शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
6
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
7
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
8
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
9
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
10
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
11
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
12
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
13
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
14
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
15
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
16
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
17
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
18
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
19
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
20
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार

"सोनियाजी मला फोन करुन विचारतात की..."; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला

By मोरेश्वर येरम | Updated: December 3, 2020 19:27 IST

तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

ठळक मुद्दे'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' पुस्तिकेचं प्रकाशनमहाविकास आघाडीच्या वर्षभराच्या कामगिची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशमहाविकास आघाडी सरकार एकदम भक्कम असल्याचा ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' या पुस्तिकेचा प्रकाशन कार्यक्रम झाला. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा या पुस्तिकेतून मांडण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलत असताना सरकारमधील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

"राज्याचं तीन पक्षांचं सरकार तग धरेल का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पण या तीन पक्षाच्या सरकारला शरद पवारांसारखं अनुभवी मार्गदर्शन लाभलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी देखील फोनवरुन काम कसं चाललंय याची विचारपूस करत असतात. आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना? असंही त्या विचारात", उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी,"मी सोनियाजींकडे तुमची बाजू लावून धरतो. तिथं मी मागे हटत नाही", असं म्हणून राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कामाचं सोनिया गांधी यांच्याकडे कौतुक करत असल्याचं सांगितलं.

राज्य सरकारच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

मी अनुभवी नसलो तरी अनुभवी टीमची साथ"राज्य चालवण्याचा अनुभव माझ्याकडे नाही अशी टीका केली जात होती. पण अनुभवी सहकाऱ्यांची टीमसोबत असल्याने मला कसलीच चिंत वाटली नाही. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत असं वारंवार विरोधक बोलतात. त्यांना सांगायला हवं की माझ्या सहकाऱ्यांची टीम घरीघरी जाऊन काम करतेय त्यामुळे मला बाहेर पडावं लागत नाही. इतकं भक्कमपणे हे सरकार उभं आहे.", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

जनतेच्या विश्वासाच्या चौथ्या चाकाची सरकारला जोड"जनतेच्या विश्वासाने हे सरकार चाललं आहे. जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. तीन चाकी सरकार म्हणून या सरकारची हेटाळणी केली जाते. पण या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे", असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र