शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला वगळून होणाऱ्या आघाडीला शिवसेनेचा विरोध; वैचारिक मतभेद असले तरी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 06:23 IST

‘तीन तिघाडा, काम बिघाडा कशाला?’ काँग्रेस काही राज्यांमध्ये सत्तेत तर आहेच, शिवाय बऱ्याच राज्यांमध्ये या पक्षाचा चांगला प्रभाव आहे.

मुंबई : काँग्रेसला वगळून एक वेगळी आघाडी निर्माण केली गेली तर त्याचा फायदा भाजपलाच होईल, अशी भूमिका शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी शनिवारी मांडली. वैचारिक मतभेद असले तरी एकत्र येता येणे शक्य आहे, हे महाविकास आघाडीच्या पॅटर्नने देशाला दाखविले आहे, असेही ते म्हणाले.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत येऊन ‘यूपीए आता आहेच कुठे?’, असा सवाल करीत काँग्रेसला डिवचले होते आणि काँग्रेस किंवा यूपीएशिवाय भाजपला नवा पर्याय देण्याचे संकेतही दिले होते. त्यावरून सध्या वादळ उठले असताना राऊत यांनी शिवसेनेची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, काँग्रेस काही राज्यांमध्ये सत्तेत तर आहेच, शिवाय बऱ्याच राज्यांमध्ये या पक्षाचा चांगला प्रभाव आहे. शिवसेना यूपीए किंवा एनडीए यापैकी कोणाचीही सदस्य नाही, पण भाजपला सक्षम पर्याय द्यायचा असेल तर एकास एकच दिला पाहिजे. भाजपविरोधी दोन आघाड्या झाल्या तर त्याचा फायदा भाजपलाच होईल, हे स्पष्ट आहे.

तीन तिघाडा, काम बिघाडा कशाला? त्यातून ‘तुला ना मला घाल कुत्र्याला, असे होईल. भाजपविरोधातील आघाडीचे नेतृत्व काँग्रेस सक्षमपणे करू शकत नाही, असे ममता बॅनर्जी यांना वाटते. त्यांचे काँग्रेससंदर्भात काही ग्रह आहेत. याबाबत ममता बॅनर्जी यांच्याशी चर्चा निश्चितच होऊ शकते. आम्ही देखील चर्चा करू, असेही ते म्हणाले.

काँग्रेस हा केवळ पक्ष नसून तो एक विचार, तत्त्वज्ञान आहे. काँग्रेसला डावलणे म्हणजे तत्त्वज्ञानाला, विचाराला आणि राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाला डावलण्यासारखे आहे. काँग्रेसच्या विचाराला डावलणे याचा अर्थ ‘फॅसिस्ट’ वृत्तीला ताकद देण्यासारखे आहे. - बाळासाहेब थोरात, महसूल मंत्री

भाजपविरोधात काँग्रेससह देशभरातील सर्व विरोधी पक्षांची एक मोठी आघाडी तयार करण्याचा प्रयत्न होत आहे. राहिला प्रश्न नेतृत्वाचा, तर एका सामूहिक नेतृत्वात मोर्चा तयार करण्याचा प्रयत्न आहे. - नवाब मलिक, अल्पसंख्याक विकास मंत्री

ममता बॅनर्जी यांनी केलेले वक्तव्य हे त्या देश विकणाऱ्यांसोबत असल्याचे स्पष्ट होते. सर्वच राजकीय पक्षांनी विचार करण्याची वेळ आली आहे की, त्यांनी देश विकणाऱ्यांसोबत राहायचे की देश वाचवणाऱ्यांसोबत? - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसBJPभाजपा