शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

"सोनियाजी मला फोन करुन विचारतात की..."; उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यावर एकच हशा पिकला

By मोरेश्वर येरम | Updated: December 3, 2020 19:27 IST

तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

ठळक मुद्दे'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' पुस्तिकेचं प्रकाशनमहाविकास आघाडीच्या वर्षभराच्या कामगिची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशमहाविकास आघाडी सरकार एकदम भक्कम असल्याचा ठाकरेंचा पुनरुच्चार

मुंबईमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज 'महाराष्ट्र थांबला नाही, महाराष्ट्र थांबणार नाही' या पुस्तिकेचा प्रकाशन कार्यक्रम झाला. महाविकास आघाडी सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या कामाचा लेखाजोखा या पुस्तिकेतून मांडण्यात आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी या कार्यक्रमात बोलत असताना सरकारमधील सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि तीन पक्षाचं सरकार कसं जोमाने काम करतंय हे सांगितलं. हे सांगत असताना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींसोबत फोनवरुन होत असलेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आणि उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

"राज्याचं तीन पक्षांचं सरकार तग धरेल का? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. पण या तीन पक्षाच्या सरकारला शरद पवारांसारखं अनुभवी मार्गदर्शन लाभलं आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी देखील फोनवरुन काम कसं चाललंय याची विचारपूस करत असतात. आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना? असंही त्या विचारात", उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आणि उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यानंतर लगेचच उद्धव ठाकरेंनी,"मी सोनियाजींकडे तुमची बाजू लावून धरतो. तिथं मी मागे हटत नाही", असं म्हणून राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या कामाचं सोनिया गांधी यांच्याकडे कौतुक करत असल्याचं सांगितलं.

राज्य सरकारच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती. 

मी अनुभवी नसलो तरी अनुभवी टीमची साथ"राज्य चालवण्याचा अनुभव माझ्याकडे नाही अशी टीका केली जात होती. पण अनुभवी सहकाऱ्यांची टीमसोबत असल्याने मला कसलीच चिंत वाटली नाही. मुख्यमंत्री घरातून बाहेर पडत नाहीत असं वारंवार विरोधक बोलतात. त्यांना सांगायला हवं की माझ्या सहकाऱ्यांची टीम घरीघरी जाऊन काम करतेय त्यामुळे मला बाहेर पडावं लागत नाही. इतकं भक्कमपणे हे सरकार उभं आहे.", असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

जनतेच्या विश्वासाच्या चौथ्या चाकाची सरकारला जोड"जनतेच्या विश्वासाने हे सरकार चाललं आहे. जनतेचे आशीर्वाद आमच्या सोबत आहेत. तीन चाकी सरकार म्हणून या सरकारची हेटाळणी केली जाते. पण या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे", असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSonia Gandhiसोनिया गांधीcongressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र