शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

"मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही"; भाजप नेत्याचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 11:52 IST

"राज्याच्या तिजोरीतील खडखडाट हा फक्त जनतेसाठी असून मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही"

राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील एक निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. राज्याच्या तिजोरीतील खडखडाट हा फक्त जनतेसाठी असून मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

"जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा..."

मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चांवर निर्बंध आणले होते. फडणवीसांच्या या निर्णयाला स्थगिती ठाकरे सरकारने दिल्याचं वृत्त अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमधून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. "मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेले निर्बंध मुख्यमंत्री ठाकरे यांनी रद्द केले. थोडक्यात, तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी आहे. मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही", असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे. 

शरजील हा ठाकरे सरकारचा जावई आहे का?- भातखळकरपुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेल्या विधानानेही राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. हिंदू समाज सडलेला असल्याच्या शरजीलच्या विधानावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. शरजीलविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना काल आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर आज उस्मानी विरोधात एफआयआर दाखल करुन घेण्यात आली आहे. सरकारच्या या भूमिकेवरुनही भातखळकर यांनी निशाणा साधला. "शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?", असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. 

भाजपच्या आंदोलनानंतर एफआयआर दाखल करण्यात आल्याचंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. "एफआयर दाखल झाला असला तरी त्याला अटक अद्याप झालेली नाही. या जिहादी भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? मुळात भामट्यांची गर्दी असलेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेला परवानगी का दिली?", असे सवाल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना