शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

सुशीलकुमार शिंदे यांचे काँग्रेसमधील सद्यस्थितीबाबत धक्कादायक विधान, म्हणाले, काँग्रेसमध्ये आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 16:30 IST

Sushilkumar Shinde: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबाबत मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे.

ठळक मुद्देकाँग्रेसमधील चर्चा आणि संवादाची परंपरा आता संपुष्टात आली आहेपक्षाला याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे एकवेळ होती जेव्हा पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. मात्र आता माझ्या शब्दाला किंमत आहे की नाही हे मला माहिती नाही

नवी दिल्ली - गेल्या काही काळापासून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात अंतर्गत कुरमुरी वाढत आहेत. अनेक ज्येष्ठ नेते पक्षाची सद्यस्थिती आणि पक्ष नेतृत्वाबाबत उघडपणे आपले मत मांडत आहेत. आता या नेत्यांमध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या नावाची भर पडली आहे. सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी पक्षाच्या सद्यस्थितीबाबत मोठे आणि धक्कादायक विधान केले आहे. काँग्रेसमध्ये आता संवाद आणि चर्चेची परंपरा संपुष्टात आली आहे. पक्ष चुकीच्या धोरणांवरून वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत पक्षाला योग्य वाटेवर आणण्यासाठी आत्मचिंतनाची गरज आहे. (Sushilkumar Shinde's shocking statement about the current situation in the Congress)

पुण्यामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये सुशील कुमार शिंदे म्हणाले की, काँग्रेसमधील चर्चा आणि संवादाची परंपरा आता संपुष्टात आली आहे. मला याचे खूप दु:ख वाटते. पक्षाला याबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आमची धोरणे चुकीची असू शकतात. अशा परिस्थितीत त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी अशा सत्रांची गरज आहे. एकवेळ होती जेव्हा पक्षात माझ्या शब्दाला किंमत होती. मात्र आता माझ्या शब्दाला किंमत आहे की नाही हे मला माहिती नाही, अशी खंतही सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केली.

गतवर्षी पक्षातील २३ वरिष्ठ नेत्यांनी पक्षामध्ये मोठे फेरबदल करण्याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहिले होते. या गटाला जी-२३ असे नाव देण्यात आले होते. या गटामध्ये कपिल सिब्बल, शशी थरूर, गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांच्या समावेश होता. पक्षाने आतापर्यंत या नेत्यांची नाराजी दूर केलेली नाही.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या विधानावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर सुशील कुमार शिंदे यांनी काही सांगितले असेल तर पक्षाने या मुद्द्यावर चर्चा केली पाहिजे. कारण ते काँग्रेसच्या सर्वात ज्येष्ठ नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी पक्षासाठी मोठे योगदान दिलेले आहे.

दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे स्थिर आहे आणि सत्ताधारी आघाडीला कुठल्याही प्रकारचा धोका नसल्याचे सांगितले. दरम्यान, शिवसेना आणि भाजपा पुन्हा एकदा एकत्र येण्याच्या हालचाली करत असल्याच्या अफवाही राजकीय वर्तुळात पसरल्या आहेत.   

टॅग्स :Sushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेcongressकाँग्रेसPoliticsराजकारण