शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

सोनिया गांधी की राहुल गांधी?; काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून राज्यातील नेत्यांमध्ये मतभिन्नता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 23:39 IST

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांना साकडे घातले आहे. तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोनिया गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असे म्हटले आहे.

मुंबई : काँग्रेस पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व मिळावे, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पाठविलेल्या पत्राने पक्षात खळबळ उडाली आहे. शिवाय, पक्षाचे नेतृत्व कोणी करावे यावरूनही राज्यातील नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे दिसून आले.

प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पक्षाध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांना साकडे घातले आहे. तर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी सोनिया गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, असे म्हटले आहे. दरम्यान संबंधित पत्र म्हणजे राहुल गांधी यांच्याविरोधातील राजकीय षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी केला आहे.

आतापर्यंत बंद खोलीत जी षडयंत्रे रचली जात होती ती या पत्राच्यारुपाने समोर आली आहेत. या षडयंत्राला एकच उत्तर आहे, ते म्हणजे राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पद स्वीकारणार नसल्याचा आपला हट्ट सोडून द्यावा. त्यांनी पक्षाचे नेतृत्व हाती घ्यावे आणिराज्याराज्यात पक्षाची होणारी पडझड थांबवावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यकारिणीने राजीनामा द्यावासोनिया गांधी यांनी राजीनामा कशासाठी द्यायचा? त्यापेक्षा केंद्रीय कार्यकारणीच्या सर्व सदस्यांनी राजीनामे देत बाजूला व्हायला हवे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी राजीनामा दिला होता. या पराभवाला सर्वच जबाबदार आहेत. कार्यकारिणीसुद्धा या पराभवाला जबाबदार असल्याचे सांगत आतापर्यंत किती सदस्यांनी राजीनामे दिले, असा सवालही निरुपम यांनी केला.चव्हाण, वासनिक, देवरा यांच्या सह्याकाँग्रेस पक्षाला पूर्णवेळ आणि प्रभावी नेतृत्व मिळावे, यासाठी पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पाठविलेल्या पत्रावर महाराष्टÑातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे सरचिटणीस मुकुल वासनिक आणि माजी खासदार मिलिंद देवरा या तीन नेत्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.‘राहुल गांधी परत या’ - थोरात यांची हाकप्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी ‘राहुल गांधी परत या’ची हाक दिली आहे. थोरात यांनी रविवारी सोशल मीडियातून राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व स्वीकारावे, असे आवाहन केले आहे. आपल्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही सर्व काँग्रेसजन कोटयवधी भारतीयांचा आवाज बनू, आपल्या मार्गदर्शनाखाली देशातील गरीब आणि दुर्लक्षित घटकांसाठी काम करू. आपल्या नेतृत्वाखाली इतिहास घडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे थोरात यांनी म्हटले आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी