शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

"मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही"; भाजप नेत्याचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 11:52 IST

"राज्याच्या तिजोरीतील खडखडाट हा फक्त जनतेसाठी असून मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही"

राज्य सरकारने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील एक निर्णय रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. राज्याच्या तिजोरीतील खडखडाट हा फक्त जनतेसाठी असून मंत्र्यांच्या अय्याशीसाठी ठाकरे सरकारकडे पैशाची कमी नाही, अशी घणाघाती टीका भातखळकर यांनी केली आहे.

"जनमताचा नाही ठिकाणा अन् मला मुख्यमंत्री म्हणा..."

मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परदेश दौऱ्यांवर होणाऱ्या खर्चांवर निर्बंध आणले होते. फडणवीसांच्या या निर्णयाला स्थगिती ठाकरे सरकारने दिल्याचं वृत्त अतुल भातखळकर यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमधून राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. "मंत्र्यांच्या विदेशवारीमुळे होणारी पैशाची उधळपट्टी रोखण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात आणलेले निर्बंध मुख्यमंत्री ठाकरे यांनी रद्द केले. थोडक्यात, तिजोरीला खडखडाट फक्त जनतेसाठी आहे. मंत्र्यांच्या अय्याशीसाठी पैशाची कमी नाही", असं ट्विट भातखळकर यांनी केलं आहे. 

शरजील हा ठाकरे सरकारचा जावई आहे का?- भातखळकरपुण्यातील एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेल्या विधानानेही राज्याचं राजकारण चांगलंच तापलेलं पाहायला मिळत आहे. हिंदू समाज सडलेला असल्याच्या शरजीलच्या विधानावरुन भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. शरजीलविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना काल आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर आज उस्मानी विरोधात एफआयआर दाखल करुन घेण्यात आली आहे. सरकारच्या या भूमिकेवरुनही भातखळकर यांनी निशाणा साधला. "शरजील उस्मानी ठाकरे सरकारचा जावई आहे का?", असा सवाल भातखळकर यांनी उपस्थित केला आहे. 

भाजपच्या आंदोलनानंतर एफआयआर दाखल करण्यात आल्याचंही भातखळकर यांनी म्हटलं आहे. "एफआयर दाखल झाला असला तरी त्याला अटक अद्याप झालेली नाही. या जिहादी भामट्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल का केला नाही? मुळात भामट्यांची गर्दी असलेल्या चिथावणीखोर एल्गार परिषदेला परवानगी का दिली?", असे सवाल भातखळकर यांनी उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv Senaशिवसेना