शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

सुशीलकुमार शिंदे यांचे काँग्रेसमधील सद्यस्थितीबाबत धक्कादायक विधान, म्हणाले, काँग्रेसमध्ये आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 16:30 IST

Sushilkumar Shinde: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबाबत मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसमधील चर्चा आणि संवादाची परंपरा आता संपुष्टात आली आहेपक्षाला याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे एकवेळ होती जेव्हा पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. मात्र आता माझ्या शब्दाला किंमत आहे की नाही हे मला माहिती नाही

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत कुरमुरी वाढत आहेत. अनेक ज्येष्ठ नेते पक्षाची सद्यस्थिती आणि पक्ष नेतृत्वाबाबत उघडपणे आपले मत मांडत आहेत. आता या नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची भर पडली आहे. सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबाबत मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे. काँग्रेसमध्ये आता संवाद आणि चर्चेची परंपरा संपुष्टात आली आहे. पक्ष चुकीच्या धोरणांवरून वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पक्षाला योग्य वाटेवर आणण्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे. (Sushilkumar Shinde's shocking statement about the current situation in the Congress)

पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सुशील कुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेसमधील चर्चा आणि संवादाची परंपरा आता संपुष्टात आली आहे. मला याचे खूप दु:ख वाटते. पक्षाला याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमची धोरणे चुकीची असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी अशा सत्रांची गरज आहे. एकवेळ होती जेव्हा पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. मात्र आता माझ्या शब्दाला किंमत आहे की नाही हे मला माहिती नाही, अशी खंतही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

गतवर्षी पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षामध्ये मोठे फेरबदल करण्याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या गटाला जी-२३ असे नाव देण्यात आले होते. या गटामध्ये कपिल सिब्बल, शशी थरूर, गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या समावेश होता. पक्षाने आतापर्यंत या नेत्यांची नाराजी दूर केलेली नाही.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर सुशील कुमार शिंदे यांनी काही सांगितले असेल तर पक्षाने या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. कारण ते काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिलेले आहे.

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे आणि सत्ताधारी आघाडीला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या हालचाली करत असल्याच्या अफवाही राजकीय वर्तुळात पसरल्या आहेत.   

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण