शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट; भाजपासोबत सरकार बनवायची थेट शरद पवारांची होती ऑफर, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2020 15:47 IST

तीन पक्षाचं सरकार बनवणं मला मान्य नाही असं अजित पवार म्हणाले, मी सरकार बनवायला तयार आहे. त्यांच्याकडे स्ट्रेंथही होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

ठळक मुद्देराज्यात राजकारणात गेल्या नोव्हेंबर महिन्यात अनेक राजकीय उलथापालथी घडल्याशिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष झाला आणि दोन्ही पक्ष वेगळे झालेआम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर आली, थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाहीत

मुंबई – राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीनंतर झालेला सत्तासंघर्ष मोठ्या प्रमाणात गाजला होता, या सत्तेच्या राजकारणात अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींबाबत जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्यांच्या मनात आहे, कॅमेरासमोर दिसणाऱ्या घडामोडी आणि पडद्यामागून सुरु असणाऱ्या हालचाली याबाबत केवळ त्यात प्रामुख्याने सहभागी झालेले नेतेच उलगडा करु शकतात, यात प्रमुख नेते म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे.

राज्यात राजकारणात गेल्या नोव्हेंबर महिन्यात अनेक राजकीय उलथापालथी झाल्या,  अनेक वर्षाचे मित्र शत्रू बनले तर शत्रूच्या गोटात सहभागी होऊन मित्राला धडा शिकवला. शिवसेना-भाजपा यांच्यात मुख्यमंत्री पदावरुन संघर्ष झाला आणि हे दोन्ही पक्ष एकमेकांपासून दुरावले. याबाबत एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस म्हणतात की, प्रत्येक गोष्टीला खरी बाजू असते. मुख्यमंत्रिपदाचं शिवसेनेला वचन दिलं होतं, असं उद्धव ठाकरे सांगतात, पण मला कधीच वरिष्ठ नेतृत्वाने सांगितले नाही, ५० टक्के जागा वाटप हे ठरलं होतं, त्यानुसार पत्रकार परिषदेत घोषणा झाली, अमित शहा यांनी मुख्यमंत्री पदाबाबत कधीच शब्द दिला नव्हता असं त्यांनी मला सांगितले. मुख्यमंत्रिपदाबाबत भाजपाने कधीच शब्द दिला नाही, या सर्वच गोष्टीतून मार्ग निघाला असता पण उद्धव ठाकरेंनी बोलणं टाळलं, फोन घेतले नाहीत, मागील ५ वर्षात एवढा संवाद असताना फोनवरुन बोलण्यासही नकार दिला त्याचं दु:ख वाटलं असं त्यांनी सांगितले.

तसेच आज अनेकजण पुस्तक लिहित आहे पण त्यावेळच्या राजकीय घडामोडीवर खरं पुस्तक मी लिहणार आहे, माझ्याकडे सगळा घटनाक्रम डोक्यात आहे, ज्यावेळी शिवसेना आमच्यासोबत येणार नाही असं लक्षात आलं त्यावेळी आमच्याकडे  काय पर्याय आहे असा विचार केला त्यावेळी आम्हाला थेट राष्ट्रवादीची ऑफर आली, थेट राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार नाहीत, त्या संदर्भात योग्य त्या चर्चाही झाल्या, एका बैठकीत मी होतो, एका बैठकीत नव्हतो, सगळ्या चर्चा मला माहिती आहेत, त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी आपली भूमिका बदलली आम्ही कॉर्नर झलो.. दोन-तीन  दिवस शांत बसलो, कुठलीच कृती केली नाही, पण दोन-तीन दिवसांनी अजितदादांकडून आम्हाला पर्याय आला, शरद पवार जे आधी म्हणाले, स्थिर सरकार भाजपा-राष्ट्रवादीच देऊ शकते, तीन पक्षाचं सरकार बनवणं मला मान्य नाही म्हणाले, मी सरकार बनवायला तयार आहे सांगत त्यांच्याकडे स्ट्रेंथही होती असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी द इनसाइडर या मुलाखतीदरम्यान केला.

दरम्यान, ज्यावेळी तुमच्याशी सगळे धोका करतोय, प्रत्येकजण खंजीर खुपसतोय तेव्हा जगावं लागतं तेव्हा यू हॅव टू बाउन्स बँक. गनिमी कावा करावा लागतो. मनाविरुद्ध जाऊन करावा लागतो.रात्री ठरलं सकाळी केलं. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आमच्याविरोधात गेला नसता तर आमचं सरकार शंभर टक्के टिकलं असतं, आज मागे वळून पाहता तेव्हा तो निर्णय चुकला होता असं वाटतं पण त्याक्षणी जशास तसे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण ९९ टक्के यशस्वी होण्यापर्यंत पोहोचून अयशस्वी झालो असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारShiv Senaशिवसेना