शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
3
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
4
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
5
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
6
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
7
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
8
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
9
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
10
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
11
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
12
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
13
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
14
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
15
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
16
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
17
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
18
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
19
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
20
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांना थंड जेवण दिल्यानं अधिकाऱ्याचं निलंबन; प्रोटोकॉल मोडल्यानं जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

By प्रविण मरगळे | Updated: September 26, 2020 13:33 IST

इंदूरच्या विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ५० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी पोहचले होते.

ठळक मुद्देमुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान २३ सप्टेंबर रोजी इंदूर येथे आले होते.बुरहानपूरचा दौऱ्यावरुन इंदूर येथे पोहचण्यास मुख्यमंत्र्यांना झाला २ तास उशीर जेवण पॅक करुन देण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या सूचना

इंदूर - जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न निरीक्षक मनीष स्वामी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या इंदूर दौर्‍यावेळी मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलचे पालन करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. मात्र मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर ही कारवाई मागे घेण्यात आली.

खरं तर मुख्यमंत्री दौर्‍यावर येतात तेव्हा त्यांच्या कर्मचार्‍यांसह बर्‍याच जणांच्या जेवणाची व्यवस्था प्रोटोकॉल अंतर्गत केली जाते. यात बुधवारी हलगर्जीपणा झाला. एकीकडे जेवण देण्यास विलंब झाला आणि जेव्हा ते आले तेव्हा त्याची गुणवत्ता खराब होती. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली आहे, जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रोटोकॉल अंतर्गत मुख्यमंत्र्यांसाठी चांगल्या दर्जाचं जेवण असायला हवं होतं. अन्न पॅकींग करताना संपूर्ण प्रोटोकॉलचे पालन केले गेले नाही.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान २३ सप्टेंबर रोजी इंदूर येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या जेवणाची गुणवत्ता चांगली नसल्यानं एका अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे निरीक्षक मनीष स्वामी यांना निलंबित करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या प्रोटोकॉलमध्ये दुर्लक्ष झाल्यामुळे जिल्हाधिकारी मनीष सिंह यांनी ही कारवाई केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई मागे घेत पुन्हा मनीष स्वामी यांच्याकडे कार्यभार सोपवला.

इंदूरच्या विधानसभा मतदारसंघात मुख्यमंत्री ५० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजन करण्यासाठी पोहचले होते. त्याआधी ते बुरहानपूर जिल्ह्यातील नेपानगर विधानसभा मतदारसंघाच्या दौर्‍यावर होते. यामुळे मुख्यमंत्र्यांना इंदूर येथे पोहचण्यास दोन तास उशीर झाला. ते संध्याकाळी ६.१५ वाजता पोहोचणार होते परंतु त्यांना येण्यास रात्रीचे ८.१५ वाजले. रात्र आणि खराब हवामानामुळे त्यांनी हेलिकॉप्टरऐवजी गाडीने भोपाळला जाण्याचा निर्णय घेतला. एकामागोमाग एक कार्यक्रम सुरु असल्याने मुख्यमंत्र्यांना जेवणही करण्यास वेळ मिळाला नाही. म्हणून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जेवण पॅक करुन ते गाडीत ठेवण्याच्या सूचना दिल्या.

याबाबत खुलासा देताना अन्न निरीक्षक मनीष स्वामी म्हणाले की, जिल्हाधिकारी मनीष सिंह यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्र्यांच्या पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार सायंकाळी ६ वाजता जेवण तयार करण्यात आले. परंतु मुख्यमंत्र्यांना दोन तास उशीर झाला आणि रात्री ९ वाजता ते इंदूरहून रवाना झाले. मी दुसऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था केली पण ते  रस्त्याने भोपाळच्या मार्गे गेले. मी जेवण व्यवस्थित पॅक केले होते, फक्त भाकरी थंड होती, बाकीचे अन्न गरम होते. मुख्यमंत्र्यांच्या गाडीत एसी सुरु होता. तसे रात्रीच्या वेळी वातावरण थंड असल्याने भाकरी थंड झाली. यानंतर, मला वरिष्ठ अधिकाऱ्यांचा फोन आला. आणि २४ सप्टेंबर रोजी व्हॉट्सअॅपवर निलंबनाचा आदेश आल्याचं त्यांनी सांगितले.

मात्र या प्रकरणावरुन आता राजकारण सुरु झाले आहे. माजी मंत्री जीतू पटवारी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह यांची खिल्ली उडविली, ते म्हणाले की, तुम्ही स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवता, तुमच्या राजवटीत बरेच लोक उपाशी झोपतात. त्यात थंड जेवण दिलं म्हणून तुम्ही एका अधिकाऱ्याला निलंबित केले, तुमची लाज वाटतेय अशा शब्दात  त्यांनी शिवराजसिंह चौहान यांच्यावर टीका केली आहे.

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशshivraj singh chauhanशिवराज सिंह चौहान