्ते त्याला भुलणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार मनीषा चौधरी यांनी विरोधकांच्या संपर्कातील युतीच्या काही लोकांची पूर्ण खबर माझ्यासह मुख्यमंत्र्यांकडे असल्याचा गौप्यस्फोट केला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalgharपालघरpalghar-pcपालघरUddhav Thackerayउद्धव ठाकरे