शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

"सोनियाजी मला फोन करुन विचारतात की..."; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला

By मोरेश्वर येरम | Updated: December 3, 2020 19:27 IST

तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

ठळक मुद्दे'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' पुस्तिकेचं प्रकाशनमहाविकास आघाडीच्या वर्षभराच्या कामगिची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशमहाविकास आघाडी सरकार एकदम भक्कम असल्याचा ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' या पुस्तिकेचा प्रकाशन कार्यक्रम झाला. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा या पुस्तिकेतून मांडण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलत असताना सरकारमधील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

"राज्याचं तीन पक्षांचं सरकार तग धरेल का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पण या तीन पक्षाच्या सरकारला शरद पवारांसारखं अनुभवी मार्गदर्शन लाभलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी देखील फोनवरुन काम कसं चाललंय याची विचारपूस करत असतात. आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना? असंही त्या विचारात", उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी,"मी सोनियाजींकडे तुमची बाजू लावून धरतो. तिथं मी मागे हटत नाही", असं म्हणून राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कामाचं सोनिया गांधी यांच्याकडे कौतुक करत असल्याचं सांगितलं.

राज्य सरकारच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

मी अनुभवी नसलो तरी अनुभवी टीमची साथ"राज्य चालवण्याचा अनुभव माझ्याकडे नाही अशी टीका केली जात होती. पण अनुभवी सहकाऱ्यांची टीमसोबत असल्याने मला कसलीच चिंत वाटली नाही. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत असं वारंवार विरोधक बोलतात. त्यांना सांगायला हवं की माझ्या सहकाऱ्यांची टीम घरीघरी जाऊन काम करतेय त्यामुळे मला बाहेर पडावं लागत नाही. इतकं भक्कमपणे हे सरकार उभं आहे.", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

जनतेच्या विश्वासाच्या चौथ्या चाकाची सरकारला जोड"जनतेच्या विश्वासाने हे सरकार चाललं आहे. जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. तीन चाकी सरकार म्हणून या सरकारची हेटाळणी केली जाते. पण या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे", असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र