शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सोशल मीडियावरही रंगलाय निवडणुकीचा फड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 00:38 IST

लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसारांच्या सभांनी मैदाने गाजत असतानाच यापासून सोशल मीडिया कसा दूर राहील.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचार आणि प्रसारांच्या सभांनी मैदाने गाजत असतानाच यापासून सोशल मीडिया कसा दूर राहील. मैदाने, रस्ते आणि गल्लीबोळ उमेदवारांकडून पालथे घातले जात असतानाच, उमेदवारांच्या ‘मीडिया सेल’कडून सोशल मीडियाचा पुरेपूर वापर केला जात असून, निवडणूक आयोगाकडूनही सोशल मीडियावर मतदारांना मतदान करण्यासाठीचे सातत्याने आवाहन केले जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान होणार आहे. गुरुवारी मतदान होत असलेल्या मतदारसंघातील मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडावे, म्हणून निवडणूक आयोगाने मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली आहे. मतदानाचा टक्का वाढावा, म्हणून सोशल मीडियावर हॅशटॅग जोशात आहेत. महत्त्वाचे म्हणजे महिला मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावे, म्हणून आयोग आग्रही असून, याबाबत विविध क्षेत्रांतील नामांकित व्यक्तीकडून मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.आवाहनलोकसभा निवडणूक २०१९च्या आपल्या मतदारसंघातील निवडणुकांची तारीख पाहा, आवर्जून मतदान करा.आपले मतदानाचे कर्तव्य नक्की बजावा.मतदान म्हणजे आपल्या देशाच्या विकासाचा पाया रोवणे.निश्चय करा आगामी निवडणुकीत कोणतेही कारण न देता मतदान करण्याचा.आपल्याला मिळालेला मतदानाचा अधिकार वाया घालवू नका.आगामी लोकसभा निवडणुकीत मतदाराची भूमिका जरूर निभावा.अवश्य मतदान करा.>मतदाराकडे जर वैध मतदार छायाचित्र ओळखपत्र नसेल, तर मतदाराने कोणते दस्तऐवज ओळखपत्र म्हणून मतदान केंद्रावर सादर करावे; याबाबत माहिती दिली जात आहे.>#लोकसभानिवडणूक#लोकसभानिवडणूक२०१९#मतदान#माझेमतअमूल्य#मतदार#मतदान

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019