शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

‘वाचन प्रेरणा दिना’पासून सर्वत्र ग्रंथालये होणार सुरू; राज ठाकरेंच्या हस्तक्षेपानंतर प्रश्न निकाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2020 06:57 IST

वाचनप्रेमींकरिता सरकार साधणार मुहूर्त । आदेशाची प्रतीक्षा, गुरुवारपासून वाचनाची भूक भागणार

कुलदीप घायवटकल्याण : भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा १५ आॅक्टोबर हा जयंती दिन वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जात असून याच दिवसापासून पुन्हा ग्रंथालये सुरू होतील. ग्रंथावरील धूळ झटकून पुन्हा वाचनप्रेमी आपापल्या आवडत्या लेखकांच्या पुस्तकांच्या ओढीने ग्रंथालयांकडे वळतील, अशी दाट शक्यता आहे. कोरोनामुळे दीर्घकाळ बंद असलेली ग्रंथालये खुली करण्यास अखेर मुहूर्त सापडला आहे.

उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत हे सध्या आजारी असल्याने वाचनालये सुरू करण्याच्या आदेशाला अंतिम स्वरूप देण्याची औपचारिकता बाकी आहे. गुरुवारपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करून वाचन प्रेरणा दिनापासून वाचनालये सुरू करावी, अशी वाचनालयांची आग्रही मागणी आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यास वाचनालयांचे प्रतिनिधी गेले असता ठाकरे यांनी थेट सामंत यांना फोन लावला. त्यावेळी सामंत यांनीच तसे संकेत दिल्याचे समजते. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर मराठी भाषा विकास विभागाकडे असलेली ग्रंथालये उच्च शिक्षण विभागाकडे हस्तांतरित केली. कोरोनामुळे महाविद्यालये बंद असल्याने महाविद्यालयांतील ग्रंथालयेही बंद आहेत. कॉलेजमधील ग्रंथालयांबरोबरच सर्व ग्रंथालये बंद राहिली. वाचनालयेही सर्व नियम पाळून सुरू करावीत. वाचन संस्कृती टिकवण्यासाठी व आर्थिक गर्तेतून वाचनालयांना बाहेर काढण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलावे, अशी साद वाचनप्रेमींनी घातली आहे.सहा महिन्यांपासून वाचक आणि वाचनालये यांचा संबंध तुटला आहे. मार्चमध्ये नेलेली पुस्तके अजून परत मिळालेली नाहीत. अशी दोन ते अडीच हजार पुस्तके वाचकांकडे आहेत. शुल्कही थांबले आहे. पुस्तकांना सॅनिटाइझ करणे, वाळवीप्रतिबंधक उपाय करणे, वाचनालयांत काम करणाऱ्यांचा पगार देणे, अशा अनेक खर्चांमुळे वाचनालये आर्थिककोंडीत सापडली आहेत.- स्वाती गोडांबे, लिपिक, सार्वजनिक वाचनालय, कल्याणराज्यातील ग्रंथालये सुरू करण्यात यावीत, यासाठी ग्रंथालयांचे विश्वस्त आणि संचालक मंडळाने अलीकडेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. पुस्तके ही सकारात्मक ऊर्जा आणि वैचारिक आनंद देतात. कोरोनाच्या नैराश्यपूर्ण वातावरणात याची आवश्यकता आहे. सरकारने लवकरात लवकर वाचनालये सुरू केली पाहिजेत. त्यामुळे यावर अवलंबून असलेले अर्थचक्र गतिमान होईल. - भिकू बारस्कर, सरचिटणीस, सार्वजनिक वाचनालय, कल्याणलॉकडाऊनमुळे सहा महिने एकही नवीन पुस्तक वाचायला मिळाले नाही. लॉकडाऊनआधी एका महिन्यात पाच ते सहा पुस्तके वाचत होतो. वाचनालये बंद असल्याने खूप गैरसोय होत आहे. - विनायक घाटे, वाचक, कल्याणएकदिवसीय जनता कर्फ्यू लागल्यानंतर वाचकांना अधिक पुस्तके देण्यास सुरु वात केली. इतरवेळी वाचकांना घरी घेऊन जाण्यासाठी दोन पुस्तके दिली जात होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये एकाच वेळी सहा पुस्तके देण्यात आली. साधारण एक हजार ५०० वाचकांना लॉकडाऊन काळात सहा पुस्तके दिली आहेत. - पुंडलिक पै, वाचनालयाचे संचालकटीव्हीवरील त्याचत्याच बातम्या, सोशल मीडियाचा कंटाळा आला आहे. सहा महिन्यांत घरातील सर्व पुस्तके पुन्हा वाचली. आॅनलाइन वाचन गैरसोयीचे वाटते. सर्व खबरदारी घेऊन सरकारने वाचनालये सुरू करावीत. - सतीश घरत, वाचनप्रेमी, कल्याण

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसे